Pakistan Cricket Board has abolished the daily allowance for its women players
Pakistan Cricket Board : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी एकीकडे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड स्टेडियमच्या दुरुस्तीसाठी पैसे खर्च करीत आहे, तर दुसरीकडे बोर्डाने आपल्या खेळाडूंना मिळणारा दैनिक भत्ता रद्द केल्याची बातमी समोर आली आहे. या निर्णयामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर आता जगभरातून टीका होत आहे. एवढेच नाही तर कोणत्याही प्रकारचा दैनंदिन भत्ता न मिळाल्याने खेळाडूही निराश आणि नाराज आहेत. या संपूर्ण प्रकरणावर पीसीबीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘खेळाडूंना दैनंदिन भत्ता दिला जात नाही कारण बोर्ड आता त्यांना राहण्याची सोय करीत आहे आणि दिवसातून तीन वेळा पोटभर जेवण देत आहे.’
घरच्या मालिकेसाठी मुल्तान येथे सराव शिबिरात सहभाग
तथापि, दक्षिण आफ्रिका महिला संघाविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी मुल्तान येथे सराव शिबिरात भाग घेत असलेल्या खेळाडूंना वाटते की, देशाच्या विविध भागांतून ते एकत्र आले असल्याने हा निर्णय योग्य नव्हता. दक्षिण आफ्रिकेचा संघ आधीच मुल्तानमध्ये पोहोचला आहे आणि 17 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या पांढऱ्या चेंडूंच्या मालिकेची तयारी करीत आहे, जी पुढील महिन्यात यूएईमध्ये होणाऱ्या आयसीसी महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेची तयारी म्हणून पाहिली जात आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन
पुढच्या वर्षी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करायचे आहे. त्यासाठी मंडळाकडून जोरदार तयारी सुरू आहे. पीसीबी मेगा इव्हेंटसाठी देशातील सर्व मोठे स्टेडियम तयार करण्यात व्यस्त आहे. त्यासाठी तो पाण्यासारखा पैसा खर्च करीत आहे. मात्र, असे असूनही चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये खेळवली जाईल की नाही हे निश्चित नाही.
एक फूट 4 इंच गोलंदाज म्हणतात
पीसीबीने संभाव्य वेळापत्रक तयार केले
वास्तविक, भारतीय क्रिकेट संघ आयसीसीच्या या स्पर्धेत पाकिस्तानला जाणार नाही. असे झाल्यास आयसीसीला वेळापत्रकाचा पुनर्विचार करावा लागू शकतो. पीसीबीने संभाव्य वेळापत्रक तयार केले असून टीम इंडियाचे सर्व सामने लाहोरमध्ये आयोजित करण्याची चर्चा आहे, मात्र भारत सरकारने ग्रीन सिग्नल दिला तरच टीम इंडिया पाकिस्तानला जाऊ शकेल.
पाकिस्तानच्या यजमान हक्कांवर टांगती तलवार
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानच्या यजमान हक्कांवर टांगती तलवार आहे. कारण टीम इंडियाने पाकिस्तानचा दौरा केला नाही तर त्याचे सर्व सामने तटस्थ ठिकाणी होणार आहेत. अशा परिस्थितीत आयसीसी संपूर्ण टूर्नामेंट शिफ्ट करू शकते. यामुळे पाकिस्तानच्या तयारीलाच फटका बसणार नाही, तर त्याला मोठे नुकसानही सहन करावे लागू शकते.