Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kartik Month 2025: कार्तिक महिन्यात तुळशीजवळ दिवा लावावा का? जाणून घ्या महत्त्व

हिंदू धर्मामध्ये कार्तिक महिन्याला विशेष महत्त्व आहे. कार्तिक महिना शुभ मानला जातो. या महिन्यात केलेल्या धार्मिक कार्यांचे फायदे होतात. या महिन्यात तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावण्याचे काय महत्त्व आहे, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 05, 2025 | 11:10 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

पंचांगानुसार कार्तिक महिन्याची सुरुवात बुधवार 8 ऑक्टोबरपासून होत आहे आणि या महिन्याची समाप्ती 6 नोव्हेंबर रोजी होणार आहे. हा महिना खूप महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. असे म्हटले जाते की, या महिन्यात जी व्यक्ती भगवान विष्णूंची विशेष पूजा करते त्या व्यक्तीला भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद मिळतो. कार्तिक महिन्याला दामोदर महिना असेही म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार कार्तिक महिन्यात तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावण्याची परंपरा वर्षानुवर्षे चालत आलेली आहे. कार्तिक महिन्यात तुळशीजवळ दिवा का आहे महत्त्व, जाणून घ्या

कार्तिक महिन्यात तुळशीजवळ दिवा लावण्याचे महत्त्व

कार्तिक महिन्यात तुळशीजवळ दिवा लावणे खूप शुभ मानले जाते. मान्यतेनुसार, कार्तिक महिन्यात तुळशीजवळ दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते, संपत्ती आणि समृद्धी वाढते आणि नकारात्मकता दूर होते. कार्तिक महिन्यात तुळशीजवळ दिवा लावल्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होतात, पूर्वज संतुष्ट होतात आणि घरात सुख-शांती राहते. तसेच रविवार आणि एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करू नये आणि तुळशीची पाने तोडू नये.

Neechbhang Rajyog: शुक्राच्या संक्रमणामुळे तयार होत आहे नीचभंग राजयोग, शुक्र ग्रह या राशीच्या लोकांना करणार मालामाल

कार्तिक महिन्यात तुळशीजवळ दिवा कधी लावावा

कार्तिक महिन्यामध्ये दररोज संध्याकाळी, शक्यतो सूर्यास्तानंतर तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावावा. हा दिवा तूप किंवा तिळाच्या तेलाने लावावा. शुद्ध गाईचे तूप वापरणे अधिक शुभ मानले जाते. या महिन्यात सकाळी आणि संध्याकाळी तुळशीची पूजा करण्यालाही विशेष महत्त्व आहे.

कार्तिक महिन्यात तुळशीजवळ दिवा लावण्याची पद्धत

कार्तिक महिन्यात सूर्यास्तानंतर म्हणजेच संध्याकाळी तुळशीजवळ दिवे लावावेत. दिव्यासाठी शुद्ध गाईचे तूप किंवा तिळाचे तेल वापरावे. ​​मोहरीचे तेल वापरणे टाळावे. ईशान्य दिशेला तुळशीच्या रोपाजवळ मातीचा, धातूचा किंवा पिठाचा दिवा ठेवावा. दिवा लावल्यानंतर, तुळशीची आरती करा. तुम्ही आरतीसाठी तोच दिवा वापरू शकता. कार्तिक महिन्यात सकाळी आणि संध्याकाळी तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करावे. रविवार आणि एकादशीला तुळशीची पाने तोडू नयेत किंवा पाणी अर्पण करू नये. कार्तिक महिन्यात तुळशीच्या रोपावर स्वस्तिक चिन्ह बनवणे देखील शुभ मानले जाते. तुळशीजवळ दीप प्रज्वलित केल्यानंतर “शुभं करोति कल्याणम्, आरोग्य धन संपदम्, शत्रु बुद्धी विनाशाय, दीप ज्योति नमोस्तुते”. या मंत्राचा जप करावा.

Kojagiri Purnima 2025: कोजागिरी पौर्णिमेला तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ उपाय, चंद्रदोष होईल दूर

कार्तिक महिन्यात दिवा लावण्याचे काय आहे महत्त्व

कार्तिक महिन्यात दिवा लावणे म्हणजे तुमच्या मनातून आणि आत्म्यामधून अंधार आणि नकारात्मक ऊर्जा काढून टाकणे. अंधार म्हणजे अज्ञान. यावेळी जे लोक भगवान विष्णूंसमोर दिवा लावून त्यांची योग्य पद्धतीने पूजा केली जाते. त्यांना अहंकार, लोभ, वासना आणि भौतिक जगापासून मुक्तता मिळते. आत्मा शुद्ध होतो आणि या काळात दिवा लावल्याने जीवनात शुभ आणि सकारात्मकता येते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Kartik month 2025 why is it important to light a lamp near tulsi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2025 | 11:10 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Neechbhang Rajyog: शुक्राच्या संक्रमणामुळे तयार होत आहे नीचभंग राजयोग, शुक्र ग्रह या राशीच्या लोकांना करणार मालामाल
1

Neechbhang Rajyog: शुक्राच्या संक्रमणामुळे तयार होत आहे नीचभंग राजयोग, शुक्र ग्रह या राशीच्या लोकांना करणार मालामाल

Kojagiri Purnima 2025: कोजागिरी पौर्णिमेला तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ उपाय, चंद्रदोष होईल दूर
2

Kojagiri Purnima 2025: कोजागिरी पौर्णिमेला तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ उपाय, चंद्रदोष होईल दूर

Zodiac Sign: वृद्धी योगामुळे वृषभ आणि कन्या राशीसह या राशीच्या लोकांना होईल आर्थिक फायदा
3

Zodiac Sign: वृद्धी योगामुळे वृषभ आणि कन्या राशीसह या राशीच्या लोकांना होईल आर्थिक फायदा

Numerology: मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या
4

Numerology: मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.