फोटो सौजन्य- istock
हिंदू धर्मात दिवाळी या सणाला खूप महत्त्व आहे. हा दिवस पूर्ण उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो. दरवर्षी दिवाळीचा सण कार्तिक महिन्याच्या अमावास्येला येतो आणि यावर्षी दिवाळी 29 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. या दिवशी मुख्यतः गणेश आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. असे मानले जाते की, या दिवशी खऱ्या मनाने पूजा करणे आणि चांगले कर्म केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो, ज्यामुळे घरामध्ये धन आणि समृद्धी येते.
दिवाळी हा भारतातील एक प्रसिद्ध सण आहे, ज्याला प्रकाशाचा सण देखील म्हणतात. दिवाळीत देवी लक्ष्मी आणि गणपतीची पूजा केली जाते, ज्यामुळे घरात सुख, समृद्धी आणि शांती येते. दिवा लावण्याचे विशेष महत्त्व आहे, कारण तो अंधार दूर करून प्रकाशाचे प्रतीक आहे. असे मानले जाते की, दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा येते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. ज्यामुळे घरात धन आणि समृद्धीचा वर्षाव होतो. वास्तूनुसार दिवाळीला दिवा लावण्याचे विशेष महत्त्व आहे. सर्वप्रथम घराच्या मंदिरात दिवा लावावा. यानंतर प्रदोषकाळात सूर्यास्तानंतर दिवा लावणे शुभ मानले जाते. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुख-समृद्धी नांदते.
हेदेखील वाचा- घरातील कलह कमी करण्यासाठी रोज करा या गोष्टी
स्वयंपाकघरात दिवा लावण्यासाठी स्वयंपाकघरातील आग्नेय कोपरा निवडावा. असे केल्याने कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते. यासोबतच स्वयंपाकघराव्यतिरिक्त दिवाणखान्यातही दिवा लावा. दिवाणखान्यात दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि वातावरणात शांतता राहते. दिवाळीत हे छोटे-छोटे उपाय केल्यास घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो.
दिवाळीत नेहमी शुद्ध अंतःकरणाने दिवा लावावा असे मानले जाते. दिवा लावताना, आपले मन शांत आणि सकारात्मक भावनांनी भरलेले ठेवा.
हेदेखील वाचा- या मूलांकाच्या लोकांना नोकरीत पढोन्नती मिऴण्याची शक्यता
दिवाळीला दिवा लावण्यासाठी तूप आणि शुद्ध तेल वापरणे शुभ मानले जाते.
बहुतेक लोक पूर्वेकडे तोंड करून दिवा लावतात, कारण पूर्वेला देवांची दिशा मानली जाते.
दिवा स्वच्छ ठिकाणी ठेवा, जेथे धूळ किंवा इतर अशुद्धी नसावी. दिशा बदलल्याने तुमचे नशीब बदलेल