Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Revanth Reddy To PM Modi: राहुल गांधी पंतप्रधान असते तर..; रेवंत रेड्डींचा मोदींवर घणाघात

१९६७ मध्ये त्यांनी चीनला पराभूत केले, तर १९७१ मध्ये अमेरिकेच्या दबावाला न जुमानता बांगलादेश निर्माण केला.”पण मोदींचे नेतृत्व शेजारी देशांच्या आक्रमकतेला थोपवण्यात अपयशी ठरले

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 30, 2025 | 04:34 PM
Revanth Reddy To PM Modi: राहुल गांधी पंतप्रधान असते तर..; रेवंत रेड्डींचा मोदींवर घणाघात
Follow Us
Close
Follow Us:

हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तीव्र टीका करताना लष्करी संघर्ष, राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणावर अनेक सवाल उपस्थित केले. हैदराबाद येथे झालेल्या ‘जय हिंद’ रॅलीदरम्यान त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत “पाकिस्तानने अलीकडील लष्करी संघर्षात किती राफेल विमाने पाडली?” असा थेट सवाल केला. “सिकंदराबाद छावणीतील सैनिक युद्धात सहभागी झाले होते. तेलंगणात तयार झालेल्या लढाऊ विमानांनी देशाचा सन्मान राखला. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणलेली राफेल विमाने पाकिस्तानने पाडली. यावर कुठलीही चर्चा होत नाही. १४० कोटी भारतीयांना याचा हिशोब दिला पाहिजे.” असही त्यांनी स्पष्ट केलं.

त्यांनी असा आरोप केला की, राफेल व्यवहारातील हजारो कोटी रुपयांची कंत्राटे मोदींच्या निकटवर्तीयांना देण्यात आली. याचप्रसंगी त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर काँग्रेस पक्षाने कायम राष्ट्रहिताचा विचार केला असल्याचे सांगितले. “मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मीनाक्षी नटराजन यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, राष्ट्रहिताच्या बाबतीत सर्वांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवले पाहिजेत. म्हणूनच काँग्रेसने एनडीए सरकारला पाकिस्तानसोबतच्या युद्धात पाठिंबा दिला होता,” असे रेड्डींनी नमुद केले.

Vaishnavi Hagawane Case: मोठी बातमी! वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणला अटक, पिंपरी- चिंचवड पोलिसां

“राहुल गांधी असते पंतप्रधान तर पीओके परत मिळवले असते”

पंतप्रधान इंदिरा गांधींचा उल्लेख करत रेड्डी म्हणाले की, “१९६७ मध्ये त्यांनी चीनला पराभूत केले, तर १९७१ मध्ये अमेरिकेच्या दबावाला न जुमानता बांगलादेश निर्माण केला.”पण मोदींचे नेतृत्व शेजारी देशांच्या आक्रमकतेला थोपवण्यात अपयशी ठरले आहे. जर राहुल गांधी पंतप्रधान असते, तर त्यांनी पाकिस्तानव्याप्त काश्मीर (पीओके) भारतात परत आणले असते. असा घणाघातही त्यांनी यावेळी केला. ते म्हणाले की, “मोदी हे १००० रुपयांच्या रद्द झालेल्या नोटेसारखे आहेत. देशाला राहुल गांधीसारखा नेता हवा आहे. मोदी कधीही युद्ध जिंकू शकत नाहीत,” अशी टीका त्यांनी केली. चार दिवसांच्या युद्धानंतर कोण जिंकले आणि कोण हरले, याबद्दल सरकारने स्पष्टीकरण द्यावे. त्यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याचा उल्लेख करत म्हटले, “ट्रम्प यांनी सांगितले की त्यांनी भारतावर दबाव टाकून युद्ध थांबवले. मग खरे काय?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

आई-मुलाच्या नात्यात मैत्री शोधणारं ‘सखी माझी आई’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला…

त्यांनी बलुचिस्तानला पाकिस्तानपासून वेगळे करण्यात आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) ताब्यात घेण्यात अपयश पत्करले. “१४० कोटी भारतीयांच्या इच्छेला न जुमानता, पंतप्रधानांनी अर्धवट निर्णय घेतले,” असा आरोपही त्यांनी यावेळी केला. चार दिवसांच्या युद्धानंतर कोणाने कोणाला धमकावले, हे समजले नाही. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, त्यांनी हस्तक्षेप करून युद्ध थांबवले.” मोदींच्या ‘युद्ध म्हणजे भाषण नव्हे’ या विधानाचा उल्लेख करत त्यांनी म्हटले की, “१४० कोटी भारतीयांच्या आत्मसन्मानाची आपण शपथ घेतली, मग युद्ध थांबवून आपण तो सन्मान जपला का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Web Title: If rahul gandhi had been the prime minister he would have also got pakistan occupied kashmir revanth reddy criticizes modi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2025 | 04:33 PM

Topics:  

  • PM Narendra Modi
  • POK

संबंधित बातम्या

उद्योगांना लाभदायक ठरणारी पहिली AI Living Lab महाराष्ट्रात; मंगल प्रभात लोढांच्या हस्ते शुभारंभ
1

उद्योगांना लाभदायक ठरणारी पहिली AI Living Lab महाराष्ट्रात; मंगल प्रभात लोढांच्या हस्ते शुभारंभ

Amit Shah कडाडले! राहुल गांधींना शेतकरी मुद्द्यावरून विचारला १० वर्षांचा हिशोब; आकडेवारीनिशी केलं चॅलेंज
2

Amit Shah कडाडले! राहुल गांधींना शेतकरी मुद्द्यावरून विचारला १० वर्षांचा हिशोब; आकडेवारीनिशी केलं चॅलेंज

भारत स्टार्टअप्सची ‘महासत्ता’! केंद्र सरकारने दिली १०,००० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी, नव्या कल्पनांना मिळणार पंख
3

भारत स्टार्टअप्सची ‘महासत्ता’! केंद्र सरकारने दिली १०,००० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी, नव्या कल्पनांना मिळणार पंख

ओम बिरला कोणच्या दबावाखाली करतायेत काम? विरोधकांचा अविश्वासाचा प्रस्ताव करणार घाव
4

ओम बिरला कोणच्या दबावाखाली करतायेत काम? विरोधकांचा अविश्वासाचा प्रस्ताव करणार घाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.