Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

S Jaishankar : ‘दहशतवादी हल्ले झाले तर योग्य प्रत्युत्तर देणार’; जयशंकर यांचा अमेरिकेतून पाकिस्तानला इशारा

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर सध्या अमेरिकेच्या चार दिवसीय दौऱ्यावर असून, त्याच दरम्यान क्वाड (QUAD) परिषदेच्या निमित्ताने त्यांनी पाकिस्तानला कडक शब्दांत इशारा दिला आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jul 03, 2025 | 01:00 AM
'दहशतवादी हल्ले झाले तर योग्य प्रत्युत्तर देणार'; जयशंकर यांचा अमेरिकेतून पाकिस्तानला इशारा

'दहशतवादी हल्ले झाले तर योग्य प्रत्युत्तर देणार'; जयशंकर यांचा अमेरिकेतून पाकिस्तानला इशारा

Follow Us
Close
Follow Us:

जम्मू-कश्मीरच्या पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पुन्हा एकदा आपली कठोर आणि स्पष्ट भूमिका आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडली आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर सध्या अमेरिकेच्या चार दिवसीय दौऱ्यावर असून, त्याच दरम्यान क्वाड (QUAD) परिषदेच्या निमित्ताने त्यांनी पाकिस्तानला कडक शब्दांत इशारा दिला आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया संबंधांत नवा अध्याय; एस. जयशंकर-पेनी वोंग भेटीत द्विपक्षीय सहकार्याला नवी दिशा

क्वाड परिषदेची बैठक अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथे झाली. अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारत या चार देशांचा हा मंच जागतिक राजकारणात आणि सुरक्षा विषयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. याच मंचावर बोलताना जयशंकर यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि भविष्यात भारतावर असे हल्ले झाल्यास त्याला कठोर प्रत्युत्तर दिलं जाईल, असे स्पष्ट केलं.

“भारत शांत बसणारा देश नाही. जर पुन्हा अशा प्रकारचे हल्ले झाले, तर केवळ हल्लेखोरच नव्हे, तर त्यांना पाठीशी घालणाऱ्यांनाही आम्ही लक्ष्य करू,” असे ठाम विधान जयशंकर यांनी केलं. त्यांनी सांगितले की, भारताचा हा संदेश पाकिस्तानपर्यंत पोहोचवण्यात आला आहे आणि देशाची सुरक्षा ही सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे.

जयशंकर यांनी यावेळी ‘ऑपरेशन सिंदूर’बाबतही क्वाड सदस्यांना माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केलं की, भारत गेल्या अनेक दशकांपासून दहशतवादाचा सामना करत आहे. “आता भारतानं नवं धोरण स्वीकारलं आहे – फक्त बचावावर विश्वास न ठेवता, हल्ल्यांना निर्णायक आणि आक्रमक प्रत्युत्तर दिलं जाईल,” असं सांगत त्यांनी ७ मे रोजी भारताने केलेल्या कारवाईचं समर्थन केलं.

या बैठकीच्या दरम्यान भारताच्या राजकीय ऐक्याचंही त्यांनी विशेष कौतुक केलं. विविध राजकीय पक्षांचे नेते परराष्ट्र दौऱ्यावर एकत्र आले असून, त्यांनी एकसंधपणे भारताची भूमिका मांडली, हे विशेष महत्त्वाचं असल्याचं जयशंकर म्हणाले. “शशी थरूर, सुप्रिया सुळे, कनिमोई, रविशंकर प्रसाद, जय पांडा, संजय झा, सलमान खुर्शीद, अनिल शर्मा आणि गुलाम नबी आझाद यांच्यासह अनेक नेत्यांनी परदेशात भारताची बाजू सशक्तपणे मांडली,” असं त्यांनी नमूद केलं.

पाकिस्तानचा पर्दाफाश! पहलगाम हल्ल्यावर QUAD चा ठाम संदेश; असीम मुनीर आणि शाहबाज शरीफ यांना मोठा धक्का

या संपूर्ण संवादातून एक गोष्ट स्पष्ट झाली – भारत आता दहशतवादाच्या विरोधात अधिक निर्धाराने आणि एकजुटीने उभा आहे. केवळ आंतरिक पातळीवर नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारत आता आपली सुरक्षा आणि सार्वभौमत्व याबाबत कोणतीही तडजोड करणार नाही, याचा ठाम संदेश परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिला आहे. या भाषणामुळे पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढण्याची शक्यता असून, दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताची भूमिका आणखी बळकट झाली आहे.

 

 

Web Title: S jaishankar slams pakistan in quad meeting america on pahalgam terror attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2025 | 12:44 AM

Topics:  

  • India vs Pakistan
  • Pahalgam Terror Attack
  • S. Jaishankar

संबंधित बातम्या

लवकरच युद्ध होणार या भविष्यवाणीला नेमकं म्हणायचा का? अमेरिकेच्या दौऱ्यावर असीम मुनीरचे बडबड बोल
1

लवकरच युद्ध होणार या भविष्यवाणीला नेमकं म्हणायचा का? अमेरिकेच्या दौऱ्यावर असीम मुनीरचे बडबड बोल

आशिया कप 2025 पूर्वी पाकिस्तानचा संघ घाबरला? 14 सप्टेंबरला भारत हरवेल का…पराभवाचं भय स्पर्धेआधीचं
2

आशिया कप 2025 पूर्वी पाकिस्तानचा संघ घाबरला? 14 सप्टेंबरला भारत हरवेल का…पराभवाचं भय स्पर्धेआधीचं

Asia Cup 2025 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर भारत बहिष्कार टाकणार का? अहवालात मोठा दावा
3

Asia Cup 2025 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर भारत बहिष्कार टाकणार का? अहवालात मोठा दावा

Asia Cup 2025 : कोणाच्या हाती असणार आशिया कपमध्ये टीम इंडियाची कमान! हे खेळाडू कॅप्टन्सीच्या शर्यतीत
4

Asia Cup 2025 : कोणाच्या हाती असणार आशिया कपमध्ये टीम इंडियाची कमान! हे खेळाडू कॅप्टन्सीच्या शर्यतीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.