Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rajiv Gandhi Death Anniversery: सोनिया गांधींना दिली होती राजीव गांधींना घटस्फोटाची धमकी..; काय होता तो किस्सा

राजीव गांधी यांच्या कार्यकाळात दूरसंचार क्रांतीची पायाभरणी झाली. त्यांनी मतदानासाठी वयोमर्यादा 21 वरून 18 वर्षे केली, ज्यामुळे तरुण पिढीला राष्ट्रनिर्माणात सहभागी होण्याची संधी मिळाली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 21, 2025 | 03:29 PM
Rajiv Gandhi Death Anniversery: सोनिया गांधींना दिली होती राजीव गांधींना घटस्फोटाची धमकी..; काय होता तो किस्सा
Follow Us
Close
Follow Us:

भारतातील सर्वात शक्तीशाली राजकारणी नेत्यांमध्ये सोनिया गांधी यांचे नाव सर्वात अग्रस्थानी घेतले जाते. पण एक काळ असाही होता ज्यावेळी सोनिया गांधी राजकारणात येऊ इच्छित नव्हत्या आणि त्यांना त्यांचे पती राजीव गांधी यांनाही राजकारणात जावे अशी इच्छा नव्हती. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना राजीव आणि सोनिया दोघेही राजकारणापासून अत्यंत दूर राहिले. त्यावेळी इंदिरा गांधी यांच्यासोबत संजय गांधी राजकारणात सक्रीय होते. त्यामुळे संजय गांधींनाच इंदिरा गांधींचे उत्तराधिकारी मानले जाऊ लागले. पण जून १९८० मध्ये संजय गांधी यांचे विमान अपघातात अचानक निधन झाले. त्यामुळे इंदिरा गांधी यांचा उत्तराधिकारी कोण, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले होते. संजय गांधी यांच्या पत्नी मनेका गांधींना सुरुवातीपासूनच राजकारणात रस होता पण सोनिया गांधींना मनेका गांधींनी राजकारणात येऊ नये असे वाटत होते.

दुसरीकडे सोनिया गांधींनाही त्यांचे पती राजीव गांधी राजकारणात येऊ नये असे वाटायचे. लेखक रशीद किडवाई लिखीत सोनिया गांधी यांच्या चरित्रात ‘सोनिया: अ बायोग्राफी’ या पुस्तकात याबद्दल काही गोष्टींचे खुलासे केले आहेत. लेखक रशीद किडवाई त्यांच्या पुस्तकात लिहितात, ‘कदाचित सोनिया गांधींनी मनेका गांधी यांचा राजकारणातील प्रवेश रोखला असेल, पण राजीव गांधी यांनी संजय गांधींची जागा घेण्यासही सोनियांचा तितकाच विरोध होता. विशेष म्हणजे, राजीव गांधी राजकारणात गेल्यास त्या त्यांना सोडून पुन्हा इटलीला जातील, अशी धमकीही सोनिया गांधी यांना दिली होती, असही काही राजकीय विश्लेषक सांगतात.

Dinvishesh : तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींची आत्मघाती बॉम्बस्फोटातून हत्या; जाणून घ्या 21 मे चा इतिहास

सोनिया गांधी यांनी राजीव गांधी यांच्या राजकारणातील प्रवेशाला सुरुवातीला कडाडून विरोध केला, पण कालांतराने इंदिरा गांधी यांना राजकारणात राजीव गांधींची गरज आहे, हे त्यांच्या लक्षात आले. किडवाईंनी आपल्या पुस्तकात सोनिया गांधी यांचे म्हणणे उद्धृत करतात, ‘राजीवचे त्यांच्या आईप्रती असलेले कर्तव्य मला समजले. त्याच क्षणी, मला जाणवले की मी त्यावेळच्या व्यवस्थेवर रागावले होते; मी पाहिले की, राजीव गांधींना बळीचा बकरा बनवले जात होते. राजकारण त्यांना बरबाद करेल याची मला पूर्ण खात्री होती. “राजीव गांधींचा राजकारणात प्रवेश हा पर्याय नव्हता पण ते आले कारण त्या जागी इतर कोणीही पात्र नव्हते.’ असही सोनिया गांधी म्हणाल्या होत्या. पण १९८४ मध्ये जेव्हा इंदिरा गांधींची हत्या झाली तेव्हा राजीव गांधींना पंतप्रधानपद स्वीकारावे लागले. त्यानंतर ते देशातील एक शक्तिशाली पंतप्रधान म्हणून उदयास आले.

