असे म्हटले जाते की, अपातानी महिलांना अत्यंत सुंदर मानले जात असे. त्यांच्या साैदर्यामुळे त्यांचे आसपासच्या जमातीकडून अपहरण केले जायचे. मुलींच्या संरक्षणासाठी कुटुबियांनी त्यांच्या चेहऱ्यावर गडद निळा रंग गोंदवण्यास सुरुवात केली, ज्यामुळे त्या कमी आकर्षत दिसतील आणि त्यांचे अपहरण टळू शकेल.
दुसऱ्या एका कथेनुसार, जेव्हा पुरुष युद्धात मारले जातं तेव्हा त्यांचे आत्मे घरी परतायचे. पण आत्म्यांना त्यांच्या पत्नीला ओळखण्यात समस्या येत होत्या ज्यामुळे ते त्यांना द्यायला लागायचे. अशा परीस्थितीत जमातीच्या पुजाऱ्याने महिलांच्या चेहऱ्यावर टॅटू बनवण्याचा सल्ला दिला जेणेकरुन आत्मे त्यांच्या पत्नीला ओळखू शकतील.
मुलींच्या पहिल्या मासिक पाळीच्या वेळा सुमारे दहा वर्षांत त्यांच्या चेहऱ्यावर टॅटू काढण्यात आला. यात कपाळापासून नाकापर्यंत एक जाड रेषा आणि हनुवटीवर पाच सरळ रेषा बनवण्यात आली. त्याचवेळी नाकात घातलेले मोठे यापिंग हुर्लाे याला जंगलातील लाकडापासून बनवण्यात आले
सुरुवातील ही प्रथा महिलांना कुरुप बनवण्यासाठी तयार करण्यात आली होती पण हळूहळू ती साैदर्य आणि अभिमानाचे प्रतीक बनले. जर एखाद्या महिलेच्या चेहऱ्यावर टॅटू आणि नाकवर यापिंग हुर्लाे नसतील तर त्यांना लग्नासाठी पात्र मानले जात नव्हते.
हळूहळू जेव्हा आधुनिकता जमातीत प्रगत होत गेली तेव्हा आपातीनी तरुणींनी या परंपरेला ओझे मानण्यास सुरुवात केली. पुढे १९७० च्या दशकात आपातानी युवा संघटना आणि सरकारच्या प्रयत्नांमुळे या परंपरेवर बंदी घालण्यात आली