Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

युद्धिष्ठिराकडून घडलेल्या त्या चुका? वाचून पडाल आवाक्… म्हणाल ‘हे शक्य नाही!’ पण ‘हे खरं आहे

धर्मी आणि आदर्श मानला जाणारा युद्धिष्ठिरही चुका करण्यापासून वंचित राहिला नाही. त्याच्या निर्णयांमुळे अनेकदा पांडवांच्या आणि स्वतःच्या जीवनात संकटं ओढवली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 14, 2025 | 04:15 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

युद्धिष्ठिर म्हणजे धर्माचे पालन करण्यात आदर्शच जणू! त्याच्या कडून चुका होतील अशा अपेक्षाच कुणी बाळगत नव्हता. पण युद्धिष्ठिराच्या हातून असे काही घडले आहे, जे ऐकून कदाचित त्या प्रतिमेबद्दल तुम्हालाही थोडा राग येईल. धर्मी असणारा युद्धिष्ठिर काही चित्रणात स्वार्थीही दिसून आला आहे. कदाचित त्याच्या भावना तशा नसतील पण त्याचे वागणे काही तसेच होते. याचे चित्रण स्वतः अर्जुनाने रागाच्या भरात केले होते. चला त्या चुका कोणत्या? पाहू.

Trigrahi Yog: सूर्य, बुध आणि मंगळ तयार करणार त्रिग्रही योग, या राशीच्या लोकांना व्यवसायात मिळणार अपेक्षित यश

द्यूत खेळणे. युद्धिष्ठिराने केलेली ही पहिली चूक जी निदर्शनास आली. द्युताला नकारही देऊ शकला असता पण त्याने तसे केले नाही. द्यूत खेळाला तो खेळला, त्यात सगळं गमावलंही. सगळं गमावूनही तो व्यक्ती शांत बसला नाही मग त्याने द्रौपदीला डाव म्हणून लावला. ही ती द्रौपदी, जी त्याची पत्नी तर होतीच पण तिला स्वयंवरात स्वतः अर्जुनाने जिंकून आणले होते, युद्धिष्ठिराने नव्हे. सगळं हरलं गेलं तेव्हा धृतराष्ट्राने दया खाऊन युद्धिष्ठिराला हरलेल्या सगळ्या वस्तू पुन्हा परत दिल्या पण युधिष्ठीर शांत राहिला नाही त्याने पुन्हा द्यूताचा डावात सहभाग घेतला आणि त्याच चुका पुन्हा केल्या.

वनवासात असताना गंधर्वांनी दुर्योधनाला पकडून नेले होते. तेव्हा युद्धिष्ठिराकडे आपल्या हक्काचे राज्य बळकवण्याची संधी होती पण तेव्हा त्याने अर्जुनाला गंधर्वांशीच युद्ध करायला पाठवले. त्यात पांडव फसले आणि टाळता येणारे महाभारत युद्ध घडले. दुर्योधनाला गंधर्वांच्या तावडीतून सोडवून युद्धिष्ठिराला काय फायदा झाला? हे स्वतः युधिष्ठिरालाच माहिती.

युद्धाच्या दरम्यान, भीम आणि अर्जुन विरुद्ध पक्षातील मोठमोठ्या महारथींना मारत सुटत होते. पण युद्धिष्ठिर पांडवांचा मोठा भ्राता आणि पांडव दलाचा राजा म्हणून मोठे पराक्रम गाजवणे त्याचा धर्म होता पण त्याने तसे काही केले नाही. तो युद्धातून पलायन करण्याचाच तयारीत दिसत होता. त्याने एकाही मोठ्या महारथीचा वध केला नाही. शेवटी, अठराव्या दिवशी म्हणजेच युद्धाच्या शेवटी स्वतः श्री कृष्णाने एका तरी महारथीचा वध करण्याचा सल्ला त्याला दिला तेव्हा कुठे युद्धिष्ठिराने शल्याचा वध केला आणि शल्यपर्व समाप्तीस आणले.

