Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चक्रीवादळात नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी?; जिल्हा प्रशासनाने स्थालांतराचे आदेश दिल्यास तात्काळ त्याची अंमलबजावणी करावी

चक्रीवादळामुळे झाडे उन्मळून व तुटून पडण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व नागरिकांनी आपल्या घराच्या आसपास व घराला संभाव्य धोका असणारी झाडे तात्काळ तोडून घ्यावीत.

  • By Vivek Bhor
Updated On: May 15, 2021 | 03:20 PM
चक्रीवादळात नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी?; जिल्हा प्रशासनाने स्थालांतराचे आदेश दिल्यास तात्काळ त्याची अंमलबजावणी करावी
Follow Us
Close
Follow Us:

शनिवार, रविवारच्या दरम्यान प्रचंड वेगाने येणारे ताउक्‍ते चक्रीवादळ मुंबई, पालघर, रायगडसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर धडकण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्याप्रमाणे रत्नागिरी तालुक्यातील सागरी किनाऱ्यावरील व आसपासच्या सर्व गावांमधील नागरिकांना दि. १४ ते १८ मे या कालावधीत सतर्क राहण्याचे आवाहन तहसीलदार शशिकांत जाधव यांनी केले आहे.

वीज जाण्याची संभाव्य शक्यता

तसेच किनारपट्टीच्या आसपासच्या गावातील सर्व नागरीकांनी आपल्या घरातील वीज जाण्याची संभाव्य शक्यता लक्षात घेऊन तात्काळ आपल्या घरात आवश्यक तितक्या मेणबत्ती/आगकाडी बॉक्स/केरोसीन/टॉर्च/बॅटरी/शुष्कघट इ साहित्य तयार जवळ ठेवावेत.

झाडे तात्काळ तोडून घ्यावीत

चक्रीवादळामुळे झाडे उन्मळून व तुटून पडण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व नागरिकांनी आपल्या घराच्या आसपास व घराला संभाव्य धोका असणारी झाडे तात्काळ तोडून घ्यावीत.

रेशनची व्यवस्था करुन ठेवावी

सर्व नागरिकांनी आवश्यक रेशनची आपल्या कुटुंबासाठी व्यवस्था करुन ठेवावी. संकटकालीन वापराकरिता कोरडे व खराब न होणारे खाद्यपदार्थ खबरदारीचे उपाय म्हणून तयार ठेवावेत. लहान मुले, वृध व्यक्तींसाठी लागणारा विशेष आहार सोबत ठेवावा.

चक्रीवादळाच्या दृष्टीने प्रसिध्दी करावी

ग्राम कृती दल व ग्रामपंचायती यांनी सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी, स्थानिक शासकीय कर्मचारी यांच्या मदतीने चक्रीवादळ व त्या अनुषंगाने घ्यावयाची काळजी याबाबत दवंडी, रिक्षा फिरवून, सोशल मीडियाचा वापर करुन प्रचार प्रसिध्दी करावी.

मोबाईल नंबरसह यादी तयार करण्यात यावी

प्रत्येक गावस्तरावर जे.सी.बी, वुड कटर पोहणारे व्यक्ती, आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतलेले कर्मचारी, स्वयंसेवक इ. ची मोबाईल नंबरसह यादी तलाठी व ग्रामपंचायत यांचेकडे तयार करण्यात यावी व त्यांचे संपर्कात राहावे.

पिण्याचे पाणी साठवून ठेवावे

प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर पुरेशा पिण्याची पाण्याची सोय, पाणी शुध्दीकरणासाठी पुरेशा प्रमाणात निर्जंतुकीकरण पावडर, उपलब्ध करुन घ्यावे. नागरीकांनी जादा पिण्याचे पाणी घरात सुरक्षित जागी साठवून ठेवावे.

मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये

या चक्रीवादळाच्या कालवधीत कोणीही मच्छीमार बांधव मासेमारीसाठी अथवा पोहण्यासाठी समुद्रात जाणार नाहीत याची दक्षता ग्राम कृती दल व ग्रामपंचायतीने घ्यावी.

अफवांवर विश्वास ठेऊ नये

अफवांवर विश्वास ठेऊ नये, अफवा पसरवू नये. कोणत्याही परिस्थितीत घबराटाची स्थिती निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. शंका असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष (०२३५२-२२६२४८) किंवा रत्नागिरी तालुका आपत्ती व्यवस्थापन कक्षात (०२३५२-२२३१२७) फोन करावेत.

[read_also content=”65 किमीपेक्षा अधिक वेगाने तौक्ते वादळ (Cyclone Tauktae in Arabian sea) केरळच्या किनारपट्टीकडे निघाले आहे https://www.navarashtra.com/latest-news/beware-of-coastal-areas-in-the-wake-of-totke-cyclone-instructions-given-by-the-chief-minister-nrdm-129127.html”]

सुरक्षित ठिकाणी जावे

आपले क्षेत्र चक्रीवादळाच्या धोक्यात सापडते, तेव्हा तात्काळ खाडी, सागरी किनारा व इतर पाणथळ जागा यापासून सुरक्षित ठिकाणी जावे.

उपाययोजना कराव्यात

खिडक्या/दरवाजे काचा बंद कराव्यात किंवा वाऱ्यापासून संरक्षण देणाऱ्या झडपा घालाव्यात. बाहेरील दरवाज्यांना मजबूत टेकू देण्यात यावा.

आदेश मिळताच सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे

चक्रीवादळाची तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनाने जर स्थलांतराचे आदेश दिल्यास तत्काळ आदेशाचे पालन करावे व सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत व्हावे व प्रशासनास सहकार्य करावे.

रुग्णवाहिकेची व्यवस्था करुन ठेवावी

चक्रीवादळातील आपदग्रस्तांना तात्काळ मदत व उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा हॉस्पिटलला आणण्यासाठी गावस्तरावर ग्रामपंचायत व ग्राम कृती दलांनी रुग्णवाहिकेची व्यवस्था करुन ठेवावी.

What precautions should citizens take in a cyclone If the district administration orders relocation it should be implemented immediately

Web Title: What precautions should citizens take in a cyclone if the district administration orders relocation it should be implemented immediately nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2021 | 03:20 PM

Topics:  

  • district administration

संबंधित बातम्या

‘प्रशासनात AI चा वापर करणारा सोलापूर जिल्हा देशात प्रथम’; जिल्हाधिकाऱ्यांचे विधान
1

‘प्रशासनात AI चा वापर करणारा सोलापूर जिल्हा देशात प्रथम’; जिल्हाधिकाऱ्यांचे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.