Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आपल्या खास शिलेदारासाठी राज ठाकरेंची सभा; प्रचारच्या शेवटच्या दिवशी तुफान टोलेबाजी

राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचाराची सांगता अवघ्या काही वेळामध्ये होत आहे. त्यासाठी राज ठाकरे यांनी काळाचौकी येथे शेवटची प्रचार सांगता सभा घेतली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 18, 2024 | 04:45 PM
MNS Raj Thackeray targeted Uddhav Thackeray and Rahul Gandhi in last election sabha

MNS Raj Thackeray targeted Uddhav Thackeray and Rahul Gandhi in last election sabha

Follow Us
Close
Follow Us:

काळाचौकी : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आज शेवटचा दिवस आहे. प्रचारासाठी अवघे काही तास शिल्लक असताना मुंबईमध्ये राज ठाकरे यांनी प्रचारसभा घेतली आहे. काळाचौकी परिसरामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या खास शिलेदारासाठी सभा घेतली आहे. प्रचाराच्या रणधुमाळीतील या शेवटच्या सभेमध्ये राज ठाकरे यांनी महायुती व महाविकास आघाडी दोघांवर जोरदार निशाणा साधला.

राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातील शेवटची सभा ही काळाचौकी येथे बाळा नांदगावकर यांच्यासाठी घेतली. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, शेवटची प्रचारसभा बाळा नांदगावकर यांच्यासाठी घ्यायची ही त्यांची इच्छा होती. या सभेच्या निमित्ताने मी अनेकांची दिलगिरी आणि धन्यवाद व्यक्त करतो. महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न खोळबलेले आणि लोंबकळलेले आहेत. मी महाराष्ट्र दौरा केला. तेव्हा मी पाहिलं की अत्यंत वाईट परिस्थिती ही महाराष्ट्राची आहे. गावातील मुलं मुंबई पुण्यात जायचा विचार करतात तर शहरातील मुलं परदेश जाण्याचा विचार करत आहेत, असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुढे राज ठाकरे म्हणाले की, “राज्यामध्ये अनेक विषय आहेत. पण हे प्रश्न सुटले नसल्यामुळे या लोकांनी निवड़णुकीमध्ये मतदारांचे लक्ष वेगळीकडे वळवलं आहे. हिंदुत्वाने भारावलेल्या महाराष्ट्रामध्ये जातींजातींमध्ये भांडणं लावण्याचं काम शरद पवार यांनी केलं. आता यातून तरी महाराष्ट्र बाहेर आला पाहिजे. राज्यात आहे ते सगळे पक्ष मेले तरी चालतील पण मंहाराष्ट्र जगला पाहिजे. उत्तर प्रदेश व बिहारमध्ये जे राजकारण चालतं ते महाराष्ट्रामध्ये होऊ नये. अत्यंत भीषण परिस्थिती सध्या आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या जन्मानंतर या सर्व गोष्टी सुरु झाल्या. संताची शिकवण, एकोपा हे यांच्या स्वार्थी राजकारणासाठी सगळं विसरुन चाललो आहे. त्यांना स्वार्थाशिवाय काहीही दिसत नाही, असा घणाघात राज ठाकरे यांनी केला.

हा मतांचा अपमान नाही का? 

पुढे राज ठाकरे म्हणाले की, “मुख्यमंत्रिपदाची माळ गळ्यात पडण्यासाठी ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्यांच्याबरोबर जाऊन हे नेते बसले. मतदारांना काहीही सांगितलं नाही अन् विचारलं नाही. हा मतदारांच्या मताचा अपमान नाही का? स्वार्थासाठी एकत्र बसतात हे कोणतं राजकारण आहे. मी देशाच्या राजकारणामध्ये अशी गोष्टच बघितली नाही. जातींचं राजकारण करुन या सगळ्या गोष्टी विसरायला लावत आहेत. आता महापुरुष सुद्धा वाटून घेतली आहेत. विनाकारण जातींमध्ये वाटप केलं जातं आहे. या दुसऱ्या जातींबद्दल द्वेष निर्माण केल्यामुळे परिस्थिती भीषण आहे. यातून महाराष्ट्र वाचवला पाहिजे,” असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.

राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर

राज ठाकरे म्हणाले की, “निवडणूका येतात जातात. उमेदवार पडतात अन् निवडणून येतात. पण एकदा का राज्याचं व्याकरणं बिघडलं की सुधारता येणार नाही. मी जो प्रयत्न करतो आहे तो हा करतो आहे. मशिदींवरचे भोंगे मी खाली आणायला लावले. आले पण खाली अन् बंदी झाले. उद्धव ठाकरे हे तेव्हा मुख्यमंत्री होते. 17 हजार माझ्या मनसैनिकांवर केसेसे टाकल्या. बाळासाहेब ठाकरे यांनी देखील मशीदवरील भोंगे खाली करण्याचे सांगितले होते. ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? तुमचा कल कुठे आहे ते कळलं आहे आता,” असा घणाघात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर केला.

राहुल गांधीला अक्कल नाही

राज ठाकरे यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “राहुल गांधीला अक्कल पण नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करतात. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा बघून ते तोंड फिरवतात. त्यांच्याबरोबर जाऊन हे बसले आहेत. का बसले होते तर स्वतःचा स्वार्थ साध्य करण्यासाठी आणि मुख्यमंत्रिपदासाठी गेले. एका माणसानं सगळा पक्ष संपवला. जे लोक गेले त्यांना ते गद्दार बोलत आहेत. पण गद्दार तर घरात बसले आहेत. ज्यांनी पक्षाची गद्दारी केली,” असा घणाघात राज ठाकरे यांनी आपल्या प्रचाराच्या अखेरच्या सांगता सभेमध्ये केला.

Web Title: Mns raj thackerays last speech in maharashtra election campaign 2024 for bala nandgawakar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2024 | 04:45 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • raj thackeray

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.