Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CJI Bhushan Gavai Attack: मोहन भागवतांचे ते वक्तव्य अन् चार दिवसांतच भूषण गवईंवर हल्ला

गेल्या हजारो वर्षांपासून काही परदेशी लोक भारतात आले, त्यांच्यासोबत ते सांप्रदायही भारतात आले. आता हे लोक निघून गेल असले तर आपल्या देशातील काही नागरिकांनी त्यांचा धर्म किंवा पंथ स्वीकारला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 07, 2025 | 02:20 PM
CJI Bhushan Gavai Attack:

CJI Bhushan Gavai Attack:

Follow Us
Close
Follow Us:
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नुकताच शताब्दी सोहळा
  • मोहन भागवतांचे गुंडगिरी, हिंसाचारासंबंधीचे विधान
  • भूषण गवईंवर हल्ला

Nagpur News: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर भर न्यायालयात एका ज्येष्ठ वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केला. तो बूट न्यायाधीशांपर्यंत पोहलचा नाही. पण देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच थेट सरन्यायाधीशांवर असा हल्ला झाला. या प्रकाराने देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नुकताच शताब्दी सोहळा पार पडला. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुंडगिरी करणारे, हिंसाचार करणारे, आणि कायदा हातात घेऊन दुष्कृत्य करणाऱ्यांचे कान टोचले होते. असे असतानाही अवघ्या चार दिवसांतच थेट सरन्यायाधीशांवर हल्ला करण्याचा प्रकार घडला.

नेमके काय म्हणाले होते भागवत?

सरकार आणि प्रशासनाकडून समाजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होते. कार्यक्षम आणि लोकाभिमुख प्रशासकीय प्रक्रियांचा अभाव यांमुळे जनतेचा असंतोष वाढण्याची काहीप्रमुख कारणे आहेत. पण हिंसत आंदोलन हा पर्याय असू शकत नाहीत. आपले शेजाही देश सांस्कृतिकदृष्ट्या भारताशी जोडलेले आहेत. भारताच्या हितासाठी या देशांमध्ये शांतता, स्थिरता, प्रगती होणे अत्यंत आवश्यक असल्याचे मोहन भागवत यांनी म्हटले होते.

भागवत म्हणाले होते की, गेल्या हजारो वर्षांपासून काही परदेशी लोक भारतात आले, त्यांच्यासोबत ते सांप्रदायही भारतात आले. आता हे लोक निघून गेल असले तर आपल्या देशातील काही नागरिकांनी त्यांचा धर्म किंवा पंथ स्वीकारला आहे. असे असतनाही आज ते भारतात गुण्या गोविंदाने राहत आहेत. आपल्या देशात विविधता असूनही आपण सर्व एका मोठ्या समाजाचा भाग आहोत, असे आरएसएस प्रमुख मोहन भागवत म्हणाले. प्रत्येकाची स्वतःची श्रद्धास्थाने, महापुरुष आणि प्रार्थनास्थळे असतात. विचार, शब्द आणि कृतीतून त्यांचा अनादर होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी समाजात प्रबोधनाची गरज असल्याचेही भागवत यांनी नमूद केले.

नियमांचे पालन करणे आणि सुसंवाद राखणे हा आपल्या जीवनाचा स्वभाव असायला हवा, असे आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी सांगितले. लहान-मोठ्या कारणांवरून किंवा फक्त संशयावरून कायदा हातात घेणे, गुंडगिरी किंवा हिंसाचार करणे चुकीची पद्धत आहे. अशा घटना अनेकदा पूर्वकल्पित कल्पनेने किंवा विशिष्ट समुदायाला चिथावणी देण्यासाठी उभ्या राहतात. त्यांच्या जाळ्यात अडकणे तात्काळ आणि दीर्घकालीन दृष्टीने हानिकारक ठरते.

भागवत यांनी सरकार आणि प्रशासन यांना पक्षपातीपणाशिवाय नियमांनुसार कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन केले. तसेच समाजातील सज्जनशक्ती आणि तरुण पिढीने सतर्क राहून आवश्यकतेनुसार हस्तक्षेप करावा, असेही त्यांनी म्हटले.

त्यांनी सध्या सुरु असलेल्या युद्धे, छोटे-मोठे संघर्ष, पर्यावरणीय ऱ्हास, समाज व कुटुंबांचे विघटन, नागरी जीवनात वाढता भ्रष्टाचार व अत्याचार याबद्दल चिंता व्यक्त केली. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न झाले तरी, त्यांची वाढ थांबवण्यात आणि पूर्ण उपाय देण्यात आपल्याला यश मिळालेले नाही, असेही भागवत यांनी नमूद केले.

Web Title: Cji bhushan gavai attack mohan bhagwats statement and attack on bhushan gavai within four days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2025 | 02:20 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.