अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर मार्केट सपाट; गुंतवणूकदारांची निराशा
भारतीय शेअर बाजारात गेल्या आठवड्यात अस्थिरता पहायला मिळाली. या काळात सेन्सेक्सच्या टॉप १० पैकी ४ कंपन्यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं. तर सहा कंपन्यांचं बाजारमूल्य वाढलं. यापैकी, आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसच्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नफा झाला असून फक्त केवळ पाच दिवसांत तब्बल २५,००० कोटी रुपये कमावले आहेत.
सहा कंपन्यांना नफा झाला, तर चार कंपन्यां तोट्यात
गेल्या आठवड्यात, मुंबई शेअर बाजाराचा ३० शेअर्सचा सेन्सेक्स ४२८.८७ अंकांनी किंवा ०.५५ टक्क्यांनी घसरला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १११ अंकांनी किंवा ०.४७ टक्क्यांनी घसरला. दरम्यान, पाच दिवसांच्या व्यवहारात, मुकेश अंबानींच्या रिलायन्सला सर्वात जास्त नुकसान सहन करावे लागले, तर एलआयसी, एसबीआय आणि आयसीआयसीआय बँक यांचाही तोट्यात चालणाऱ्या कंपन्यांच्या यादीत समावेश झाला. तर इन्फोसिस, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, टीसीएस, एचयूएल आणि आयटीसी यांना फायदा झाला.
शेअर बाजारात केवळ पाच दिवसांच्या व्यवहारात इन्फोसिसच्या गुंतवणूकदारांनी २४,९३४.३८ कोटी रुपये कमावले. कंपनीचे मार्केट कॅप (इन्फोसिस मार्केट कॅप) वाढून ७,७८,६१२.७६ कोटी रुपये झाले. याशिवाय, एचडीएफसी बँकेचे एमकॅप ९,८२८.०८ कोटी रुपयांनी वाढून १२,६१,६२७.८९ कोटी रुपयांवर पोहोचले. याशिवाय, भारती एअरटेलचे बाजारमूल्य ९,३९८.८९ कोटी रुपयांनी वाढून ९,३६,४१३.८६ कोटी रुपये झाले. याशिवाय, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चे मार्केट कॅप 9,262.3 कोटी रुपयांनी वाढून 15,01,976.67 कोटी रुपयांवर पोहोचले. याशिवाय, हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) आणि ITC चे बाजार मूल्य देखील वाढले आहे.
आता आपण अशा कंपन्यांबद्दल बोलूया ज्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना नुकसान पोहोचवले आहे, तर मुकेश अंबानी यांची आरआयएल या यादीत सर्वात वरती आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे (रिलायन्स मॅकॅप) बाजार भांडवल ७४,९६९.३५ कोटी रुपयांनी घसरून १६,८५,९९८.३४ कोटी रुपयांवर आले. याशिवाय, भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) चे मूल्य २१,२५१.९९ कोटी रुपयांनी कमी होऊन ५,१९,४७२.०६ कोटी रुपयांवर आले. स्टेट बँक ऑफ इंडियाचे मार्केट कॅप १७,६२६.१३ कोटी रुपयांनी घसरून ६,६४,३०४.०९ कोटी रुपये झाले आणि आयसीआयसीआय बँकेचे मार्केट कॅप ११,५४९.९८ कोटी रुपयांनी घसरून ८,५३,९४५.१९ कोटी रुपये झाले.
गेल्या आठवड्यात शेअर बाजारातील गोंधळामुळे रिलायन्स इंडस्ट्रीजला मोठे नुकसान सहन करावे लागले असले तरी, देशातील १० सर्वात मौल्यवान कंपन्यांच्या यादीत रिलायन्सने अजूनही नंबर-१ स्थान पटकावले आहे. त्यानंतर टीसीएस, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, स्टेट बँक ऑफ इंडिया, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयटीसी आणि एलआयसी यांचा क्रमांक लागतो.