Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi News: राहुल गांधींना हिंदू धर्मातून बहिष्कृत करा; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींच्या विधानाने खळबळ

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडत, संसदेत हिंदू धर्माचा अपमान केल्याचा आरोप केला आहे

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 04, 2025 | 01:27 PM
Rahul Gandhi News: राहुल गांधींना हिंदू धर्मातून बहिष्कृत करा; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींच्या विधानाने खळबळ
Follow Us
Close
Follow Us:

ज्योतिर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींवर तीव्र शब्दांत टीका करत, त्यांना हिंदू धर्मातून बहिष्कृत करण्याची घोषणा केली आहे. काही दिसांपूर्वी राहुल गांधी यांनी संसदेत मनुस्मृतीसंदर्भात केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना शंकराचार्यांनी त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले होते. यासाठी त्यांनी राहुल गांधींना औपचारिक पत्रही पाठवले होते. मात्र, तीन महिन्यांनंतरही या पत्राला कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी कठोर भूमिका घेत, राहुल गांधींना हिंदू मानू नये, असे खळबळजनक विधान केलं आहे. त्यामुळे आता या वक्तव्यामुळे राजकीय आणि धार्मिक वर्तुळात नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडत, संसदेत हिंदू धर्माचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. शंकराचार्य म्हणाले की, “राहुल गांधी यांनी संसदेत जाहीरपणे सांगितले की, ‘मी मनुस्मृतीवर विश्वास ठेवत नाही, मी फक्त संविधानावर विश्वास ठेवतो.'”शंकराचार्य यांच्या मते, हिंदू धर्म मानणारा प्रत्येक व्यक्ती मनुस्मृतीशी निगडित असतो. “मनुस्मृती हा आमचा धर्मग्रंथ आहे, त्यामुळे जो कोणी त्यावर विश्वास ठेवत नाही, त्याला हिंदू म्हणता येणार नाही,” असेही ते म्हणाले. या वक्तव्यामुळे राहुल गांधींच्या विधानाच्या अनुषंगाने धार्मिक आणि राजकीय पातळीवर वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पर्यटन महोत्सवाच्या उ‌द्घाटनाला अजितदादांची दांडी; समारोपाला तरी उपस्थित राहणार का? चर्चांना उधाण

ज्योतिर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी एक गंभीर भूमिका घेत सर्व पंडित आणि हिंदू समाजाला आवाहन केले आहे. त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासाठी कोणतीही पूजा करू नये आणि त्यांच्या कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ नये. शंकराचार्य म्हणाले, “जो व्यक्ती धार्मिक शास्त्र आणि तत्त्वांवर विश्वास ठेवत नाही, त्याला हिंदू मानता येणार नाही.” त्यांनी पुढे सांगितले की, “राहुल गांधींसारख्या लोकांमुळेच धर्माचे नुकसान होण्याची भीती निर्माण होते.” या विधानांमुळे राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता असून, धार्मिक आणि सामाजिक वर्तुळातही विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

काय म्हटलं होतं राहूल गांधी यांनी?

गेल्या वर्षी १४ डिसेंबर रोजी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत मनुस्मृतीवर टीका करत सावरकरांच्या विचारांचा संदर्भ दिला होता. त्यांनी उजव्या हातात संविधान आणि डाव्या हातात मनुस्मृतीची प्रत घेऊन वक्तव्य करत सांगितले होते की, “सावरकरांनी त्यांच्या लेखनात स्पष्टपणे म्हटले आहे की भारतीय संविधानातील सर्वात वाईट गोष्ट म्हणजे त्यात काहीही ‘भारतीय’ नाही.”

रेल्वेचे खास गिफ्ट, पुण्यातून धावणार ‘ही’ नवीन एक्स्प्रेस ट्रेन : पहा वेळापत्रक

राहुल गांधी पुढे म्हणाले होते की, “सावरकरांच्या मते, मनुस्मृती हा वेदांनंतर सर्वात आदरणीय धर्मग्रंथ असून, तो हिंदू राष्ट्रासाठी मार्गदर्शक आहे. प्राचीन काळापासून ही संहिता आपल्या संस्कृती, परंपरा, विचार आणि वर्तनाचा पाया राहिली आहे. त्यांच्या मते, मनुस्मृतीतच आपल्या राष्ट्राचा आध्यात्मिक आणि दैवी प्रवास संहिताबद्ध स्वरूपात मांडलेला आहे, आणि आजही मनुस्मृतीचाच विचार कायद्यासारखा केला जातो.” या विधानांमुळे संसद आणि देशभरात मोठा वाद निर्माण झाला. राहुल गांधींनी सावरकरांच्या विचारांवर आधारित टीका करत संविधानावरील विश्वास अधोरेखित केला, तर काहींनी त्यांच्या विधानांचा अर्थ हिंदू धर्माच्या मूलतत्त्वांना विरोधी असल्याचा घेतला.

 

 

 

Web Title: Rahul gandhi news excommunicate rahul gandhi from hinduism shankaracharya avimukteswaranand saraswatis statement creates a stir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2025 | 01:27 PM

Topics:  

  • Constitution of India

संबंधित बातम्या

राहुल गांधींच्या ‘जीवाला धोका’ नक्की कोणापासून? कोर्टात केलेल्या दाव्याला नवे वळण, वकिलांचा अर्ज
1

राहुल गांधींच्या ‘जीवाला धोका’ नक्की कोणापासून? कोर्टात केलेल्या दाव्याला नवे वळण, वकिलांचा अर्ज

काँग्रेसचा मोठा निर्णय; मोहन जोशींची केली ‘या’ पदावर निवड
2

काँग्रेसचा मोठा निर्णय; मोहन जोशींची केली ‘या’ पदावर निवड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.