
प्राध्यापक, सायंटिस्ट पदाची नोकरी सोडली; व्यवसायात उतरला, कमावतोय वर्षाला 2 कोटी रुपये!
सध्याच्या घडीला अनेक तरुण नोकरीऐवजी व्यवसाय करण्यास प्राधान्य देत आहे. विशेष म्हणजे शिक्षण आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर या तरुणांना व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात यश देखील मिळत आहे. याशिवाय आधुनिक संसाधने आणि समाजमाध्यमांच्या वापरामुळे हे तरुण आपल्या व्यवसायाचे मोठ्या प्रमाणात ब्रॅंडिग देखील करत आहे. ज्यामुळे त्यांना अल्पावधीत आपला व्यवसाय वाढवण्यास मदत होत आहे. आज आपण अशाचा तरुण व्यावसायिकाची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी आपल्या नोकरीला रामराम ठोकत, एस टी कॅब्स नावाने स्टार्टअप कंपनी सुरु आहे. ज्यातून तो वर्षाला तब्बल २ कोटींची कमाई करत आहे.
सहाय्यक प्राध्यापक, सायंटिस्ट म्हणून केलंय काम
उथया कुमार असे या तरुणाचे नाव असून, तो तामिळनाडू राज्यातील कन्याकुमारी जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील रहिवासी आहे. उथया कुूमार यांनी संख्याशास्त्र विषयात एम.फिल. पीएचडीपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी काही काळ एका कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले. त्यानंतर ते भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोमध्ये सायंटिस्ट या पदावर कार्यरत होते. मात्र, त्यांनी आपली नोकरी सोडून, व्यावसायात उतरण्याचा धाडसी निर्णय घेतला.
किती होतीये वार्षिक कमाई
त्यानुसार त्यांनी २०१७ मध्ये एस टी कॅब्स नावाने स्टार्टअप कंपनी सुरु केली. त्यांच्याकडे सध्याच्या घडीला ३७ टॅक्सी असून, आपल्या या कंपनीच्या माध्यमातून ते वर्षाला २ कोटींची कमाई करत आहे. उथया हे ट्रक्सी ड्रायव्हर्सना आपले व्यावसायिक पार्टनर मानतात. टॅक्सी ड्रायव्हर्स प्रती उथया कुमार याची असलेली ही प्रेमाची भावना व्यवसाय वृद्धीसाठी मदतीची ठरली आहे. इतकेच नाही तर ते आपल्या कंपनीच्या कमाईतील ३० टक्के रक्कम ही ड्रायव्हर्सवर खर्च करतात. ज्यामुळे त्यांच्याकडे टॅक्सी ड्रायव्हर नेहमीसाठी जोडून राहण्यास मदत झाली आहे.
सुरुवातीच्या काळात झेलले नुकसान
व्यवसाय सुरु केल्यानंतर उथया कुमार यांना मोठा संघर्ष करावा लागला. त्यांनी काही काळ व्यवसाय केल्यानंतर त्यांना कोरोना काळात मोठे नुकसान झेलावे लागले. मात्र, त्यातूनही मार्ग काढत ते आज यशस्वीरित्या व्यवसायात उभे राहिले आहे. त्यामुळे आता २०१७ साली सुरु झालेल्या उथया कुमार यांच्या कंपनीने सुरुवातीच्या काळातच नुकसान झेलल्यानंतर फिनिक्स भरारी घेतली आहे. त्यामुळे त्यांची ही यशोगाथा अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.