Gandhi Jayanti 2024 Impact of Father of the Nation Mahatma Gandhi's ideology yesterday, today and tomorrow
महात्मा गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर रोजी झाला होता, म्हणून दरवर्षी हा दिवस गांधी जयंती म्हणून साजरा केला जातो. देशाच्या कानाकोपऱ्यात आणि जगातील अनेक देशांमध्ये गांधीजींच्या स्मरणार्थ विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. सालाबादप्रमाणे यावर्षीही गांधी जयंतीनिमित्त ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भारतात सगळीकडेच गांधी जयंती फार उत्साहात साजरी केली जाते. परंतु आज गांधी जयंती निमित्ताने गांधीजींच्या थोर विचारांचा आणि शिकवणीचा आपल्याला कसा फायदा करून घेता येईल ते जाणून घेऊया.
आज गांधी जयंती आहे. सुमारे 155 वर्षांपूर्वी, जेव्हा गुजरातमधील पोरबंदर या छोट्याशा शहरात एका मुलाचा जन्म झाला तेव्हा त्याच्या नावाशी ‘महात्मा’ हा शब्द कायमचा जोडला जाईल, असे कुणालाही वाटले नसेल. ते मूल मोठे होऊन ‘राष्ट्रपिता’ म्हणून ओळखले जाईल, याची कल्पनाही कोणी स्वप्नातही केली नसेल. की सारे जग त्याला प्रेमाने ‘बापू’ म्हणेल. पण आज जगभरात महात्मा गांधीजींना त्यांच्या कार्यसाठी आणि त्यांच्या शिकवणीसाठी ओळखले जाते. पाश्चात्य देशातील मंडीळीही गांधीजींच्या विचारांचा आदर्श घेतात.
महात्मा गांधी एक संपूर्ण विचारधारा
दरवर्षी 2 ऑक्टोबरला देशाला फक्त एका व्यक्तिमत्वाचीच आठवण होत नाही तर मोहनदास करमचंद गांधी हे एक व्यक्तिमत्वापेक्षाही अधिक आहे. गांधी हे केवळ एक नाव नाही, तर ती एक संपूर्ण विचारधारा आहे. संपूर्ण जगात शांतता प्रस्थापित करण्याची ताकद असलेली विचारधारा. गांधी हे केवळ एक नौका नसून ते एक संपूर्ण तरंगणारी विचारधारा आहेत. संपूर्ण जगात शांतता प्रस्थापित करण्याची शक्ती असलेली विचारधारा. आणि ही विचारधारा जगभरात सर्वत्र पोहोचली आहे.
Gandhi Jayanti 2024: राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या विचारधारेचा प्रभाव काल, आज आणि उद्या ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
गांधींची तत्वे
गांधीजींचा सत्य, अहिंसा आणि साधे जीवन यावर विश्वास होता. कोणतीही समस्या सोडवण्यासाठी हिंसेचा अवलंब करणे चुकीचे आहे असे त्यांचे मत होते. या विचारसरणीने त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठीही लढा दिला. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सविनय कायदेभंग चळवळ, स्वदेशी चळवळ, भारत छोडो आंदोलन, दांडीयात्रा यांसारख्या अहिंसक चळवळी झाल्या. गांधीजींची दांडी मार्च (मीठाची चळवळ) जगभरातील अनेक देशांसाठी ब्रिटिशांच्या अत्याचाराविरुद्ध सत्याग्रहाचे उदाहरण बनले. ज्याने मोठ्या शक्तींनाही नतमस्तक होण्यास भाग पाडले.
समाजसुधारक महात्मा गांधी
गांधीजी केवळ स्वातंत्र्यसैनिक नव्हते. ते समाजसुधारकही होते. अस्पृश्यता, जातिवाद आणि महिलांवरील भेदभावाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. बापू म्हणायचे की कोणत्याही समाजाचा विकास तेव्हाच शक्य आहे जेव्हा त्यात सर्वांना समान अधिकार मिळतात.
प्रत्येक गांधी जयंती आपल्याला गांधीजींच्या विचारांचा आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गाचा अवलंब करून काय साध्य करू शकतो याची आठवण करून देते. गांधीजींच्या तत्त्वांचा अंगीकार करून आपण केवळ चांगले माणूस बनू शकत नाही तर आपला समाज आणि देशालाही पुढे नेऊ शकतो. छोट्या छोट्या प्रयत्नांनी मोठ्या समस्याही कशा सोडवता येतात. बापूंना खरी श्रद्धांजली हीच असेल की आपण त्यांचे आदर्श विचार आत्मसात केले पाहिजेत.
गांधीजींचे हे 10 विचार नक्की वाचा
स्वतःला शोधण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे इतरांच्या सेवेत स्वत:ला हरवणे.
आधी ते तुम्हाला दुर्लक्ष करतील, मग तुमच्यावर हसतील, मग तुमच्याशी लढतील, आणि शेवटी तुम्ही जिंकाल.
जेव्हा तुम्ही प्रामाणिक असता, तेव्हा लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात.
कमजोर कधीच क्षमा करू शकत नाहीत. क्षमा करणं हे बलवानाचं लक्षण आहे.
ज्या दिवशी प्रेमाची शक्ती सत्तेच्या प्रेमावर विजय मिळवेल, त्या दिवशी जग शांततेचा अनुभव घेईल.
तुमच्या जीवनाचे ध्येय कोणाला हरवणे नसावे, तर सत्य आणि प्रेमासाठी जगणे असावे.
सत्याला कधीच हरवता येत नाही, त्याला नेहमीच जिंकता येते.
आपण जगात पाहू इच्छिता तो बदल तुम्ही स्वतःमध्ये आणावा.
मानवता हे माझे धर्म आहे. बाकी सर्व गोष्टींचे पालन आपोआप होते.
आपण जगात किती बदल करू शकतो, हे आपल्यावरच अवलंबून आहे.