Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Airtel India चे एमडी आणि सीईओ म्हणून शाश्वत शर्मा यांची नियुक्ती, 1 जानेवारीपासून पदभार स्वीकारणार

भारती एअरटेल कंपनीच्या नेतृत्वबदलाची घोषणा करण्यात आली आहे. गोपाळ विठ्ठल यांची पदोन्नती झाली असून, नव्या वर्षात शाश्वत शर्मा व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्विकारणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 19, 2025 | 01:19 PM
Airtel India चे एमडी आणि सीईओ म्हणून शाश्वत शर्मा यांची नियुक्ती, 1 जानेवारीपासून पदभार स्वीकारणार

Airtel India चे एमडी आणि सीईओ म्हणून शाश्वत शर्मा यांची नियुक्ती, 1 जानेवारीपासून पदभार स्वीकारणार

Follow Us
Close
Follow Us:
  • गोपाळ विठ्ठल यांची पदोन्नती!
  • शाश्वत शर्मा बनले Airtel इंडियाचे नवे MD आणि CEO
  • 1 जानेवारीपासून स्विकारणार पदभार
भारती एयरटेल लिमिटेडने गुरुवारी एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने सांगितलं आहे की, शाश्वत शर्मा यांची कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर पदी निवड करण्यात आली आहे. शाश्वत शर्मा 1 जानेवारीपासून कंपनीचा पदभार हाती घेणार आहेत. शाश्वत शर्मा आता गोपाळ विठ्ठल यांची जागा घेणार आहेत. गोपाळ विठ्ठल 1 जानेवारीपासून भारती एयरटेलमध्ये एग्जीक्यूटिव VC चा पदभार संभाळणार आहेत. एक एक्सचेंज फाइलिंगनुसार, कंपनीने अखिल गर्गला भारती एयरटेल इंडियाचे चीफ फाइनेंशियल ऑफिसर म्हणून नियुक्त केले आहे. टेलीकॉम कंपनीने सौमेन रे यांची ग्रुप चीफ फाइनेंशियल ऑफिसरपदी निवड केली आहे. शाश्वत शर्मा सध्या भारती एयरटेल लिमिटेडमध्ये चीफ ऑपरेशन्स ऑफिसरपदी काम करत असून त्यांची 1 जानेवारी 2026 पासून कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसरपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Stock Market Today: शेअर बाजारात आज पॉझिटिव्ह ओपनिंगचे संकेत! तज्ज्ञांनी केली ‘या’ शेअर्सची शिफारस, जाणून घ्या सविस्तर

गोपाळ विठ्ठल यांनी 10 वर्षांहून अधिक काळ कंपनीच्या एमडी आणि सीईओ पदावर काम केलं आहे. यादरम्यान कंपनीने मोबाईल, B2B, होम ब्रॉडबँड, DTH आणि डिजिटल सेवांमध्ये बिजनेसचा एक पोर्टफोलियो बनवला. मोबाईल सेक्टरमध्ये विठ्ठल यांच्या नेतृत्वात एयरटेलचा रेवेन्यू शेयर 30% नी वाढून 40% झाले. कंपनीने जारी केलेल्या मागील रिलीजनुसार, विठ्ठल आता पूर्ण ग्रुपमध्ये टेलीकॉमसंबंधित जबाबदाऱ्या संभाळणार आहेत. (फोटो सौजन्य – LinkedIn) 

भारतातील दुसऱ्या सर्वात मोठ्या दूरसंचार कंपनीच्या संचालक मंडळाने, भागधारकांच्या मंजुरीच्या अधीन राहून, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गोपाल विट्टल यांची १ जानेवारी २०२६ पासून पाच वर्षांसाठी कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून नियुक्तीलाही मंजुरी दिली आहे.

