Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Rain News: पुढील दोन दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार; २६ ते ३० तारखेदरम्यान कसे असणार वातावरण?

३१ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत राज्यात पुन्हा एकदा मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 23, 2024 | 10:04 PM
चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीत पुराचे थैमान; गोसेखुर्दच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस,

चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीत पुराचे थैमान; गोसेखुर्दच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस,

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या आठवड्यापासून राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.पाऊस राज्यातील विविध भागात हजेरी लावताना दिसून येत आहे. दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. २५ ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी राज्यात २६ ते ३० ऑगस्ट या कालावधीत उष्णतेचा पारा वाढणार असल्याचे सांगितले. तर ३१ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत राज्यात पुन्हा पाऊस कमबॅक करण्याची शक्यता आहे.

दरम्यान २५ ऑगस्टपर्यंत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अंदाजे उद्या धुळे, जळगाव, पुणे, सातारा, कोल्हापूर, मुंबई, ठाणे या जिल्ह्यात तसेच अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. तर २६ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट या कालावधीत राज्यात उष्णतेचा पारा वाढणार असल्याची शक्यता देण्यात आली आहे. तर पुढील दोन दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासन आणि सरकारकडून करण्यात आले आहे. यंदा राज्यातील सर्व भागात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

३१ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत राज्यात पुन्हा एकदा मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे,. राज्यात अनुकूल परिस्थिती असल्याने २५ ऑगस्टपासून मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि पुणे शहराला पुढील तीन दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात देखील मुसळधार पाऊस होत आहे. मध्यंतरी विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावल्याने राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होताना दिसत आहे. ही राज्यासाठी सुखकारक बाब आहे.

Web Title: Metrologist manikrao khule said next few days heavy rainfall in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2024 | 06:41 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.