Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई आणि ठाण्यातील कोरोनाची नियंत्रणाकडे वाटचाल

  • By Mayur Sawant
Updated On: Aug 09, 2020 | 09:17 AM
corona

corona

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई :  संपूर्ण देशासह राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद या जिल्ह्यांत कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि ठाण्यात कोरोनाचा संसर्ग कमी होताना दिसत आहे. कोरोनावर प्रतिबंध उपायांची कठोर अंमलबजावणी, तपासणी मोहीम, सर्वेक्षण, प्रतिजन चाचण्या आणि रूग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे त्वरीत विलगीकरण या सर्व गोष्टींक़डे भर दिल्याने रूग्णवाढीच्या प्रमाणात घट होताना दिसत आहे.

मुंबई प्रशासनाने कठोर नियमांची अंमलबजावणी केल्यामुळे अवघ्या १५ दिवसांमध्ये उत्तर मुंबईत ३० टक्क्यांनी कोरोना रूग्णांची घट झाली आहे. त्याचप्रमाणे ठाणे मनपा क्षेत्रात आणि जिल्ह्यात कोरोनाच्या संख्येने उच्चांक गाठला होता. परंतु ठाणे शहरातील कोरोनाबाधित रिकव्हरी रेट हा ८५ टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच ठाणे शहरात १५ टक्के कोरोनाबाधितांवर कोरोनाच्या विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. ठाणे शहरातील वागळे इस्टेट, लोकमान्यनगर, मुंब्रा परिसर, तर कल्याण-डोंबिवली शहरांतील कल्याण पूर्व परिसर, उल्हासनगर आणि भिवंडी शहर यांसारख्या संक्रमित भागांचा समावेश आहे. या भागांमध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण गेल्या आठवडय़ापासून घटल्याचे दिसत आहे. 

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात मागील महिन्यात दररोज ४५० हून अधिक रुग्ण आढळत होते. मात्र, महापालिका प्रशासनाने शहरातील चाचण्यांची संख्या वाढवल्याने तसेच सर्वेक्षण आणि प्रतिजन चाचण्यांवर भर दिल्यामुळे ऑगस्टच्या सुरुवातीपासून शहरात दिवसाला ३५० पेक्षा कमी रुग्ण आढळत आहेत. उल्हानगर महापालिका क्षेत्रात दिवसाला २०० ते २५० आणि भिवंडी महापालिका क्षेत्रात ८० ते ९० रुग्ण आढळत होते.  मात्र, या दोन्ही महापालिकांवर नव्याने नियुक्त झालेल्या प्रशासकीय प्रमुखांनी आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यावर अधिक भर दिला. त्यामुळे जुलैच्या अखेरीपासून या दोन्ही शहरांत कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या उल्हासनगर शहरात दिवसाला ४० हून कमी रुग्ण आढळत आहेत, तर भिवंडी शहरात दररोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या २५ हून कमी झाली आहे.

Web Title: Moving towards control of corona in mumbai and thane

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2020 | 09:17 AM

Topics:  

  • कोरोना रूग्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.