Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 24 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट; पावसाने दडी मारल्याने पिकांना फटका

मागील आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पाण्याअभावी (due to lack of water.) पीके वाळू लागली आहेत. (the crops have started drying up) त्याचा परिणाम सोयाबीन, कापूस (soybean and cotton) या पिकांवर विविध किडरोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

  • By Navarashtra Staff
Updated On: Jul 04, 2021 | 08:52 PM
शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट; पावसाने दडी मारल्याने पिकांना फटका
Follow Us
Follow Us:

वर्धा (Wardha).  मागील आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पाण्याअभावी (due to lack of water.) पीके वाळू लागली आहेत. (the crops have started drying up) त्याचा परिणाम सोयाबीन, कापूस (soybean and cotton) या पिकांवर विविध किडरोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कास्तकारांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.

[read_also content=”Nagpur corona update नागपुरात रविवारी कोरोना पाॅझटिव्ह रुग्णसंख्या १४ वर;‘जाणून घ्या!’ कोरोना Active रुग्णांची आकडेवारी https://www.navarashtra.com/latest-news/in-nagpur-the-number-of-corona-positive-patients-rose-to-14-on-sunday-corona-active-patient-statistics-nrat-150936.html”]

जिल्ह्यामध्ये खरीप हंगामासाठी सरासरी साडेचार लाख हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी आजपर्यंत 4 लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. एकूण क्षेत्राच्या 80 क्षेत्रावर सोयाबीन, कापसासह इतर पिकांची पेरणी झालेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पेरणी जवळपास आटोपण्याच्या मार्गावर आहे. सुरुवातील चांगला पाऊस झाल्याने कास्तक-यांनी कापसाची लागवड केली तसेच सोयाबीनची पेरणी करण्यात आली.

पिकांची उगवण चांगल्याप्रकारे झाली असताना आता पावसाने दडी मारली आहे. त्याचा परिणाम पेरणी केलेल्या जमिनीला भेगा पडत असून पीके वाळू लागली आहेत. तसेच पावसाच्या उघडीपमुळे विविध किडींचा प्रादुर्भाव झाल्याने पीके जमिनीवर येण्याआधीच फस्त केली जात आहेत. त्यामुळे शेतक-यांना या संकटाचा सामना करावा लागत आहे.

गतवर्षीपेक्षा पाच टक्के अधिक पाऊस
पावसाळ्यास प्रारंभ झाला तेव्हापासून जिल्ह्यात आजपर्यंत 26.33 टक्के पाऊस झाला आहे. तर गतवर्षी 3 जुलैपर्यंत 21.05 टक्केच पर्जन्यमान झाले होते. मागील वर्षीची तुलना केली असता यंदा पाच टक्के जास्त पाऊस पडला. मात्र, पर्जन्यमान जास्त झाले असले तरी पिकांची पेरणी केल्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने त्याचा फटका पिकांना बसला आहे. त्यामुळे आणखी काही दिवस पावसाने दडी मारल्यास शेतक-यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे.

काही भागातील पेरण्या खोळंबल्या
जिल्ह्यात आजघडीला खरीप हंगामाची 4 लाखांपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी करण्यात आलेली आहे. पण, काही भागात अजूनही चांगला पाऊस झाला नसल्याने शेतकरी पेरणीच्या प्रतिक्षेत असल्याचे चित्र आहे.

पिकांची स्थिती नाजूक
गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिकांची परिस्थिती नाजूक झाली आहे. येत्या दोन दिवसांत पाऊस आला नाही तर पीके हातची जातील. त्यामुळे दुबार पेरणी करण्याचे संकट शेतक-यांसमोर आहे.
-गजानन झाडे, शेतकरी कुटकी

पीके वाळू लागली
पेरणीयोग्य पाऊस झाल्यामुळे मागील 20 दिवसांपूर्वी सोयाबीनची पेरणी केली. तसेच त्यापूर्वी कापसाचीही लागवड केलेली आहे. मात्र, गेल्या आठवड्यापासून पावसाने दडी मारल्याने पिके वाळू लागली आहेत.
–प्रशांत नागतोडे, शेतकरी सेवाग्राम

किडींचा प्रादुर्भाव वाढला
पिकांची पेरणी करूनही मागील काही दिवसांपासून पाऊस आलेला नाही. त्यामुळे सोयाबीन व कापूस या पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढला असून उगवत्या पिकांची पाने कुर्तडली जात आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गापुढे नवे संकट ओढवले आहे.
–विमलबाई भोकरे, शेतकरी कुटकी

Web Title: Crisis of double sowing on farmers crops hit by heavy rains nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2021 | 08:52 PM

Topics:  

  • Wardha district news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.