गेल्या १३ वर्षांपासून गोपाळ विठ्ठल भारती एअरटेलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी पदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडत आहेत. ऑक्टोबर २०२४ रोजी कंपनीच्या सुनियोजित उत्तराधिकार प्रक्रियेचा भाग म्हणून गोपाळ विठ्ठल यांची भारती एअरटेल लिमिटेडच्या उपाध्यक्षपदीदेखील नियुक्ती करण्यात आली. आता गोपाळ विठ्ठल यांचा कार्यकाळ संपला असून कंपनीच्या नेतृत्वात बदल करण्यात आले आहेत. गोपाल विठ्ठल यांच्याजागी शाश्वत शर्मा यांची कंपनीचे नियोजित मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या वर्षांत शर्मा या नव्या पदाचा कार्यभार स्विकारणार आहेत.

१ जानेवारी २०२६ पासून गोपाळ विठ्ठल कंपनीच्या कार्यकारी उपाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतील. गोपाळ विठ्ठल यांच्याकडे भारती एअरटेल कंपनीसह सर्व उपकंपन्यांच्या कामकाजाचे नेतृत्व आणि देखरेख करण्याची महत्त्वाची जबाबदारी असेल. गोपाळ विठ्ठल डिजिटल व तंत्रज्ञानासंबंधीच्या कामकाजांसह विविध निर्णय प्रक्रियेत सहभागी असतील. यामध्ये नेटवर्क धोरण, विविध कामकाजांविषयीची खरेदी प्रक्रिया तसेच मानव संसाधन या विविध विभागांच्या कामकाजांचे समन्वय साधणे तसेच या सर्व प्रक्रियेत समूहाची एकात्मता वाढवणे आदी कामकाजांचा समावेश असणार आहे. समूहाची धोरणात्मक दिशा ठरवणे आणि संस्थेला भविष्यातील बदलांसाठी सक्षम तसेच सज्ज करणे यावर त्यांचा विशेष भर असणार आहे. भविष्यकालीन नवकल्पना, तांत्रिक प्रगती आणि दीर्घकालीन वाढ सुनिश्चित करण्यासाठी गोपाळ विठ्ठल यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

१ जानेवारीपासूनच शाश्वत शर्मा भारती एअरटेल इंडियाचे नवे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची धूरा सांभाळतील. गेल्या वर्षभरापासून शर्मा नव्या जबाबदारीच्या पूर्वतयारीचा सखोल अभ्यास करत आहेत. शर्मा हे नियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी या पदनामासह गोपाळ विठ्ठल यांच्यासोबत आगामी नियुक्त पदाची संपूर्ण माहिती घेत आहेत. त्यांनी पूर्वतयारी प्रक्रियेतच कंपनीच्या विविध कामकाजांचा जवळून अनुभव घेतला आहे. नवीन पदभार स्विकारल्यानंतर ते गोपाळ विठ्ठल यांना कामकाजाचा अहवाल देत राहतील.

सध्या सौमेन रे भारती एअरटेल इंडियाच्या मुख्य आर्थिक अधिकारी पदावर काम करत आहेत. पण येत्या काळात समूहाच्या मुख्य आर्थिक अधिकारी पदावर त्यांनी निवड केली जाणार आहे. गोपाळ विठ्ठल यांच्या मार्गदर्शनाखाली सौमेन रे नव्या पदाचे कामकाज पाहणार आहेत. अखिल गर्ग सध्या कंपनीचे फायनान्शिअल कंट्रोलर म्हणून काम पाहत आहेत. येत्या काळात भारती एअरटेल इंडियाचे मुख्य आर्थिक अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती केली जाणार आबे. गर्ग गेल्या १२ वर्षांपासून कंपनीच्या कामकाजात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. या काळात त्यांनी हेक्साकॉम आयपीओ यांसारख्या मोठ्या आणि महत्त्वाच्या व्यावसायिक प्रकल्पांचे यशस्वीरित्या नेतृत्व केले. शाश्वत शर्मा आणि सौमेन रे यांच्या देखरेखीअंतर्गत अखिल गर्ग नव्या पदाचे कामकाज पाहतील.

