Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तलावांच्या तालुक्यात तहानलेली शेती, सिंचन प्रकल्पांचा लाभही परराज्यातील शेतीला आता, शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागेल का ?

पाण्याचा उपयोग तालुक्यातील शेतीला व्हावा म्हणून कालव्यामार्फत शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत पोहोचविण्याची सोय उपलब्ध आहे. मात्र, कालव्यात पाणी सोडताच शेतकऱ्यांच्या शेतात जाण्याऐवजी नदी-नाल्यांना पाणी वाहून जातो.

  • By Anjali Awari
Updated On: Mar 03, 2022 | 06:52 PM
Thirsty agriculture in the taluka of lakes, even the benefits of irrigation projects.

Thirsty agriculture in the taluka of lakes, even the benefits of irrigation projects.

Follow Us
Close
Follow Us:

सालेकसा : गोंदिया जिल्ह्याच्या पूर्व दिशेला तालुक्यातून वाहत असलेली मोठी वाघ नदी, लहान वाघ नदी व कुआढास नदी, संपूर्ण जिल्ह्यात इतर तालुक्याच्या तुलनेत सर्वात जास्त लहान मोठी धरणे व तलाव आहेत. या जलसाठ्याचा उपयोग गोंदिया जिल्ह्यातील बहुतांश भागाला व मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यात सिंचनासाठी होत आहे. तर, तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमीनी मात्र सिंचनाच्या पाण्याकरिता तहानलेल्याच आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठी शोकांतिका असून, स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींची कर्तव्यशून्यता यातून दिसते, असे म्हटल्यास तरी चुकीचे ठरणार नाही.  

[read_also content=”बिडीओला ६५ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाद्वारे अटक https://www.navarashtra.com/latest-news/vidarbha/gondia/bdo-caught-red-handed-while-accepting-bribe-of-rs-65000-arrested-by-bribery-prevention-department-nraa-248341.html”]

तालुक्यातील पुजारीटोला व कालिसरार या मोठ्या धरणासोबतच बेवारटोला मध्यम प्रकल्प, ओवारा मध्यम प्रकल्प, मानगड लघु प्रकल्प व पिपरीया लघु प्रकल्प येथेच आहेत. तसेच, अनेक मामा व लपा तलाव याच तालुक्यात आहेत. यातील पाण्याचा उपयोग तालुक्यातील शेतीला व्हावा म्हणून कालव्यामार्फत शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत पोहोचविण्याची सोय उपलब्ध आहे. मात्र, कालव्यात पाणी सोडताच शेतकऱ्यांच्या शेतात जाण्याऐवजी नदी-नाल्यांना पाणी वाहून जातो. जिकडे-तिकडे कालवे फुटलेले असून कालव्याची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या वाट्याचे पाणी नदी नाल्यात वाया जात आहे. याबाबत अनेक तक्रारी संबंधित विभागाला केल्या जातात. परंतु, सिंचनाची सोय करणारा विभाग म्हणजेच बाघ सिंचन व्यवस्थापन शाखा सालेकसा, गोंदिया सिंचन विभाग शाखा सालेकसा, जि. प. लघु सिंचन उपविभाग सालेकसा, लघु पाटबंधारे(स्थानिक स्तर) उपविभाग सालेकसा या विभागातील कार्यरत अभियंता यांना शेतकऱ्यांच्या सुखदु:खाशी काही देणे घेणे नसल्याचे दिसून येत आहे. 

[read_also content=”रस्त्याची दुर्दशा पाहून चक्क आमदारांनीच बदलला रस्ता तर, जनतेने दाद मागायची कुणाकडे, अहो आमदार साहेब ….. https://www.navarashtra.com/latest-news/vidarbha/gondia/seeing-the-plight-of-the-road-only-the-mlas-changed-the-road-nraa-248668.html”]
देखभाल दुरुस्तीच्या नावावर संबंधित अधिकारी व कंत्राटदार टक्केवारी ठरवून थातूरमातूर काम करून वेळ काढण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी बांधकाम पूर्ण झाल्याचा पाठपुरावा शासनाकडे केला जातो. परंतु, पाऊस आला की संबंधित बांधकाम वाहून जातो. परिणामी तालुक्यातील शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या कालव्यांची स्थिती नेहमी जैसे थे राहते. तालुक्यातील जलाशये व धरणाचा उपयोग शेतकऱ्यांना होत नाही. या वर्षीच्या अशाच परिस्थितीमुळे पुजारीटोला धरणाचा उपयोग शेतकऱ्यांना होत नाही. या वर्षी अशाच परिस्थितीमुळे पुजारीटोला धरणाचे पाणी तालुक्यातील कोटजंभूरा, लटोरी, पोवारीटोला, नवेगाव व अशा अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचू शकला नाही. मानागड सिंचन प्रकल्पाचे पाणी गेल्या पाच ते सहा वर्षांपासून सोनारटोला, बोदलबोडी आणि परिसरातील लोधीटोला, सुकाटोला व गल्लाटोला येथील शेतापर्यंत पोहोचले नाही. त्याचप्रमाणे लघु पाटबंधारे सिंचन उपविभागाच्या नियंत्रणात असलेल्या आंबानाला तलाव, पिपरीया तलावाच्या पाण्यापासून कोहकाटोला, कारुटोला, निमटोला व रामाटोला येथील शेतकरी कित्येक वर्षांपांसून सिंचनापासून वंचित असल्याची परिस्थिती आहे.

Web Title: Thirsty agriculture in the taluka of lakes even the benefits of irrigation projects nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2022 | 06:52 PM

Topics:  

  • gondia news
  • irrigation projects

संबंधित बातम्या

Mangal Prabhat Lodha: “सरकारच्या विकास कार्याला साथ…”; मंत्री लोढांचे राज्यातील जनतेला आवाहन
1

Mangal Prabhat Lodha: “सरकारच्या विकास कार्याला साथ…”; मंत्री लोढांचे राज्यातील जनतेला आवाहन

गोंदियात पालिकेच्या शाळा पडल्या ओस; 14 शाळांमध्ये केवळ 695 विद्यार्थी
2

गोंदियात पालिकेच्या शाळा पडल्या ओस; 14 शाळांमध्ये केवळ 695 विद्यार्थी

Gondia Crime: प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल, मित्रांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर केली पोस्ट चिठ्ठी, नंतर…
3

Gondia Crime: प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल, मित्रांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर केली पोस्ट चिठ्ठी, नंतर…

Devendra Fadnavis: “सिंचन प्रकल्प पूर्ण करून शेतकऱ्यांच्या जीवनात…” ; CM फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
4

Devendra Fadnavis: “सिंचन प्रकल्प पूर्ण करून शेतकऱ्यांच्या जीवनात…” ; CM फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.