Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोरोनाची दुसरी लाट पडू शकते महागात, अनेकजण जाऊ शकतात नैराश्यात – मनोविकारतज्ञांचा इशारा

गेल्या आठ महिन्यात कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये उलथापालथ झाली आहे. कोरोना महामारीची दुसरी लाट(corona second wave) आली तर या आघाताने भारतातील नागरिकांचे मानसिक आरोग्य(mental health) अधिक बिघडण्याची शक्यता मनोविकार तज्ञांनी व्यक्त केली आहे.

  • By Navarashtra Staff
Updated On: Nov 28, 2020 | 06:16 PM
depression

depression

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट(corona second wave) आली, तर ती सर्वांना महागात पडेल, असा इशारा नुकताच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा याविषयी भीती व्यक्त केली असून खबरदारीचे सर्व उपाय नागरिकांनी पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या आठ महिन्यात कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये उलथापालथ झाली आहे. कोरोना महामारीची दुसरी लाट आली तर या आघाताने भारतातील नागरिकांचे मानसिक आरोग्य अधिक बिघडण्याची शक्यता मनोविकार तज्ञांनी व्यक्त केली आहे.

कोरोना महामारीच्या संकटाने केलेल्या आघाताने जगाचे झालेले आर्थिक नुकसान पुढील काही वर्षेही भरून न निघणारे आहे. कोरोनामुळे तसेच इतर आजारांमुळे गेल्या आठ महिन्यात अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावले असून या सोबतच अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. तसेच अनेकांचे उद्योगधंदे बंद झाले असल्यामुळे अनेक नागरिक मानसिक ताण तणावाखाली आले आहेत.

याबाबात मनोविकारतज्ञ डॉ प्रतीक सुरंदशे सांगतात, कोरोना विषाणू महामारी जर वेळीच आटोक्यात आली नाही तर मानसिक आजार निगडित विविध समस्यांचा महापूर येण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. त्यातच भारतामध्ये मानसिक आजार आणि त्यांच्या समस्यांकडे  केले जाणारे दुर्लक्ष पाहता वैद्यकीय क्षेत्रात तारांबळ उडेल, अशी भीती आहे. लॉकडाऊनमुळे शाळांमध्ये मुलांचे एकत्र न येणे, एकत्र न खेळणे, कार्यालयात सहकाऱ्यांशी कमी झालेले संवाद, भेटीगाठी कमी झाल्यामुळे नात्यांमध्ये आलेला दुरावा, नोकऱ्यांची झालेली वाताहात याचा एकत्रित परिणाम कुठे ना कुठे प्रत्येकावर झाला आहे.

लॉकडाउननंतर वाढलेली दारू व अंमली पदार्थांची विक्री याचा थेट संबंध कुठे ना कुठे मानसिक आरोग्याशी नक्कीच आहे. पैशाचे सोंग कसे करणार, हाच एक दाहक प्रश्न सर्वांसमोर आहे. त्यामुळे येत्या काळात आत्महत्या, अमली पदार्थांचे सेवन आदी प्रकार वाढण्याची भीती आहे. मानसिक आरोग्य समस्या हे कोरोना महामारीपेक्षाही मोठे संकट आहे व याची दाहकता आज आपण सर्वजण अनुभवत आहे.  मानसिक ताण जाणवत असलेल्या नागरिकांनी हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करून मदत मागावी. लोकांच्या संपर्कात राहावे, व्यायाम करावा आणि गरज भासेल तेव्हा मनोविकार तज्ञांशी बोलावे. मानसिक ताणतणाव घालवण्यासाठी लोकांनी आपल्या मित्रमंडळी व कुटुंबियांशी सक्रियपणे बोलत राहावे, आपल्या जवळच्या व्यक्तीमध्ये अथवा मित्र परीवारामध्ये नैराश्याची आणि आत्महत्येच्या प्रवृत्तीची लक्षणे दिसल्यास सावध व्हावे, त्यांच्या शंकांचे निरसन करून देणे ही काळाची  फार गरजेचे आहे.

दरम्यान, महामारीमुळे दहा कोटीहून अधिक लोक गरीबीच्या रेषेतून आणखी खाली जातील, अशी भीती आहे. आर्थिक मंदी आणि मानसिक आरोग्य समस्या पसरवण्यापासून थांबवणे ही सध्या जगासमोरील चिंता आहे. कोरोना विषाणूची लागण आपल्याला होईल का व जर झाली तर आपण त्यामधून बाहेर पडू का? तसेच त्यासोबतच  विद्यार्थ्याना  भविष्याची चिंता, कोलमडलेली आर्थिक व्यवस्था, नोकरी व धंदा गेल्यामुळे कुटुंबावर कोसळणारी आर्थिक संकटांची कुर्‍हाड या गोष्टींची चिंता आज प्रत्येक वर्गातील नागरिकाला आहे व यातूनच मानसिक विकार वाढण्याची भीती आहे अशी माहिती मनोविकारतज्ञ डॉ. प्रतीक सुरंदशे यांनी दिली.

[read_also content=”ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त गृहमंत्र्यांनी दिली चांगली बातमी,पोलिसांसाठी १ लाख घरे बांधणार असल्याची घोषणा https://www.navarashtra.com/latest-news/home-minister-anil-deshmukh-declared-1-lakh-homes-to-police-on-the-day-of-one-year-of-government-57621.html”]

Web Title: Mental health experts said corona second wave may increase depression patients

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2020 | 06:14 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.