युद्धदरम्यान, युद्धिष्ठिरावर कर्ण याने आक्रमण केले त्यात तो जखमी झाला. श्री कृष्णाच्या सल्ल्याप्रमाणे अर्जुन जखमी अवस्थेत असलेल्या आपल्या मोठ्या भ्रात्याला पाहण्यासाठी शिबिरात आला तेव्हा युद्धिष्ठिर अर्जुनालाच नावे ठेऊ लागला. त्याला भित्रा म्हणू लागला आणि त्याच्या गांडीव धनुष्यालाही नावे ठेवू लागला. तेव्हा रागाच्या भरात अर्जुनाने युद्धिष्ठिरावर उचलण्यासाठी म्यानातून तलवारही बाहेर काढली होती, तेव्हा श्रीकृष्णामुळे युद्धिष्ठिर वाचला.

Dream Science: स्वप्नात पूर्वजांना पाहणे शुभ आणि अशुभ, काय आहेत यामागील संकेत

शेवटी, सगळं युद्ध संपून पांडव विजयी झाले तेव्हाही युद्धिष्ठिराने त्याच्या पराक्रमांना पूर्णविराम दिला नाही. आपल्या विजयासाठी पांडव सेनेतील अब्जो सैनिकांनी प्राणांची आहुती दिली. त्याचा काडीचाही विचार न करता युद्धिष्ठिराने जखमी दुर्योधनाला चॅलेंज दिले की आमच्या मधल्या तुझ्या इच्छेने कुणाही एकाशी गधा युद्ध कर, जर जिंकलास तर हस्तिनापूर राज्य तुझे! हे सगळं तेव्हा घडलं जेव्हा अब्जो सैनिकांनी, या युद्धिष्ठिराच्या राज्यासाठीच आपले प्राण गमावले. शेवटी युद्धाचे नियम तोडून भीमाने दुर्योधनाच्या पायावर गधा चालवली आणि पांडवांना हस्तिनापूर मिळाले.

पांडव जेव्हा स्वर्गाकडे सदेह मार्गस्थ होत होते. तेव्हा असा नियम पांडवांनी तयार केला होता की हिमालयाच्या वाटेने जाताना जो कुणी खाली पडेल, त्याला उचलण्यासाठी कुणीही मागे थांबणार नाही. जो पडला तो तिथेच सुटला, जो नाही पडला तो स्वर्गात सदेह पोहचणार. यावेळी युद्धिष्ठिर सोडून सगळे पांडव आणि द्रौपदी खाली पडले. तेव्हा युद्धिष्ठिराने सगळ्यांच्या बद्दल वाईट शब्द उद्गारले. सगळ्यांचा कमीपणा ऐकून दाखवला आणि शेवटी एकटाच सदेह कायमचा स्वर्गात गेला.

( Refrence : महाभारतातील १०८ रहस्य – समर )

Web Title: The dark facts of yudhisthira

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2025 | 04:15 AM

Topics:  

  • Mahabharata facts

संबंधित बातम्या

पाप-अत्याचारांची हीच मर्यादा? जाणून घ्या: कलियुग कधी संपणार!
1

पाप-अत्याचारांची हीच मर्यादा? जाणून घ्या: कलियुग कधी संपणार!

असा झाला पांडवांचा शेवट! इंद्र स्वतः रथ घेऊन पृथ्वीवर आला, युद्धिष्ठिर एकटाच…
2

असा झाला पांडवांचा शेवट! इंद्र स्वतः रथ घेऊन पृथ्वीवर आला, युद्धिष्ठिर एकटाच…

पाताळ कुठे आहे? खरंच असं काही आहे का? जाणून घ्या
3

पाताळ कुठे आहे? खरंच असं काही आहे का? जाणून घ्या

शंभर कौरवांची नावे काय? पांडव-कौरवांना होती एकुलती एक बहीण…
4

शंभर कौरवांची नावे काय? पांडव-कौरवांना होती एकुलती एक बहीण…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.