Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

..तर मोदींना डोक्यावर घेऊन नाचलो असतो; ठाकरेंचे अरविंद सावंत संसदेत कडाडले

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ‘ऑपरेशन सिंदूर’वर चर्चा सुरू आहे. या चर्चेदरम्यान अरविंद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र धोरणावर सडकून टीका केली. एकाही देशाने भारताची बाजू घेतली नसल्याचा आरोप त्यांनी केला.

  • By संदीप गावडे
Updated On: Jul 28, 2025 | 08:08 PM
..तर मोदींना डोक्यावर घेऊन नाचलो असतो; ठाकरेंचे अरविंद सावंत संसदेत कडाडले

..तर मोदींना डोक्यावर घेऊन नाचलो असतो; ठाकरेंचे अरविंद सावंत संसदेत कडाडले

Follow Us
Close
Follow Us:

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ‘ऑपरेशन सिंदूर’वर चर्चा सुरू आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सरकारची भूमिका मांडली असली तरी विरोधकांनी सरकारवर प्रश्नांचा भडिमार केला आहे. शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार अरविंद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी परराष्ट्र धोरणावर सडकून टीका केली. पाकव्याप्त काश्मीरबाबत निर्णायक भूमिका न घेणं हे सरकारचं अपयश असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

पहलगाममध्ये दहशतवादी आलेच कसे? हल्ल्यानंतर पळून जाण्यास कोणी मदत केली? : गौरव गोगोईंचे संसदेत सवाल

सावंत म्हणाले की, “पाकव्याप्त काश्मीर हस्तगत करण्याची संधी असताना पंतप्रधानांनी बिनशर्त युद्धबंदी जाहीर का केली? मोदींनी इंदिरा गांधीप्रमाणे पाकिस्तानचे तुकडे केले असते, तर आम्ही त्यांना डोक्यावर घेऊन नाचलो असतो. ‘घुसके मारेंगे’ ही फक्त घोषणाच राहिली, प्रत्यक्षात कारवाई झाली नाही, अशी टीका त्यांनी केली.

“मोदींच्या परराष्ट्र धोरणामुळे भारत एकटं पडलं आहे. सार्कमधील शेजारी देश भारताच्या बाजूने उभे राहिले नाहीत. इराणसारख्या पारंपरिक मित्रदेशासोबतही संबंध बिघडले. कॅनडाने विरोध केला आणि पाकिस्तानच्या बाजूला अमेरिका, चीन, तुर्कस्तान उभे राहिले. याला जबाबदार कोण?” असा सवाल त्यांनी केला.

त्यांनी पंतप्रधानांच्या भाषणशैलीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटलं की, “ऑपरेशन सिंदूरनंतर त्यांनी टेलिप्रॉम्टरवरून इंग्रजीत भाषण केलं. हे जागतिक दर्शकांसाठी होतं का? देशात दहशतवादी मोकाट फिरत असताना ढोल बडवण्याचं काम केलं जातं.”

सावंत यांचा रोख पंतप्रधानांच्या संवेदनशीलतेवरही होता. “ते अजूनही पहलगामला किंवा मणिपूरला गेलेले नाहीत. त्यांची संवेदना कुठे आहेत?” असा सवाल करत त्यांनी पंतप्रधानांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केलं.

एकीकडे संसदेत ‘सिंदूर’वर चर्चा अन् श्रीनगरमध्ये लष्कराचे ‘ऑपरेशन महादेव’! ‘त्या’ दहशतवाद्यांचा खात्मा

“आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून युद्धाच्या वेळीच पाकिस्तानला अब्जावधींची मदत मिळते, आणि आपण विरोध करूनही काही फरक पडत नाही. ही भारताची जागतिक स्तरावरील स्थिती दर्शवते, पाकिस्तानने युद्ध थांबवण्यासाठी आपल्यासमोर हातपाय जोडले, हे जगाला सांगायचं होतं. पण आमचे पंतप्रधान मात्र गप्प बसले,” अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.

शेवटी सावंत यांनी भारत-पाक क्रिकेट संदर्भातही आपली भूमिका स्पष्ट केली. “भारतावर दहशतवादी हल्ले करणाऱ्या पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणं थांबवायला हवं,” असं ठाम मत त्यांनी यावेळी मांडलं.

Web Title: Shiv sena mp arvind sawant attack on pm modi on operation sindoor and foreign policy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2025 | 08:06 PM

Topics:  

  • Arvind Sawant
  • Operation Sindoor
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

उद्योगांना लाभदायक ठरणारी पहिली AI Living Lab महाराष्ट्रात; मंगल प्रभात लोढांच्या हस्ते शुभारंभ
1

उद्योगांना लाभदायक ठरणारी पहिली AI Living Lab महाराष्ट्रात; मंगल प्रभात लोढांच्या हस्ते शुभारंभ

Amit Shah कडाडले! राहुल गांधींना शेतकरी मुद्द्यावरून विचारला १० वर्षांचा हिशोब; आकडेवारीनिशी केलं चॅलेंज
2

Amit Shah कडाडले! राहुल गांधींना शेतकरी मुद्द्यावरून विचारला १० वर्षांचा हिशोब; आकडेवारीनिशी केलं चॅलेंज

भारत स्टार्टअप्सची ‘महासत्ता’! केंद्र सरकारने दिली १०,००० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी, नव्या कल्पनांना मिळणार पंख
3

भारत स्टार्टअप्सची ‘महासत्ता’! केंद्र सरकारने दिली १०,००० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी, नव्या कल्पनांना मिळणार पंख

ओम बिरला कोणच्या दबावाखाली करतायेत काम? विरोधकांचा अविश्वासाचा प्रस्ताव करणार घाव
4

ओम बिरला कोणच्या दबावाखाली करतायेत काम? विरोधकांचा अविश्वासाचा प्रस्ताव करणार घाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.