Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वातंत्र्य दिन 2024: देशाला स्वातंत्र्य मिळाले पण…, या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

आपला स्वातंत्र्य दिन आपण प्रत्येक भारतीय दरवर्षी उत्साहात आणि आनंदामध्ये साजरा करतो. 15 ऑगस्ट 1947 साली भारताला स्वातंत्र्यसैनिकांच्या संघर्षामुळे स्वातंत्र्य मिळाले. या स्वातंत्र्य दिनाशी निगडीत काही रंजक माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

  • By नारायण परब
Updated On: Aug 14, 2024 | 03:48 PM
स्वातंत्र्य दिन 2024: देशाला स्वातंत्र्य मिळाले पण…, या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
Follow Us
Close
Follow Us:

आपण भारताचा 78 वा स्वातंत्र्यदिन अगदी उत्साह आणि आनंदात साजरा करणार आहोत. ब्रिटीशांच्या दीडशे वर्षांच्या गुलामगिरीला धूडकावत आपण 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य झालो. हा सोनेरी दिवस भारतीयांच्या असीम संघर्षातून त्यागामुळे उगवला. अवघ्या जगाला भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे नेहमी कौतुक वाटत आले आहे. या आपल्या देशाच्या  स्वातंत्र्यांशी संबंधी काही रंजक माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

  • 15 ऑगस्ट 1947 रोजी ज्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यावेळी सर्व भारतीय आनंद साजरा करत असाताना स्वातंत्र्य लढ्याचे अग्रणी महात्मा गांधी हे कोलकाता येथे हिंदू मुस्लिम दंगली थांबविण्यासाठी गेले होते.
  • भारताच्या राष्ट्रध्वजाची रचना १९२१ मध्ये पिंगली व्यंकय्या यांनी केली होती. हा भगवा, पांढरा आणि हिरवा, मध्यभागी अशोक चक्र असलेला तिरंगा ध्वज होता. 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रध्वज स्वीकारण्यात आला. भारतीय ध्वज संहितेनुसार 3:2 च्या गुणोत्तरामध्ये तयार केले गेले.
  • लाहोरच्या अधिवेशनामध्ये जवाहरलाल नेहरूंनी 31 डिसेंबर 1929 रोजी रात्री 12 वाजता रावी नदीच्या काठावर प्रथमच नवा तिरंगा फडकवला.
  • भारताच्या 15 ऑगस्ट 1947 या स्वातंत्र्य दिनी देशाचे राष्ट्रगीत नव्हते. गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांनी 1911 मध्ये लिहिलेले जन गण मनला 1950 साली भारताचे राष्ट्रगीत घोषित केले गेले.
  • 15 ऑगस्टपर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणतीही सीमारेषा नव्हती. 17 ऑगस्ट रोजी रॅडक्लिफ रेषा तयार केली गेली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरदार वल्लभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली भारतातील 565 संस्थानांना भारतामध्ये समाविष्ट करण्यात आले.
    आपल्या देशाने कधीच कोणत्या देशावर हल्ला केला नाही.
  • भारत ब्रिटीशांकडून स्वातंत्र्य झाला मात्र गोवा राज्याला त्यावेळी स्वातंत्र्य मिळाले नव्हते. पोर्तुगालने तर त्यांच्या देशाच्या संविधानामध्ये गोवा हे पोर्तुगालचे राज्य आहे असा प्रस्ताव पारित केला होता. 60 च्या दशकात डॉ. राममनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु झाले तेथील लोकांनी पोर्तुगीज राजवटीला विरोध केला शेवटी भारतीय सैन्याने 19 डिसेंबर 1961 रोजी गोव्यातून पोर्तुगीज राज्याचा बिमोड करत. गोव्याला भारतात सामील केले.
  • फोर्ब्स इंडियानुसार 1947 ला भारताचा 1 अमेरिकन डॉलरचे मुल्य हे 3.30 रुपये इतके होते.
  • 15 ऑगस्ट 1972 साली टपाल पिन कोड सुरु करण्यात आला. टपालाशी निगडीत असणारा पिन कोड आज हा पिनकोड आपल्याला कोणत्याही पत्त्याकरिता आवश्यक झाला आहे.
  • 15 ऑगस्ट 1982 साली इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात भारतामध्ये रंगीत दूरचित्रवाणी प्रसारणास सुरु झाले.

Web Title: Independence day 2024 unknown facts about our independence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2024 | 03:45 PM

Topics:  

  • 15 august
  • Independence Day
  • Independence Day 2024

संबंधित बातम्या

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन
1

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

स्वातंत्र्यानंतरच्या 79 वर्षात भारतीय ऑटो इंडस्ट्रीत अनेक गाड्या आल्या, मात्र ‘या’ 5 कारची सर कुणालाच नाही
2

स्वातंत्र्यानंतरच्या 79 वर्षात भारतीय ऑटो इंडस्ट्रीत अनेक गाड्या आल्या, मात्र ‘या’ 5 कारची सर कुणालाच नाही

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘Operation Sindoor’वर भाष्य; म्हणाले, “यामुळे जगाला देखील…”
3

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘Operation Sindoor’वर भाष्य; म्हणाले, “यामुळे जगाला देखील…”

भारत-पाक नकाशा तयार करणाऱ्या व्यक्तीने कधीही पाहिली नव्हती देशांची सीमा; वाचा फाळणीची ‘ती’ न ऐकलेली कहाणी
4

भारत-पाक नकाशा तयार करणाऱ्या व्यक्तीने कधीही पाहिली नव्हती देशांची सीमा; वाचा फाळणीची ‘ती’ न ऐकलेली कहाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.