राजीव गांधी : एका ऐतिहासिक राजकीय युगाची सुरुवात

राजीव गांधी यांची संसदीय कारकीर्द 1981 साली अमेठी मतदारसंघातील पोटनिवडणुकीत दमदार विजयासह सुरू झाली. 31 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांच्या आई इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर, काँग्रेस पक्ष आणि देशाचे नेतृत्व राजीव गांधी यांच्या खांद्यावर आले.फक्त 40 वयाचे असताना, 1984 च्या लोकसभा निवडणुकीत राजीव गांधींनी काँग्रेसला 415 जागा जिंकून दिल्या, ही संख्या त्यांच्या आई इंदिरा गांधी आणि आजोबा जवाहरलाल नेहरू यांच्याही कारकिर्दीत गाठता आली नव्हती. देशाला दु:खाच्या सावटातून बाहेर काढण्याचा आणि सत्तेच्या पारंपरिक चौकटीपासून वेगळी दिशा देण्याचा त्यांचा निर्धार ठाम होता.

बिहारच्या राजकारणात पेटणार का चिराग? दिल्ली दरबारानंतर आता मुख्यमंत्रिपदाची स्वप्नांची होणार साकार?

1985 मध्ये ओडिशाच्या कालाहांडी भागातील दुष्काळग्रस्त परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करताना, त्यांनी स्पष्ट सांगितले होते की “दिल्लीहून पाठवलेला 1 रुपयाचा केवळ 15 पैसेच खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतो.” त्यांच्या स्वच्छ आणि पारदर्शक प्रतिमेमुळेच त्यांना “मिस्टर क्लीन” अशी उपाधी मिळाली होती. राजीव गांधी यांच्या कार्यकाळात दूरसंचार क्रांतीची पायाभरणी झाली. त्यांनी मतदानासाठी वयोमर्यादा 21 वरून 18 वर्षे केली, ज्यामुळे तरुण पिढीला राष्ट्रनिर्माणात सहभागी होण्याची संधी मिळाली. पंचायती राज व्यवस्थेचा मूलभूत आराखडा आणि संकल्पना राजीव गांधी यांनीच तयार करून घेतली होती. हीच व्यवस्था नंतर नरसिंह राव सरकारच्या काळात प्रत्यक्षात आली. राजीव गांधी यांची कारकीर्द ही भारताच्या राजकीय, सामाजिक आणि तांत्रिक परिवर्तनाच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल ठरली.

Web Title: Sonia gandhi was threatened with divorce from rajiv gandhi what was that story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2025 | 03:29 PM

Topics:  

  • Rajiv Gandhi
  • Sonia Gandhi

संबंधित बातम्या

Sonia Gandhi: भाजपचा पलटवार! नागरिकत्व मिळण्यापूर्वीच सोनिया गांधीचं मतदार यादीत नाव, ‘४५ वर्षे जुना कागदपत्र प्रसिद्ध’
1

Sonia Gandhi: भाजपचा पलटवार! नागरिकत्व मिळण्यापूर्वीच सोनिया गांधीचं मतदार यादीत नाव, ‘४५ वर्षे जुना कागदपत्र प्रसिद्ध’

INDIA Alliance Online Meeting : सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्यासाठी ‘मास्टर प्लॅन’; इंडिया आघाडीची ऑनलाईन बैठक पार
2

INDIA Alliance Online Meeting : सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्यासाठी ‘मास्टर प्लॅन’; इंडिया आघाडीची ऑनलाईन बैठक पार

National Herald Case : सोनिया गांधी-राहुल गांधींच्या अडचणीत वाढ, २००० कोटींचा घोटाळा केल्याचा ईडीचा आरोप
3

National Herald Case : सोनिया गांधी-राहुल गांधींच्या अडचणीत वाढ, २००० कोटींचा घोटाळा केल्याचा ईडीचा आरोप

Sonia Gandhi : ‘योग्य भूमिका घ्या, अजूनही वेळ गेली नाही’; इस्रायल-इराण युद्धावरून सोनिया गांधींनी मोदी सरकारला फटकारलं
4

Sonia Gandhi : ‘योग्य भूमिका घ्या, अजूनही वेळ गेली नाही’; इस्रायल-इराण युद्धावरून सोनिया गांधींनी मोदी सरकारला फटकारलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.