Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कधी विचार केला आहे का रेल्वे रुळांमध्ये दगडं का ठेवली जातात? फार खास आहे यामागील कारण; सविस्तर जाणून घ्या

रेल्वे ट्रॅकमध्ये टाकले जाणारे खडे म्हणजे ‘बलास्ट’. हे खडे पटर्‍यांची स्थिरता राखतात, पाण्याचा निचरा करतात, वजनाचं संतुलन साधतात आणि ध्वनीप्रदूषणही कमी करतात.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 15, 2025 | 08:04 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

जर तुम्ही कधी रेल्वे ट्रॅकला नीट पाहिलं असेल, तर लक्षात आलं असेल की पटर्‍यांच्या मधोमध आणि खालच्या भागात छोटे-छोटे खडे टाकलेले असतात. पण कधी विचार केलात का की हे खडे नेमके तिथे का असतात? यांचं काम काय असतं आणि जर हे खडे काढून टाकले, तर काय होईल? चला, यामागचं विज्ञान समजून घेऊया.

30 वर्ष जुन्या बद्धकोष्ठतेचा केला नायनाट, 3 पदार्थांचे सेवन करण्याचा रामदेव बाबांचा सल्ला; देशी उपायाने त्वरीत फायदा

पटर्‍यांच्या मधोमध खडे का टाकले जातात?

हे खडे सामान्य नसून त्यांना “बलास्ट” (Ballast) म्हणतात. हे ट्रॅकच्या मजबुती, टिकाऊपणा आणि सुरक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे असतात. हे खडे अनेक कारणांसाठी वापरले जातात:

पटर्‍यांना स्थिर ठेवण्यासाठी

रेल्वे इंजिन आणि डब्यांचं वजन फार जड असतं. ते जेव्हा चालू असतात, तेव्हा पटर्‍यांवर जोरदार दाब पडतो. बलास्ट खडे पटर्‍यांना त्यांच्या जागी घट्टपणे रोवून ठेवतात. हे एकमेकांशी इंटरलॉक होऊन मजबूत बेस तयार करतात. खडे नसल्यानं पटर्‍या हलू शकतात किंवा वाकू शकतात, ज्यामुळे अपघाताचा धोका वाढतो.

वजनाचा समतोल राखण्यासाठी

ट्रेनचा भार थेट पटर्‍यांवर येतो. बलास्ट खडे हा भार जमिनीवर समानरीत्या वाटतात. त्यामुळे विशिष्ट भागावर अधिक ताण येत नाही आणि पटर्‍या अधिक काळ टिकतात. बलास्टशिवाय पटर्‍या जमिनीत धसकू शकतात.

पाण्याचा निचरा करण्यासाठी

पावसाळ्यात पटर्‍यांच्या आसपास पाणी साचू शकतं, ज्यामुळे गंज येणं किंवा पटर्‍या कमकुवत होणं शक्य असतं. पण बलास्ट खड्यांमुळे पाण्याला बाहेर पडण्यासाठी जागा मिळते आणि ट्रॅक कोरडे राहतात. त्यामुळे पाण्याचं नुकसानकारक परिणाम होत नाही.

कंपन आणि आवाज कमी करण्यासाठी

ट्रेन धावत असताना मोठा आवाज आणि कंपन होतो. बलास्ट खडे हे कंपन शोषून घेतात आणि आवाज कमी करतात. खडे नसल्यानं आवाज अधिक होतो आणि आसपासच्या परिसरात ध्वनीप्रदूषण वाढू शकतं.

Grey Divorce: ‘नाही आता शक्य नाही…’ अनेक वर्ष संसारानंतर घटस्फोट घेणंं का होतंय नॉर्मल? वेळेसह नातंही थकतं का?

उष्णतेत बदल होतानाही सुरक्षितता राखण्यासाठी

धातूपासून बनलेल्या पटर्‍या उन्हात ताणतात आणि थंडीमध्ये आकुंचन पावतात. बलास्ट खडे पटर्‍यांना थोडी हालचाल करू देतात, ज्यामुळे उष्णतेमुळे निर्माण होणाऱ्या ताणांपासून पटर्‍या सुरक्षित राहतात.

गवत किंवा झाडं उगवू नयेत म्हणून

जर ट्रॅकजवळ मोकळी माती असेल, तर तिथे झाडं किंवा गवत उगवू शकतात, जे पटर्‍यांच्या खाली मुळे रोवून त्यांना कमजोर करू शकतात. पण बलास्ट खड्यांमध्ये पोषणद्रव्यं नसल्यामुळे झाडं उगवत नाहीत.

एकूणचं पाहिलं, तर हे खडे रेल्वे ट्रॅकच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत.

Web Title: Have you ever wondered why stones are placed on railway tracks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2025 | 08:04 PM

Topics:  

  • Local train Mumbai

संबंधित बातम्या

Mumbai News: रेल्वेतील एफटी कोट्याचा झाला गैरवापर! ३९ प्रकरणांत ३.५६ लाखांचा दंड; १२१ प्रवाशांवर कारवाईचा बडगा
1

Mumbai News: रेल्वेतील एफटी कोट्याचा झाला गैरवापर! ३९ प्रकरणांत ३.५६ लाखांचा दंड; १२१ प्रवाशांवर कारवाईचा बडगा

Mumbai News: रेल्वे स्थानकांवर थुंकणाऱ्यांचा सुळसुळाट! पश्चिम रेल्वेची एप्रिलमध्ये २,६५७ प्रवाशांवर कारवाई
2

Mumbai News: रेल्वे स्थानकांवर थुंकणाऱ्यांचा सुळसुळाट! पश्चिम रेल्वेची एप्रिलमध्ये २,६५७ प्रवाशांवर कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.