Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

24 वर्षांत ‘या’ आश्रमात सुमारे 7 हजार मुस्लीमांची पुन्हा हिंदू धर्मात घरवापसी, धर्मांतरीत मुलींच्या ह्रदय पिळवटणाऱ्या कथा

'द केरला स्टोरी' हा सिनेमा रिलीज झाल्यापासून वादात सापडला आहे. काही राज्यांमध्ये सिनेमांवर बंदी घालण्यात आली तर काही राज्यांनी टॅक्स फ्री केला. नुकतीच या सिनेमाच्या टीमने मुंबईत पत्रकार परिषद घेतली त्यावेळी पीडित मुलींपैकी 25 मुलींना सिनेमाच्या टीमने समोर आणलं.

  • By शिल्पा आपटे
Updated On: May 17, 2023 | 07:06 PM
24 वर्षांत ‘या’ आश्रमात सुमारे 7 हजार मुस्लीमांची पुन्हा हिंदू धर्मात घरवापसी, धर्मांतरीत मुलींच्या ह्रदय पिळवटणाऱ्या कथा
Follow Us
Close
Follow Us:

The Kerala Story : ‘द केरला स्टोरी’ हा सिनेमा (The Kerala Story movie) रिलीज झाल्यापासून वादात सापडला आहे. काही राज्यांमध्ये सिनेमांवर बंदी घालण्यात आली तर काही राज्यांनी टॅक्स फ्री केला. नुकतीच या सिनेमाच्या टीमने मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी पीडित मुलींपैकी 25 मुलींना सिनेमाच्या टीमने समोर आणलं. यावेळी या पीडित मुलींनी त्यांची कथा, (Victim story)  त्यांना कोणत्या गोष्टीला सामोरं जावं लागलं ते सांगितलं. त्यांच्या कथा हृदय पिळवटून टाकणाऱ्या आहेत.

‘घरी पूजा व्हायची आणि मी गच्चीवर नमाज अदा करायचे’

पीडित मुलींपैकी एक अनघा जयगोपाल म्हणाली, “दोन वर्षांपूर्वी माझे धर्मपरिवर्तन झाले. शालिनी (सिनेमात अदा शर्माने साकारलेली) सारखी माझी अवस्था झाली होती. सिनेमात दाखवलेल्या असिफासारख्या हॉस्टेलमध्ये अनेक मुली होत्या, ज्या बोलताना कायम धर्म मध्ये आणायच्या. आम्हाला ही गोष्ट गोंधळात टाकायची. धर्माचे ज्ञान नसल्याने मी कधी माझी बाजू मांडू शकले नाही” असंही अनघा म्हणाली.

“या मुली म्हणायच्या की देव एकच आहे तो म्हणजे अल्लाह, त्यांनी मला कुराणाची हिंदी आवृत्ती दिली, ती वाचून मी त्यात अडकले, मी हिंदूविरोधी झाले, कुटुंब सोडलं आणि पूर्णपणे इस्लाम धर्म स्वीकारला. घरी पूजा असायची आणि मी गच्चीवर नमाज अदा करायचे. ज्यांनी मला जन्म दिला त्यांना मी काफीर म्हणू लागले. मी माझ्या चुलत भावाच्या मुलीवरही राग काढला होता, कारण ती मला नमाज अदा करू देत नव्हती. हा सिनेमा पाहिल्यावर मला रडू कोसळले.” असे अनघाने आवर्जून सांगितले.

केवळ मुलीच नाही तर मुलांचेही धर्मांतर झाले

पीडित मुलींपैकी चित्रा म्हणाली, “जवळपास 7 हजार फक्त मुलीच नाहीत तर मुलेही होती. ज्यांचे धर्मांतर झाले त्यांनी आपलं कुटुंब सोडलं. त्यांच्यात झालेला बदल त्यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या सगळ्यांना आश्रमात आणले. यातून बाहेर आल्यानंतर पु्न्हा त्याबद्दल बोलायची कोणाचीची इच्छा नव्हती आणि म्हणूनच याची कुठेही नोंद नाही. त्यांना आपली ओळख लपवायचीय.

“24 वर्षांमध्ये 7 हजारजण हिंदू धर्मात परतल्याचं पीडित श्रुतीने सांगितले. एवढंच नाही तर, आर्ष विद्या समाज या आश्रमात धर्मांतरित झालेल्या मुलींना मदत केली जाते. 1999 ते 2023 पर्यंत इस्लाम धर्म स्वीकारलेल्या सुमारे 7000 लोकांना मायदेशी पाठवण्यात आले आहे.”

मदतीसाठी केरळबाहेरील लोकांकडूनही कॉल येत आहेत, त्या सर्वांचे जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आले आहे. धर्मांतरित झालेल्या 300 मुलींना आर्ष विद्या आश्रमात सुविधा देण्यात येणार आहेत. ‘द केरला स्टोरी’ सिनेमाचे निर्माते विपुल शहा यांनी या आश्रमाला 51 लाखांची देणगी दिलेली आहे. धर्मांतराने पीडित मुलींना वाचवण्यासाठी आश्रमाला 51 लाख रुपये देण्यात आल्याचं विपुल शाह यांनी म्हटलं आहे. धर्मांतर अनेक धर्मात होते पण प्रत्येकाचा उद्देश ISIS ला पाठवणे हे नसते असा सूर या पीडित मुलींनी मांडलेल्या कथांमधून उमटत होता.

काय आहे आर्ष विद्या समाजाचं उद्दिष्ट्य

‘लव्ह जिहाद’मध्ये अडकून ज्याचे आयुष्य उद्ध्वस्त होते. या मुलींना इस्लाम स्वीकारल्यानंतर त्यांची तस्करी केली जाते. अशा पीडित मुलींना मदत करणाऱ्या काही संस्था आहेत. ‘आर्ष विद्या समाज’ आश्रम हा त्यापैकी एक
आहे. सनातन धर्माचा प्रचार आणि प्रसार हे या आश्रमाचं उद्दिष्ट आहे. तिरुअनंतपुरम इथे हा आश्रम आहे. 1999 साली या आश्रमाची स्थापना करण्यात आली.

 

Web Title: The kerala story victim story conversion aashram hindu muslim religion nrsa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2023 | 07:06 PM

Topics:  

  • the kerala story

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.