Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कारवाई का केली नाही? पी चिदंबरम यांनी पहिल्यांदाच घेतले स्पष्ट नाव

काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांचे एक मोठे विधान समोर आले आहे, मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याला आंतरराष्ट्रीय राजकीय दबावामुळे प्रत्त्युत्तर न दिल्याचे त्यांनी कबुल केले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 30, 2025 | 02:54 PM
P Chidambaram admits India did not take action after Mumbai terror attacks due to international pressure

P Chidambaram admits India did not take action after Mumbai terror attacks due to international pressure

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशाला हादरवून टाकले. या हल्ल्यात पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या १० दहशतवाद्यांनी १७५ हून अधिक लोकांचा बळी घेतला. आता, तत्कालीन गृहमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांचे एक मोठे विधान समोर आले आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की भारताने पाकिस्तानविरुद्ध लष्करी कारवाई करण्याची योजना आखली होती, परंतु आंतरराष्ट्रीय दबावामुळे हा निर्णय पुढे ढकलण्यात आला.

तत्कालीन गृहमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी एका टीव्ही चॅनलला मुलाखत दिली आहे. त्यांच्या मुलाखतीची सध्या पूर्ण देशभर चर्चा आहे. यामध्ये त्यांनी मुंबईच्या दहशतवादी हल्ल्याबाबत केलेल्या धक्कादायक विधानामुळे चर्चांना उधाण आले. पी. चिदंबरम यांनी खुलासा केला की मुंबई हल्ल्यांवर कारवाई न करण्याचा निर्णय अमेरिकेसह आंतरराष्ट्रीय दबावामुळे घेण्यात आला होता. भाजपने आता या विधानावरून काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांच्या आलेल्या या वक्तव्यावरुन भाजपने जोरदार निशाणा साधला आहे.
विदेशी नेत्यांनी सांगितले युद्ध करू नका.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पी चिदंबरम यांनी एका टीव्ही मुलाखतीत सांगितले की, २६/११ नंतर तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याशी लष्करी कारवाईबाबत चर्चा झाली होती. तथापि, तत्कालीन अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री कॉन्डोलिझा राईस, संयुक्त राष्ट्रे, युरोपीय देश आणि इतर जागतिक नेत्यांनी भारताला युद्ध सुरू न करण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, “संपूर्ण जग दिल्लीवर युद्ध सुरू न करण्यासाठी दबाव आणत होते. भारताने राजनैतिक आणि धोरणात्मक सल्ला विचारात घेऊन संयमाचा मार्ग निवडला.”

“माझ्या मनात प्रत्युत्तर होते” – चिदंबरम

पी चिदंबरम यांनी स्पष्ट केले की हल्ल्याच्या वेळी त्यांचा पहिला विचार असा होता की पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले पाहिजे. ते म्हणाले की हा हल्ला पाकिस्तानी भूमीतून झाला होता आणि भारताने प्रत्युत्तर द्यायला हवे होते, परंतु सरकारने एकत्रितपणे युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. ते म्हणाले, “हा एक सामूहिक निर्णय होता, जो आंतरराष्ट्रीय परिस्थिती, परराष्ट्र मंत्रालयाचा सल्ला आणि पंतप्रधानांच्या दूरदृष्टीचा विचार करून घेतला गेला.” अशी कुबली पी चिदंबरम यांनी मुलाखतीमध्ये दिली आहे. यामुळे भाजप नेत्यांनी कॉंग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्याासाठी क्लिक करा 

भाजपचे प्रत्युत्तर: ‘कमकुवत सरकारचे लक्षण’

पी चिदंबरम यांच्या विधानावर भाजपने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी चिदंबरम यांचे विधान काँग्रेसच्या कमकुवत परराष्ट्र धोरणाचे उदाहरण असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे की, “काँग्रेस सरकार भारताच्या हितासाठी नाही तर आंतरराष्ट्रीय दबावाखाली काम करत होते.” जोशी म्हणाले की, काँग्रेस सरकारने पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई करण्याची संधी गमावली, तर आजचे सरकार दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेच्या धोरणाने काम करत आहे.

Web Title: P chidambaram admits india did not take action after mumbai terror attacks due to international pressure

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2025 | 02:54 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.