Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत-चीन वादाचा इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांना फटका; 1.25 लाख कोटींचे नुकसान तर 1 लाख नोकऱ्यांवर पाणी!

केंद्र सरकारकडून चिनी अधिकाऱ्यांच्या व्हिसा अर्जाला मंजुरी देण्यास विलंब केला जात आहे. ज्यामुळे भारतीय इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांना मोठे नुकसान सोसावे लागत असल्याचे कंपन्यांकडून सांगितले जात आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jun 16, 2024 | 12:56 PM
India-China dispute hits Electronics industry 1.25 lakh crore loss 1 lakh jobs lost

India-China dispute hits Electronics industry 1.25 lakh crore loss 1 lakh jobs lost

Follow Us
Close
Follow Us:

इलेक्ट्रॉनिक्स उद्योगामध्ये जागतिक पातळीवर चीनचा दबदबा सर्वश्रुत आहे. आजही प्रत्येक भारतीय घरात सर्रासपणे चिनी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू वापरल्या जातात. मागील काही काळापासून भारत-चीन या दोन देशातील संबंधांमध्ये कटुता निर्माण झाली आहे. मात्र, आता दोन्ही देशांमधील याच वादाचा फटका भारतीय इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाला बसत असल्याचे कंपन्यांना म्हणणे आहे. इतकेच नाही तर मागील ४ वर्षांच्या काळात दोन्ही देशांमधील ताणलेल्या संबंधांमुळे भारतीय इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाला 1.25 लाख कोटींचे नुकसान झाले आहे. तर या क्षेत्रात देशांतर्गत नोकऱ्यांमध्ये देखील जवळपास 1 लाख नोकऱ्यांनी घसरण झाली आहे.

काय म्हटलंय इलेक्ट्रॉनिक्स मैन्युफैक्चरिंग इंडस्ट्रीने?

भारत सरकारकडून चिनी नागरिकांना व्हिसा देण्यात दिरंगाई केली जात आहे. याशिवाय देशात काम करणाऱ्या चिनी कंपन्यांबाबत तपास केला जात आहे. अशातच आता ही आकडेवारी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांच्या माहितीनुसार, इलेक्ट्रॉनिक्स मॅनुफॅक्चरिंग इंडस्ट्रीने म्हटले आहे की, देशाला 10 अब्ज डॉलर अर्थात 83,550 कोटी रुपये निर्यातीचे नुकसान झाले आहे. याशिवाय 2 अब्ज डॉलरचे देखील वाढीव नुकसान झाले आहे.
(फोटो सौजन्य : ओक्टेर)

व्हिसा देण्यात दिरंगाई

इकोनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, भारत सरकारकडून जवळपास ४ ते ५ हजार चिनी अधिकाऱ्यांचे व्हिसा मंजूर करण्यात आलेले नाही. ज्यामुळे भारतीय इलेक्ट्रॉनिक्स मैन्युफैक्चरिंग इंडस्ट्रीला भविष्यातील योजना बनवण्यात अडचणी येत आहेत. विशेष म्हणजे भारत सरकारकडून केवळ १० दिवसांमध्ये बिझनेस व्हिसा मंजूर केला जातो. त्यानुसार इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन (ICEA) आणि मॅनुफॅक्चर्स असोसिएशन ऑफ इन्फॉर्मशन टेक्नोलॉजी या दोन्ही संघटनांनी चिनी अधिकाऱ्यांच्या बिझनेस व्हिसा तात्काळ निर्णय घेण्याची मागणी केली आहे.

चिनी नागरिकांमध्ये तपासाबाबत घबराट

रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, अटक आणि चौकशीच्या भीतीमुळे चिनी नागरिक भारतात येण्यासाठी घाबरत आहे. भारताकडून चिनी कंपन्यांच्या गुंतवणुकीबाबत अधिक तपास केला जात असल्याने, स्थानिक भारतीय इलेक्ट्रॉनिक्स मॅनुफॅक्चरिंग इंडस्ट्रीला उद्योगामध्ये अडचणी येत आहेत. या कंपन्या भारत सोडण्याचा विचार करत असतील तर ग्राहकांसह निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांना देखील फटका बसणार आहे.

Web Title: India china dispute hits electronics industry 1 25 lakh crore loss 1 lakh jobs lost

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2024 | 12:56 PM

Topics:  

  • Business News
  • India-China Disputes

संबंधित बातम्या

Foreign Policy : भारतीय राजदूतांना चीनला गेल्यावर का बदलावी लागतात नावे? नेहरूंच्या काळातील ‘ती’ प्रथा आजही कायम
1

Foreign Policy : भारतीय राजदूतांना चीनला गेल्यावर का बदलावी लागतात नावे? नेहरूंच्या काळातील ‘ती’ प्रथा आजही कायम

Life Insurance News: भारतीय कुटुंबांचा ‘आर्थिक कणा’ ठरतोय जीवन विमा; एका वर्षात 6.30 लाख कोटी रुपयांचे लाभ वितरित!
2

Life Insurance News: भारतीय कुटुंबांचा ‘आर्थिक कणा’ ठरतोय जीवन विमा; एका वर्षात 6.30 लाख कोटी रुपयांचे लाभ वितरित!

Danone India चा मोठा विक्रम! २०,९११ आरोग्य तज्ञांच्या प्रतिज्ञेसह अॅनिमियाविरोधात ‘Iron Up’ मोहीम
3

Danone India चा मोठा विक्रम! २०,९११ आरोग्य तज्ञांच्या प्रतिज्ञेसह अॅनिमियाविरोधात ‘Iron Up’ मोहीम

Trump च्या निर्णयाने बाजार उसळला, GIFT Nifty 4% ने वाढला, 23,000 चा आकडा पार होण्याची आशा
4

Trump च्या निर्णयाने बाजार उसळला, GIFT Nifty 4% ने वाढला, 23,000 चा आकडा पार होण्याची आशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.