Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खुशखबर! Air India ने लगेज नियमात केला मोठा बदल; प्रवासाला निघण्यापूर्वी जाणून घ्या ‘हा’ महत्त्वाचा नियम

प्रवाशांना फक्त 20 किलोपर्यंत सामान चेक-इन करण्याची परवानगी होती. मात्र, नियमात बदल करून प्रवाशांना 10 किलो अतिरिक्त सामानाची सुविधा देण्यात आली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Feb 26, 2025 | 11:53 AM
Air India increased the check-in luggage limit from 20 kg to 30 kg

Air India increased the check-in luggage limit from 20 kg to 30 kg

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. एअर इंडिया एक्सप्रेसने आपल्या बॅगेज पॉलिसीमध्ये मोठा बदल करत प्रवाशांना अतिरिक्त सामान नेण्याची मुभा दिली आहे. या नव्या नियमांनुसार, प्रवाशांना 7 किलो केबिन बॅगेजसह आता 30 किलोपर्यंत चेक-इन बॅगेज नेण्याची परवानगी मिळणार आहे. याआधी ही मर्यादा 20 किलो होती. त्यामुळे प्रवाशांना आता 10 किलो अतिरिक्त सामान घेऊन जाण्याची सुविधा मिळणार आहे.

बॅगेज धोरणात महत्त्वाचे बदल

एअर इंडियाच्या नव्या नियमांनुसार, प्रवाशांना 30 किलोपर्यंतचे चेक-इन बॅगेज नेण्याची संधी देण्यात आली आहे. याशिवाय, दोन केबिन बॅगेज नेण्याचीही मुभा असेल. मात्र, दोन्ही पिशव्यांचे एकूण वजन 7 किलोच्या मर्यादेत असावे. यात लॅपटॉप बॅग, हँडबॅग, बॅकपॅक किंवा लहान आकाराच्या बॅग समाविष्ट असतील. एअर इंडियाने स्पष्ट केले आहे की, केबिन बॅगेजचा आकार 40 सेमी x 30 सेमी x 10 सेमी पेक्षा जास्त नसावा. या नियमामुळे बॅगेज प्रवासादरम्यान समोरच्या सीटखाली व्यवस्थित ठेवता येईल. विमान प्रवास अधिक आरामदायक करण्याच्या दृष्टीने एअर इंडियाने हा निर्णय घेतला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nostradamus Prediction : नॉस्ट्राडेमसची ‘ही’ भविष्यवाणी आहे आणि पोप फ्रान्सिस यांच्या प्रकृतीशी संबंधित

मुलांसह प्रवास करणाऱ्या कुटुंबांना विशेष सवलत

लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या कुटुंबांसाठी एअर इंडिया एक्सप्रेसने विशेष सुविधा जाहीर केली आहे. अशा कुटुंबांना 40 किलो चेक-इन बॅगेज आणि 7 किलो केबिन बॅगेजसह एकूण 47 किलो वजन नेण्याची परवानगी असेल. ही सुविधा कुटुंब प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.

सर्व फ्लाइट्सवर सुविधा लागू नाही

नव्या बॅगेज पॉलिसीचा लाभ घेण्याच्या तयारीत असलेल्या प्रवाशांनी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी ही सुविधा एअर इंडिया एक्सप्रेसच्या सर्व फ्लाइट्ससाठी लागू नाही. एअर इंडियाच्या अधिकृत घोषणेनुसार, ही सुविधा केवळ भारत, मध्य पूर्व आणि सिंगापूरमधील आंतरराष्ट्रीय फ्लाइट्ससाठीच लागू असेल. इतर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवरील फ्लाइट्ससाठी जुनाच नियम लागू राहणार आहे. त्यामुळे इतर फ्लाइट्समध्ये प्रवाशांना केवळ 20 किलो चेक-इन बॅगेज आणि 7 किलो केबिन बॅगेज नेण्याची मुभा असेल.

प्रवाशांसाठी दिलासा, पण नियमानुसारच तयारी आवश्यक

बॅगेज पॉलिसीतील या बदलांमुळे विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः ज्या प्रवाशांना अधिक सामान न्यायचे असेल, त्यांच्यासाठी ही सुविधा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. मात्र, कोणतीही गैरसमज नको म्हणून प्रवाशांनी आपली फ्लाइट आणि तिच्या बॅगेज नियमांबाबत एअर इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा विमानतळावर प्रवासापूर्वी चौकशी करून योग्य तयारी करावी.

नव्या नियमांचा प्रवाशांना फायदा

  1. प्रवाशांना 20 किलो ऐवजी 30 किलो चेक-इन बॅगेज नेण्याची मुभा.
  2. दोन केबिन बॅगेज नेता येणार, मात्र त्यांचे एकूण वजन 7 किलोच्या मर्यादेत असणे आवश्यक.
  3. मुलांसह प्रवास करणाऱ्या कुटुंबांना 47 किलो सामान नेण्याची विशेष सुविधा.
  4. भारत, मध्य पूर्व आणि सिंगापूरमधील आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सवरच ही सुविधा लागू.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तानला बालाकोट एअर स्ट्राईक विसरणे अशक्य; भारताविरोधात पुन्हा अपप्रचार सुरू

एअर इंडियाचा प्रवाशांसाठी मोठा निर्णय

एअर इंडिया एक्सप्रेसच्या या निर्णयामुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि आरामदायक प्रवासाचा अनुभव मिळेल. नव्या धोरणामुळे अधिक सामान नेणाऱ्या प्रवाशांची अडचण दूर होणार आहे. मात्र, प्रत्येक प्रवाशाने आपली फ्लाइट आणि तिच्या नियमांबाबत अधिकृत माहिती घेणे गरजेचे आहे. भविष्यातही एअर इंडिया एक्सप्रेस आपल्या सेवांमध्ये सुधारणा करत प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन सुविधा आणेल, अशी अपेक्षा आहे.

Web Title: Air india increased the check in luggage limit from 20 kg to 30 kg nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2025 | 11:53 AM

Topics:  

  • air india
  • benefits of travel
  • World Tourism

संबंधित बातम्या

आजच्या दिवशीचे झाले होते TATA चे Air India च्या विस्तारासह मर्जर, 1 वर्षात एअर इंडियाची क्रेझ घटली, Data मधून सिद्ध
1

आजच्या दिवशीचे झाले होते TATA चे Air India च्या विस्तारासह मर्जर, 1 वर्षात एअर इंडियाची क्रेझ घटली, Data मधून सिद्ध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.