Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हमीभावाचा नुसताच गाजावाजा..! राज्यात गेल्या 8 महिन्यापासून सोयाबीन दर हमीभावापेक्षा कमीच!

केंद्र सरकारने बुधवारी (ता.19) रात्री झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत यंदाच्या खरीप हंगामातील १४ पिकांच्या हमीभावात वाढ करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सरकारकडून केवळ एक सोपस्कार ही म्हणून प्रथा पाळली जात असल्याचे मागील आठ महिन्यातील सोयाबीन दरांवरून पाहायला मिळत आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jun 22, 2024 | 03:27 PM
राज्यात गेल्या ८ महिन्यापासून सोयाबीन दर हमीभावापेक्षा कमीच

राज्यात गेल्या ८ महिन्यापासून सोयाबीन दर हमीभावापेक्षा कमीच

Follow Us
Close
Follow Us:

केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करत, कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत खरीप हंगामातील १४ पिकांच्या हमीभावांमध्ये वाढ केली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे काही मंडळींकडून स्वागत देखील करण्यात आले आहे. मात्र, गेल्या नोव्हेंबर २०२३ पासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाला हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना गेल्या हंगामात सोयाबीन पिकाचा उत्पादन खर्च देखील मिळाला नसल्याची खंत अनेकदा शेतकऱ्यांनी व्यक्त करून दाखवली आहे. त्यामुळे आता केंद्राकडून पिकांसाठी हमीभाव जाहीर करणे ही प्रथा केवळ सोपस्कार म्हणून पाळली जात आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आठ महिन्यापासून हमीभावापेक्षा कमी दर

केंद्र सरकारने 2023-24 च्या खरीप हंगामात सोयाबीनसाठी 4600 रुपये हमीभाव निर्धारित केला होता. ज्यात यंदाच्या 2024-25 च्या हंगामासाठी २९२ रुपयांनी वाढ करत तो यावर्षी ४८९२ रुपये प्रति क्विंटल इतका निर्धारित करण्यात आला आहे. मात्र, केंद्र सरकारने सोयाबीन पिकाच्या हमीभावात वाढ केली असली तरी, राज्यातील प्रमुख 48 बाजार समित्यांपैकी सध्या सोयाबीनला केवळ बाजार समित्यांमध्ये मागील वर्षीच्या हमीभावाइतका (४६०० रुपये प्रति क्विंटल) दर मिळत आहे. ज्यामुळे केंद्र सरकारने हमीभाव जाहीर करून देखील मागील सात ते आठ महिन्यांपासून शेतकऱ्यांना सोयाबीनला योग्य दर मिळत नसल्याचे चित्र आहे.
(फोटो सौजन्य : istock)

केवळ ‘या’ २ बाजार समित्यांमध्ये ४६०० रुपयांहून अधिक दर

सध्याच्या घडीला नागपूर जिल्ह्यातील उमरेड बाजार समितीमध्ये सध्या सोयाबीनला कमाल 4630 रुपये, किमान 4000 रुपये तर सरासरी 4300 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. याशिवाय वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट बाजार समितीमध्ये कमाल 4620 रुपये, किमान 2800 रुपये तर सरासरी 3800 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. या दोन बाजार समित्या सोडल्या तर अन्य कोणत्याही बाजार समितीत सध्या सोयाबीनला गेल्या वर्षीच्या हमीभावापेक्षा अर्थात ४६०० रुपयांहून अधिक दर मिळत नाहीये. अर्थात ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.

अनेकांचा सोयाबीन घरात

दरम्यान, गेल्या आठ महिन्यांपासून सोयाबीन दराने शेतकऱ्यांना रडवले आहे. नोव्हेंबर २०२३ महिन्यात सोयाबीन ५००० रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळत होता. मात्र, त्यानंतर घसरण झालेल्या सोयाबीन दरात अद्यापही सुधारणा झालेली नाही. ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सध्या आपला सोयाबीन घरातच साठवून ठेवल्याचे सांगितले जात आहे. तर खरिपाचा हंगाम सुरु झाला असताना, खते बियाणे यासाठीच्या भांडवल उभारणीसाठी पैसेच नसल्याने, गेल्या वर्षीचा सोयाबीन घरात किती दिवस ठेवायचा? असा सवालही अनेक शेतकरी उपस्थित करत आहेत.

Web Title: Soybean rate in maharashtra for the last 8 months is less than the msp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2024 | 03:25 PM

Topics:  

  • Agriculture News
  • Soyabean Rate

संबंधित बातम्या

फणसकिंग ठरलेले रत्नागिरी येथील देसाई पितापुत्राची आधुनिक शेतीतील यशोगाथा; फणस शेतीतून कमावतात कोट्यवधी
1

फणसकिंग ठरलेले रत्नागिरी येथील देसाई पितापुत्राची आधुनिक शेतीतील यशोगाथा; फणस शेतीतून कमावतात कोट्यवधी

बजेट, उत्पादन, MSP पासून KCC पर्यंत; गेल्या ११ वर्षांत देशाच्या कृषी क्षेत्रात झाले महत्वाचे बदल
2

बजेट, उत्पादन, MSP पासून KCC पर्यंत; गेल्या ११ वर्षांत देशाच्या कृषी क्षेत्रात झाले महत्वाचे बदल

Mosoon Update : पेरणीची घाई करू नका : राज्य सरकारचं शेतकऱ्यांना आवाहन
3

Mosoon Update : पेरणीची घाई करू नका : राज्य सरकारचं शेतकऱ्यांना आवाहन

दुकानदारांनो सावधान! शेतकऱ्यांची फसवणूक पडेल महागात; कृषी विभागाकडून भरारी पथके तयार
4

दुकानदारांनो सावधान! शेतकऱ्यांची फसवणूक पडेल महागात; कृषी विभागाकडून भरारी पथके तयार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.