Delhi’s New CM: दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाचा (भाजप) 27 वर्षांचा वनवास अखेर संपला आहे. कठीण निवडणूक लढतीनंतर आलेल्या सर्व एक्झिट पोल्सनी भाजपला संकेत दिले होते की, राष्ट्रीय राजधानीत सत्ता स्थापन करण्याची संधी आहे. मात्र, तरीही पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना याबाबत खात्री नव्हती. पण निकालानंतर दिल्लीमध्ये भाजपची सरकार स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दिल्ली विधानसभेमध्ये एकूण 70 जागा आहेत आणि सरकार स्थापन करण्यासाठी किमान 36 जागांची गरज असते. भाजप या संख्येच्या कितीतरी पुढे जात असल्याचे दिसत आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे (AAP) प्रदर्शन अत्यंत निराशाजनक राहिले आहे. पक्षाचे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, सोमनाथ भारती यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
आता भाजपसमोर सर्वात मोठा प्रश्न आहे की, दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार? कारण, भाजपला दीर्घकाळाच्या संघर्षानंतर राष्ट्रीय राजधानीत विजय मिळविता आला आहे. अशा परिस्थितीत, पक्षाकडे अनेक असे नेते आहेत, जे मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून समोर येत आहेत.
“राहुल गांधी यांच्या भ्रामक विचारांमुळे अराजकतावाद्यांना बळ”; पुण्यातून मुख्यमंत्री
भाजपने यापूर्वी अनेकदा मुख्यमंत्री निवडीसंदर्भात अनपेक्षित निर्णय घेतले आहेत. राजस्थानमध्ये भजनलाल शर्मा, मध्य प्रदेशमध्ये डॉ. मोहन यादव, छत्तीसगडमध्ये विष्णु देव साय, ओडिशामध्ये मोहन चरण मांझी यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली होती. भाजपकडून दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी कोणते नेते आघाडीवर आहेत आणि त्यांच्या दावेदारीमागील प्रमुख कारणे काय आहेत? हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी संभाव्य उमेदवारांमध्ये सर्वात आघाडीवर नाव घेतले जात आहे प्रवेश वर्मा यांचे. प्रवेश वर्मा यांनी नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून मोठ्या विजयासह अरविंद केजरीवाल यांना पराभूत केले आहे. ते गेल्या 10 वर्षांपासून पश्चिम दिल्लीचे खासदार राहिले आहेत आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंह वर्मा यांचे सुपुत्र आहेत.
दिल्लीच्या राजकारणात ग्रामीण भागांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या भागात जाट आणि गुर्जर समुदायाचा मोठा प्रभाव आहे. प्रवेश वर्मा जाट समाजाचे प्रतिनिधित्व करतात, त्यामुळे भाजप त्यांच्यावर विश्वास दाखवू शकते. दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी प्रवेश वर्मा यांची निवड करून भाजप हरियाणातील नाराजीही दूर करू शकते, जिथे 25% जाट लोकसंख्या असूनही पक्षाने जाट मुख्यमंत्री नेमला नव्हता.
Box Office Collection: ‘लवयापा’ चित्रपटाची पहिल्याच दिवशी एवढी कमाई; अद्वैत चंदनचा
मुख्यमंत्रीपदाबाबत विचारले असता प्रवेश वर्मा म्हणाले, “आमच्या पक्षात आमदारांचा गट मुख्यमंत्री निवडतो आणि पक्ष नेतृत्व त्याला मंजुरी देते. त्यामुळे पक्ष जो निर्णय घेईल, तो सर्वांना मान्य असेल.” भाजप प्रवेश वर्मा यांना दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी संधी देणार का, हे लवकरच स्पष्ट होईल.
दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा हे देखील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. त्यांच्या अध्यक्षीय कार्यकाळातच भाजपने 27 वर्षांनंतर दिल्लीतील वनवास संपवला आहे, हे ते पक्षासमोर महत्त्वाचा मुद्दा म्हणून मांडू शकतात. त्याचबरोबर, दिल्ली भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि सांसद मनोज तिवारी यांचे नाव देखील चर्चेत आहे. मनोज तिवारी तीन वेळा दिल्लीमधून खासदार म्हणून निवडून आले आहेत आणि राजधानीच्या राजकारणातील एक ओळखले जाणारे व्यक्तिमत्त्व आहेत. ते पूर्वांचली मतदारांमध्ये विशेषतः लोकप्रिय आहेत, आणि भाजप त्यांचा उपयोग दिल्लीनंतर इतर राज्यांमध्येही पूर्वांचली मतदारांना आकर्षित करण्यासाठी करत आली आहे.
लग्न घरात या गोष्टी आणतात नकारात्मक ऊर्जा, वास्तू दोषांमुळे शुभ कार्यात येऊ लागतात अडथळे
मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत विजेंद्र गुप्ता यांचे नावही पुढे येत आहे. विजेंद्र गुप्ता यांनी सलग अनेक निवडणुका दिल्लीमध्ये जिंकल्या आहेत. ते वैश्य समुदायाचे प्रतिनिधित्व करतात, ज्याचा दिल्लीच्या राजकारणावर मोठा प्रभाव आहे. त्यांनी दिल्ली विधानसभा नेता प्रतिपक्ष म्हणूनही काम पाहिले आहे आणि अरविंद केजरीवाल यांच्या सरकारविरोधातील आंदोलनांमध्ये सक्रिय भूमिका बजावली आहे.
भाजपकडे मुख्यमंत्रीपदासाठी अनेक सक्षम दावेदार आहेत. प्रवेश वर्मा, वीरेंद्र सचदेवा, मनोज तिवारी आणि विजेंद्र गुप्ता. पक्ष वरिष्ठ नेतृत्वाचा निर्णय काय असेल, हे लवकरच स्पष्ट होईल, मात्र दिल्लीच्या राजकारणात हा निर्णय मोठ्या बदलांचे संकेत देणारा ठरू शकतो.