Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कमी गुणांमुळे हताश होऊ नका! ‘Marks आयुष्य ठरवत नसतात’ याचे उदाहरण सांगणारी यशोगाथा…

गुण हे अंतिम सत्य नसून केवळ एक टप्पा आहेत. आयपीएस दिनेश कुमार गुप्ता यांच्या प्रेरणादायी प्रवासातून शिकण्यासारखे आहे की कमी गुण मिळाले तरी आत्मविश्वास ठेवल्यास यश नक्की मिळते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 28, 2025 | 09:24 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

आपल्याला परीक्षेत मिळालेले गुण आपले आयुष्य ठरवत नाहीत. कमी गुण मिळाले म्हणून आपले आयुष्य संपत नाही. कमी गुण मिळाले म्हणून हताश होऊ नका नव्या ऊर्जेने उभा राहा आणि नवीन दिशा शोधण्यास सुरु करा. दिल्ली पोलिसांच्या वाहतूक विभागात अतिरिक्त पोलीस आयुक्त असलेले आयपीएस दिनेश कुमार गुप्ता यांची कथा याच गोष्टीची साक्ष देते. बारावीत त्यांना केवळ 58% गुण मिळाले होते, त्यामुळे त्यांना वाटले की आता पुढे काय करायचे? पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी बीएससी पूर्ण केली, त्यानंतर एमबीए केले आणि शेवटी यूपीएससी परीक्षेची तयारी करत आयपीएस अधिकारी बनले.

रेल्वे भरती 2025: 9,970 सहाय्यक लोको पायलट पदांसाठी संधी; अधिसूचना जाहीर

सध्या शाळांमध्ये परीक्षा संपत आल्या असून निकाल लवकरच जाहीर होणार आहेत. दहावी आणि बारावीच्या निकालांची प्रतीक्षा असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना आणि पालकांना याची चिंता सतावू लागली आहे. विशेषतः कमी गुण मिळाल्यास भविष्यात काय करायचे, या विचाराने विद्यार्थी घाबरतात. दिनेश कुमार गुप्ता सांगतात की, बारावीत आजारी असल्यामुळे त्यांचे गुण कमी आले. त्यामुळे ते डॉक्टर किंवा अभियंता होऊ शकणार नाहीत, असे त्यांना वाटू लागले. समाज काय म्हणेल, या विचारानेही ते चिंतेत होते. मात्र त्यांनी परिस्थितीशी लढण्याचे ठरवले. ते म्हणतात, “गुणांपुढे हार मानू नका. थोडा वेळ निराश वाटू शकते, पण पुन्हा उभे राहून नवीन दिशा शोधा. जीवनात कोसळल्यावर पुन्हा उभे राहता आले पाहिजे. मला स्वतःला सिद्ध करायचे होते आणि मी ते केले.”

पदभरती महाराष्ट्राची, परीक्षा गुजरातमध्ये! विद्यार्थ्यांची मुख्यमंत्र्यांकडे धाव

सीबीएसईच्या काउंसिलिंग प्रोग्रामच्या माजी प्रोजेक्ट प्रमुख रमा शर्मा म्हणतात की, “निकाल हा केवळ एक टप्पा आहे, तो शेवट नाही. तीन तासांच्या परीक्षेवरून विद्यार्थ्यांची खरी क्षमता मोजता येत नाही. त्यामुळे गुणांच्या आधारे स्वतःची तुलना करू नका किंवा निराश होऊ नका.” परीक्षा म्हणजे आपल्यातील उणीवा शोधण्याचा एक मार्ग आहे. पालकांनीही मुलांची तुलना दुसऱ्यांशी करू नये. कमी गुण आले तरीही सर्वप्रथम शिक्षक आणि पालकांशी बोलावे. आत्मविश्वास गमावू नका, कारण आज करिअरसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. निकालानंतर आपल्या आवडीचा विचार करून योग्य क्षेत्र निवडावे.

Web Title: A success story that illustrates that marks do not determine life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2025 | 09:24 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.