Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘लोकशाहीत जनता मालक असते, सरकारचे निर्णय जनतेच्या फायद्याचे असायला हवेत’ – सरन्यायाधीश

‘लोकशाही व्यवस्थेतील सर्व राज्यकर्त्यांनी आपले दैनंदिन काम सुरू करण्यापूर्वी आपल्यात काही अवगुण आहेत का, याचे आत्मपरीक्षण करावे. न्याय प्रशासन देण्याची गरज असून ते लोकांच्या गरजेनुसार असावे. येथे अनेक ज्ञानी लोक असून, जगात व देशात चाललेल्या घडामोडी तुम्ही पाहात आहात,’ असे सरन्यायाधीश म्हणाले. लोकशाहीत लोक हेच खरे मालक असून, सरकार जे निर्णय घेईल ते त्यांच्या फायद्याचे असायला हवेत, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

  • By Navarashtra News Network
Updated On: Nov 23, 2021 | 02:19 PM
‘लोकशाहीत जनता मालक असते, सरकारचे निर्णय जनतेच्या फायद्याचे असायला हवेत’ – सरन्यायाधीश
Follow Us
Close
Follow Us:

पुट्टपर्ती (आंध्र प्रदेश) : आपण घेतलेले निर्णय चांगले आहेत काय, तसेच त्यांची काही वाईट वैशिष्टय़े आहेत काय, याचे राज्यकर्त्यांनी दररोज सिंहावलोकन करायला हवे, असे मत सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांनी सोमवारी व्यक्त केले.

राज्यकर्त्यांचे १४ वाईट गुण असून त्यांनी ते टाळावेत, असे न्या. रमण यांनी महाभारत व रामायण यांचा दाखला देऊन सांगितले. पुट्टपर्ती येथील श्री सत्य साई इन्स्टिटय़ूट ऑफ हायर लर्निग या संस्थेच्या ४०व्या पदवीदान समारंभात ते बोलत होते.

‘लोकशाही व्यवस्थेतील सर्व राज्यकर्त्यांनी आपले दैनंदिन काम सुरू करण्यापूर्वी आपल्यात काही अवगुण आहेत का, याचे आत्मपरीक्षण करावे. न्याय प्रशासन देण्याची गरज असून ते लोकांच्या गरजेनुसार असावे. येथे अनेक ज्ञानी लोक असून, जगात व देशात चाललेल्या घडामोडी तुम्ही पाहात आहात,’ असे सरन्यायाधीश म्हणाले.

लोकशाहीत लोक हेच खरे मालक असून, सरकार जे निर्णय घेईल ते त्यांच्या फायद्याचे असायला हवेत, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

देशातील सर्व यंत्रणा स्वतंत्र व प्रामाणिक असाव्यात आणि त्यांचा हेतू लोकांची सेवा करण्याचा असवा. दुर्दैवाने आधुनिक शिक्षण व्यवस्था केवळ उपयुक्ततावादी कार्यावर भर देत असून, अशी व्यवस्था विद्यार्थ्यांचे चारित्र्य घडवणाऱ्या शिक्षणाच्या नैतिक किंवा आध्यात्मिक पैलू हाताळण्यास सक्षम नाही, असेही सरन्यायाधीशांनी सांगितले.

Web Title: In a democracy the people are the masters the decisions of the government should be for the benefit of the people chief justice nrkk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2021 | 02:19 PM

Topics:  

  • Chief Justice of India

संबंधित बातम्या

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांची संपत्तीची माहिती सर्वांसाठी खुली; सरन्यायाधीशांची प्रॉपर्टी वाचून बसेल धक्का
1

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांची संपत्तीची माहिती सर्वांसाठी खुली; सरन्यायाधीशांची प्रॉपर्टी वाचून बसेल धक्का

न्यायमूर्ती भूषण गवई असतील भारताचे पुढील सरन्यायाधीश; 14 मे रोजी घेणार सरन्यायाधीशपदाची शपथ
2

न्यायमूर्ती भूषण गवई असतील भारताचे पुढील सरन्यायाधीश; 14 मे रोजी घेणार सरन्यायाधीशपदाची शपथ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.