Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अग्निपथ योजनेत गृहमंत्रालयाने केलाय ‘हा’ बदल, सीआरपीएफ आणि आसाम रायफल्ससाठी महत्त्वाचा निर्णय

केंद्र सरकारने आणलेली नवी अग्निपथ योजना (Agneepath Scheme) देशातील विविध राज्यांनी या योजनेला विरोध केला. भारतीय सैन्यदलांत १७.५ ते २१ वर्षे या वयोगटातील तरुणांना अग्निवीर (Agneeveer) म्हणून सेवेची संधी मिळणार आहे. मात्र तरुणांचा रोष पाहता केंद्र सरकारने (Central Government) एक पाऊल मागे घेतलं असून वयोमर्यादा २१ वरुन २३ केली आहे. तसेच वाढता विरोध लक्षात घेता केंद्रीय गृहमंत्रालयाने (Central Home minister depertment) मोठा निर्णय घेतला आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Jun 18, 2022 | 11:48 AM
rajnath singh

rajnath singh

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : सध्या देशात एका वेगळ्या कारणावरुन वातावरण तापले आहे. आणि याला जबाबदार आहे केंद्र सरकारने आणलेली नवी अग्निपथ योजना (Agneepath Scheme) देशातील विविध राज्यांनी या योजनेला विरोध केला. भारतीय सैन्यदलांत १७.५ ते २१ वर्षे या वयोगटातील तरुणांना अग्निवीर (Agneeveer) म्हणून सेवेची संधी मिळणार आहे. मात्र तरुणांचा रोष पाहता केंद्र सरकारने (Central Government) एक पाऊल मागे घेतलं असून वयोमर्यादा २१ वरुन २३ केली आहे. तसेच वाढता विरोध लक्षात घेता केंद्रीय गृहमंत्रालयाने (Central Home minister depertment) मोठा निर्णय घेतला आहे. ((Major changes in the Agneepath scheme)

[read_also content=”रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, उद्या घराबाहेर पडत असाल तर एकदा ‘खालील वेळापत्रक’ बघूनच घ्या https://www.navarashtra.com/maharashtra/megablock-on-central-and-harbor-railway-line-on-sunday-293900.html https://www.navarashtra.com/lifestyle/how-to-boost-your-child-immune-system-during-the-rainy-season-293890.html”]

दरम्यान, नव्या निर्णयानुसार, अग्निवीरांसाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्समधील भरतीसाठी १० टक्के रिक्त जागा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, अग्निवीरांना दोन दलात भरतीसाठी उच्च वयोमर्यादेपेक्षा ३ वर्षाची सूट दिली जाणार आहे. म्हणजे वयोमर्यादा २१ वरुन २३ केली आहे. तर, अग्निवीरांच्या पहिल्या तुडकीसाठी उच्च वयोमर्यादेच्या पुढे ५ वर्षांसाठी वयोमर्यादा शिथिल असेल असंही गृह मंत्रालयाने म्हटलं आहे. (Major changes in the Agneepath scheme for crpf and asam rifle)

नेमकी काय आहे अग्निपथ योजना?

भारतीय सैन्यदलांत १७.५ ते २१ वर्षे या वयोगटातील तरुणांना अग्निवीर म्हणून सेवेची संधी मिळणार आहे. चार वर्षांच्या कालावधीसाठी (प्रशिक्षण काळासह) तरुणांना समाविष्ट केलं जाईल. महिन्याला ३० ते ४० हजार रुपये वेतन (लागू असल्यास स्वतंत्र भत्ता) मिळणार आहे. वेतनात दर वर्षी काहीअंशी वाढ होईल. प्रत्येक अग्निवीरास मासिक वेतनातील ३० टक्के रक्कम अग्निवीर समूह निधीत द्यावी लागेल. यातून कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांना सेवा निधी अंतर्गत ११.७१ लाख रुपये मिळतील, जे करमुक्त असतील.

योजनेला का होत आहे विरोध?

लष्करात भरती होण्याची इच्छा असणारे हे तरुण यामुळे ना आम्हाला, ना देशाला फायदा होणार असल्याचं सांगत आहेत. तरुणांचा अग्निपथ योजनेतील सर्वात जास्त विरोध असणारी बाब म्हणजे चार वर्षांनी फक्त २५ टक्के तरुणांना संधी मिळणार आहे. आंदोलन करणारे चार वर्षांच्या सेवेनंतर काय? असा प्रश्न विचारत आहेत. एका उमेदवाराने सांगितलं की, जो तरुण वयाच्या १७ व्या व्या वर्षी अग्निवीर होईल त्याच्याकडे कोणतीही व्यावसायिक पदवी किंवा कोणतीही विशेष पात्रता नसते. यामुळे नंतर त्याच्याकडे द्वितीय श्रेणीच्या नोकऱ्या स्वीकारण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल. चार वर्षानंतर आम्ही कुठे जायचं? असा या तरुणांचा प्रश्न आहे. त्यामुळं तरुणांचा रोष वाढत असून देशभरात हिंसाचार व आंदोलन होत आहे.

Web Title: Important decision for crpf and assam rifles by home ministry in agneepath yojana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2022 | 11:48 AM

Topics:  

  • Agneeveer
  • Home Minister
  • Rajnath Singh

संबंधित बातम्या

Rajnath Singh in Ayodhya : ‘ऑपरेशन सिंदूरवेळी, भारताने भगवान रामाच्या प्रतिष्ठेचे पालन केले…’, संरक्षण मंत्री नेमकं म्हणाले काय?
1

Rajnath Singh in Ayodhya : ‘ऑपरेशन सिंदूरवेळी, भारताने भगवान रामाच्या प्रतिष्ठेचे पालन केले…’, संरक्षण मंत्री नेमकं म्हणाले काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.