Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘कारगिलच्या युद्धातून पाकिस्तानने कोणताही धडा घेतला नाही’; पंतप्रधान मोदींचा थेट हल्लाबोल

1999 मध्ये  कारगिलच्या बर्फाळ शिखरांवर तब्बल तीन महिने शत्रुशी लढा देत भारतीय सैनिकांनी 26 जुलै 1999 रोजी 'ऑपरेशन विजय' ची घोषणा केली.  दिवस, महिने, वर्षे, शतके लोटतात, ऋतूही बदलतात पण देशाच्या रक्षणासाठी जिवाचे बलिदान देणाऱ्यांची  नावे कायम स्मरणात  राहतात. हा देश आपल्या सैन्यातील पराक्रमी महान वीरांचा सदैव ऋणी आहे  आणि काय ऋणी राहिल. 

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 26, 2024 | 12:41 PM
‘कारगिलच्या युद्धातून पाकिस्तानने कोणताही धडा घेतला नाही’; पंतप्रधान मोदींचा थेट हल्लाबोल
Follow Us
Close
Follow Us:

कारगिल :  भारत शांततेसाठी प्रयत्न करत होता, पाकिस्तानने जेव्हा जेव्हा भारताच्या विरोधात कुरापती करण्याचा प्रयत्न  केला, तेव्हा त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यांनी इतिहासातून कोणताही धडा घेतलेला नाही.” अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला सुनावले आहे. कारगिल विजय दिवसानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी कारगिल वॉर मेमोरिअलला  भेट दिली, यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी 1999 च्या कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली.

पंतप्रधान मोदी म्हणाले,  आज लडाखची ही महान भूमी कारगिल विजयाला 25 वर्षे पूर्ण झाल्याची साक्ष देत आहे. कारगिल विजय दिवस आपल्याला सांगतो की  कारगिल युद्धात भारतीय सैनिकांनी देशासाठी दिलेले बलिदान अमर आहे आणि म्हणूनच कारगिल विजय दिवस सदैव स्मरणात राहील. 1999 मध्ये  कारगिलच्या बर्फाळ शिखरांवर तब्बल तीन महिने शत्रुशी लढा देत भारतीय सैनिकांनी 26 जुलै 1999 रोजी ‘ऑपरेशन विजय’ ची घोषणा केली.  दिवस, महिने, वर्षे, शतके लोटतात, ऋतूही बदलतात पण देशाच्या रक्षणासाठी जिवाचे बलिदान देणाऱ्यांची  नावे कायम स्मरणात  राहतात. हा देश आपल्या सैन्यातील पराक्रमी महान वीरांचा सदैव ऋणी आहे  आणि काय ऋणी राहिल.

ते म्हणाले, ‘माझं भाग्य आहे की, कारगिल युद्धादरम्यान एक सामान्य देशवासी म्हणून मी माझ्या सैनिकांमध्ये होतो. आज मी पुन्हा कारगिलच्या भूमीवर आल्यावर त्या आठवणी माझ्या मनात ताज्या झाल्या.  मला आजही आठवते की, इतक्या कठीण परिस्थितीत आपल्या भारती सैन्याने इतक्या उंचीवर इतके कठीण लढाऊ ऑपरेशन्स पूर्ण केले.   देशाला विजय मिळवून देणाऱ्या अशा सर्व शूरवीरांना माझा आदरपूर्वक सलाम.  कारगिलमध्ये मातृभूमीच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शहीदांना मी सलाम करतो.

पीएम मोदी  म्हणाले, ‘आपण फक्त कारगिलचे युद्धच जिंकले नाही.  तर आपण सत्य, संयम आणि शक्तीचे अप्रतिम प्रदर्शनही केले होते.  भारत त्यावेळी शांततेसाठी प्रयत्न करत होता, त्या बदल्यात पाकिस्तानने पुन्हा एकदा आपला अविश्वासू चेहरा दाखवला. पण सत्यासमोर असत्याचा आणि दहशतीचा पराभव झाला. पाकिस्तानने यापूर्वी कितीही प्रयत्न केले, त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले पण पाकिस्तानने आपल्या इतिहासातून कोणताही धडा घेतला नाही. हे दहशतवादाच्या मदतीने, प्रॉक्सी वॉरच्या मदतीने स्वतःला सुसंगत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु दहशतवादांच्या  धन्याला माझा थेट आवाज पोहोचेल अशा ठिकाणाहून मी आज बोलत आहे,  मी दहशतवादाच्या आश्रयदात्यांना थेट आव्हान करत आहे. तुमचे घाणेरडे मनसुबे कधीही यशस्वी होणार नाहीत. आमचे शूर जवान दहशतवादाला पूर्ण ताकदीने चिरडून टाकतील. शत्रूला चोख प्रत्युत्तर दिले जाईल. लडाख असो वा जम्मू-काश्मीर, भारत आपल्या विकासासमोरील प्रत्येक आव्हानाचा पराभव करेल.

 

Web Title: Pakistan did not learn any lesson from the kargil war prime minister modis direct attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2024 | 12:37 PM

Topics:  

  • Jammu Kashimir
  • Kargil Vijay Divas

संबंधित बातम्या

1000 ITI मध्ये कारगिल विजय दिवस कार्यक्रमाचे आयोजन, मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती
1

1000 ITI मध्ये कारगिल विजय दिवस कार्यक्रमाचे आयोजन, मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती

Mini Kashmir Of India: भारतातील या राज्यात आहे मिनी काश्मीर; मे-जूनमध्ये फिरण्यासाठीचे एक उत्तम ठिकाण
2

Mini Kashmir Of India: भारतातील या राज्यात आहे मिनी काश्मीर; मे-जूनमध्ये फिरण्यासाठीचे एक उत्तम ठिकाण

‘पाकिस्तान भारताला घाबरतो’ 32 वर्षे जुन्या CIA अहवालाचा धक्कादायक खुलासा; पहलगामसारख्या हल्ल्याची आधीच होती शक्यता
3

‘पाकिस्तान भारताला घाबरतो’ 32 वर्षे जुन्या CIA अहवालाचा धक्कादायक खुलासा; पहलगामसारख्या हल्ल्याची आधीच होती शक्यता

Pahalgam Attack: निर्णय घ्यायला विलंब, काश्मीरचा अर्धा भाग पाकीस्तानकडे; काय आहे पाकव्याप्त काश्मीरचा इतिहास ?
4

Pahalgam Attack: निर्णय घ्यायला विलंब, काश्मीरचा अर्धा भाग पाकीस्तानकडे; काय आहे पाकव्याप्त काश्मीरचा इतिहास ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.