Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi News:आसामचे मुख्यमंत्री तुरुंगात जाणार; राहुल गांधींच्या विधानाने सरमांचा तिळपापड

राहुल गांधी यांनी आसाम दौर्‍यावर असताना मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांच्यावर थेट जमीन चोरीचे आरोप केले. मुख्यमंत्री सोलर पार्क आणि रिसॉर्टच्या नावाखाली आसामची जमीन चोरत असल्याचा आरोप केला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 16, 2025 | 06:37 PM
Rahul Gandhi News:आसामचे मुख्यमंत्री तुरुंगात जाणार; राहुल गांधींच्या विधानाने सरमांचा तिळपापड
Follow Us
Close
Follow Us:

Rahul Gandhi News: गेल्या काही दिवसांपासून लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी सत्ताधारी पक्षातील नेत्यांना थेट आरोप करताना दिसत आहे. बिहार असो वा महाराष्ट्र असो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ते थेट विरोधी नेत्यांना थेट भिडताना दिसत आहेत. महाराष्ट्र आणि बिहारमधील नेत्यानंतर आता राहुल गांधी यांनी थेट आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिस्वा सरमा यांच्यावर तोफ डागली आहे. आसाममधील चायगाव येथे बोलताना त्यांनी सरमा यांच्यावर निशाणा साधला. एका बाजूला आरएसएसकडे द्वेष, फूट आणि भांडणाची विचारसरणी आहे तर दुसरीकडे काँग्रेसकडे द्वेष नष्ट करण्याची विचारसरणी आहे. यावेळी त्यांनी सांगितले की आसामचे मुख्यमंत्री तुरुंगात जातील, अशी जहरी टीका राहुल गांधी यांनी केली होती.

राहुल गांधी म्हणाले, “आज आसाममध्ये जे घडत आहे ते संपूर्ण देशात घडत आहे. येथील मुख्यमंत्री स्वतःला राजा मानतात, पण जेव्हा तुम्ही त्यांचा आवाज ऐकता, त्यांच्या डोळ्यात पाहता तेव्हा तुम्हाला त्यामागील भीती दिसेल. ते मोठ्याने बोलतात, ओरडतात, पण त्यांच्या मनात भीती असते. कारण त्यांना माहित आहे की एके दिवशी काँग्रेसचा बब्बर सिंह त्यांना तुरुंगात टाकेल. त्यांना त्यांच्या सर्व भ्रष्टाचाराचे उत्तर आसामच्या लोकांना द्यावे लागेल.” पंतप्रधान मोदीही हिमंता बिस्वा सरमा यांना वाचवू शकणार नाहीत.

Operation Muskaan मुळे ४१,१९३ लहान मुला-मुलींच्या चेहऱ्यावर ‘मुस्कान’, मुख्यमंत्र्यांची विधानपरिषदेत माहिती

काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, “मी जे बोलतो ते घडते. कोविड, नोटाबंदी, चुकीच्या जीएसटी दरम्यान मी जे बोललो त्याचे परिणाम संपूर्ण देशाला दिसले. मी आज सांगत आहे की थोड्याच दिवसांत तुमच्या मुख्यमंत्री तुरुंगात जाताना दिसेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाहा हेदेखील त्यांना वाचवू शकणार नाहीत. काँग्रेस पक्ष हे करणार नाही. तरुण, शेतकरी, कामगार आणि आसाममधील प्रत्येक वर्गातील लोक हे करतील कारण त्यांना माहित आहे की ही व्यक्ती भ्रष्ट आहे. ही व्यक्ती २४ तास आसामची जमीन चोरत आहे. कधी सोलर पार्कच्या नावाखाली, कधी रिसॉर्टच्या नावाखाली आणि आसाममधील प्रत्येक मुलाला, प्रत्येक व्यक्तीला हे माहित आहे.

राहुल गांधींच्या विधानावर हिमंता बिस्वा सरमा यांनीदेखील त्यांच्या टिकेला उत्तर दिले आहे. ”राहुल गांधी आसाममध्ये येतात आणि मला तुरुंगात पाठवण्याची भाषा करतात पण ते स्वतः जामिनावर आहेत हे विसरतात. ट्विटर एक्सवर पोस्ट करताना हिमंता बिस्वा सरमा यांनी लिहीलं आहे की, “हे लिहून घ्या, हिमंता बिस्वा सरमा यांना नक्कीच तुरुंगात पाठवले जाईल – हे तेच वाक्य आहे जे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आसाममधील काँग्रेसच्या राजकीय व्यवहार समितीसोबतच्या बैठकीत म्हटले होते, परंतु आमचे नेते किती सहजपणे विसरले की ते स्वतः देशभरात दाखल असलेल्या अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये जामिनावर आहेत. माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत, राहुल जी. आज आसामच्या आदरातिथ्याचा आनंद घ्या.” अशा शब्दांत सरमा यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

धर्मांतर आणि ‘लव्ह जिहाद’ प्रकरणात धक्कादायक खुलासा; मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून केलं गायब

‘बिहारमध्ये मतदार यादीतून लाखो लोकांचे नावे वगळली’

काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधी बिहारमधील मतदार यादी सुधारणेबद्दल म्हणाले, “महाराष्ट्राच्या निवडणुका भाजप आणि निवडणूक आयोगाने चोरल्या. बिहारमध्येही तेच करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे लोक आता बिहारमध्ये नवीन मतदार यादी तयार करत आहेत. लाखो लोकांना त्या मतदार यादीतून काढून टाकले जात आहे. त्यात गरीब, कामगार, शेतकरी आणि काँग्रेस-राजद मतदारांचा समावेश आहे. आम्ही बिहारमध्ये याचा निषेध करत आहोत आणि त्यांच्यावर दबाव आणत आहोत. हे लोक आसाममध्येही असेच करतील, परंतु आम्ही हे होऊ देणार नाही.”

 

Web Title: Assam chief minister will go to jail sarmas statement angers rahul gandhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2025 | 06:37 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.