सध्या संयुक्त कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या रोहित पुरी यांचा देखील कार्यकाळ आता संपणार आहे. आता पुरी कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी म्हणून सर्व कामकाज पाहतील. ग्रुप कंपनी सचिव पंकज तिवारी हे गट स्तरावर आपले नेतृत्व आणि देखरेख कायम ठेवणार असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीच्या धोरणात्मक कामकाजाची प्रक्रिया सुरु राहील.

Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीच्या दरात मोठा बदल? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या आजचे भाव

कंपनीच्या नेतृत्वबदलाबदद्ल भारती एअरटेलचे अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांनी सांगितलं की, ‘‘एअरटेलमधील नेतृत्वाचा वारसा सोपवण्याची ही प्रक्रिया ज्या पद्धतीने पार पडली, त्याबद्दल मला अतिशय आनंद वाटत आहे. बदल आणि सातत्य हे दोन्ही एकत्रितपणे पुढे नेण्याचा यापेक्षा योग्य काळ असू शकत नाही. मला ठाम विश्वास आहे की, गोपाळ आणि शाश्वत हे दोघे भविष्यातही कंपनीच्या प्रगतीचा आणि यशाचा वेग कायम ठेवतील. मी दोघांनाही नवीन जबाबदा-यांसाठी मनापासून शुभेच्छा देतो.’’

मित्तल यांनी कंपनीच्या भविष्याची वाटचाल सुयोग्य दिशेने सुरु असल्याचेही सूतोवाच दिले. ‘‘कंपनीत अत्यंत उत्साही, कुशल आणि व्यावसायिक व्यवस्थापकीय संघ कार्यरत असल्याचा मला अभिमान आहे. आम्ही नावीन्यपूर्ण उद्योजकीय कौशल्याच्या जोरावर जगभरातील कोट्यावधी ग्राहकांना सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि जागतिक दर्ज्याच्या सेवा पुरवत आहोत. मी गोपाळ तसेच संपूर्ण टीमसोबत काम करण्यास उत्सुक आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वोत्तम दूरसंचार कंपनी उभारण्याच्या आमच्या महत्त्वकांक्षेकडे वाटचाल करताना आम्ही हीच गुणवत्ता, सातत्या आणि नवकल्पनांची परंपरा पुढे नेण्याचा आमचा संकल्प आहे. ’’,असा निर्धार मित्तल यांनी व्यक्त केला.

Web Title: Shashwat sharma become new airtel md and ceo he will takeover company work from 1 january tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2025 | 01:07 PM

Topics:  

  • airtel
  • Airtel news

संबंधित बातम्या

Bharti Airtel New CEO: भारती एअरटेलमध्ये सत्ताबदल! नवे CEO म्हणून शाश्वत शर्मा यांची नियुक्ती, तर उपाध्यक्षपदी गोपाळ विठ्ठल 
1

Bharti Airtel New CEO: भारती एअरटेलमध्ये सत्ताबदल! नवे CEO म्हणून शाश्वत शर्मा यांची नियुक्ती, तर उपाध्यक्षपदी गोपाळ विठ्ठल 

Truecaller ला टक्कर? आता अनोळखी कॉलवरही दिसणार थेट नाव; टेलिकॉम कंपन्यांचा मोठा निर्णय
2

Truecaller ला टक्कर? आता अनोळखी कॉलवरही दिसणार थेट नाव; टेलिकॉम कंपन्यांचा मोठा निर्णय

Airtel Recharge Plan: कंपनीने कमी केले ‘या’ प्लॅन्सचे डेटा बेनिफिट्स, यूजर्स झाले नाराज! जाणून घ्या
3

Airtel Recharge Plan: कंपनीने कमी केले ‘या’ प्लॅन्सचे डेटा बेनिफिट्स, यूजर्स झाले नाराज! जाणून घ्या

Recharge Plan: आत्ताच रिचार्ज करा, 2026 संपेपर्यंत सुरु राहिल प्लॅन, हे आहेत जिओ आणि एअरटेलचे रिचार्ज प्लॅन
4

Recharge Plan: आत्ताच रिचार्ज करा, 2026 संपेपर्यंत सुरु राहिल प्लॅन, हे आहेत जिओ आणि एअरटेलचे रिचार्ज प्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.