Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ना देव, ना मानव, ना दानव… अशक्य! तेव्हा अवतार घेतला ‘त्या’ आदिमायेने! मारला महिषासुर…

महिषासुराचा पराभव नऊ दिवस चाललेल्या लढाईत देवी दुर्गेने केला, ज्यामुळे धरतीवर धर्माची पुनर्स्थापना झाली. रामायणानुसार, रामानेही नवरात्रीच्या उपवास आणि चंडीपूजेमुळे विजय प्राप्त केला, म्हणून दसरा विजयाचा प्रतीक बनला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 02, 2025 | 04:15 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

नवरात्री हा आता जल्लोषाचा उत्सव झाला आहे. तरुण जमतात, गरबा रमतात आणि उत्साह रंगतो. पण तुम्हाला माहिती आहे का? नवरात्री हा सण, वीरतेचे प्रतीक आहे. पुराणांनुसार, या दिवसांत असा राक्षस मारला गेला, ज्याला फार मोठा वर प्राप्त होता. त्याचा वध ना देव करू शकत होते, ना मानव आणि ना कुणी राक्षस कुळातील असुर! त्याला हरवणे फार कठीण होते.

Sudha Murty यांनी सांगितले नातं राहील ‘असे’ हेल्दी, नातं जपण्याचं खास ‘Secret’

या राक्षसाचे नाव ‘महिषासुर’ आहे. देवी दुर्गेने अवतार घेऊन त्याचा वध केला. त्याला मारला. पण हा संघर्ष लहान नव्हता. तब्बल नऊ रात्रीचा हा संघर्ष होता. तेव्हा जाऊन दहाव्या दिवशी म्हणजेच आज जेव्हा आपण दसरा साजरा करतो, तेव्हा महिषासुर मरण पावला. महिषासुराला त्याच्या वरदानाचा आणि शक्तीचा इतका अहंकार होता की त्याने सरळ स्वर्गावर आक्रमण केले होते. त्याच्या शक्तीसमोर कुणाचाही टिकाव झाला नाही. प्रत्येक देव युद्ध पुकारून हार मानत होते. तेव्हा विष्णू, शिव, ब्रह्मा व इतर देवांनी आपली शक्ती दिली आणि त्या सर्व शक्तींपासून देवी दुर्गेचं तेजस्वी रूप प्रकट झालं.

या आदिशक्तीच्या नऊ दिवसांचा संघर्ष करत, या महिषासुराला धारातीर्थी केले. त्याचा वध झाला. त्यामुळे आई दुर्गेला महिषासुरमर्दिनी असेही संबोधले जाते. अशा प्रकारे आदिशक्ती , आई दुर्गेने महिषासुराचा पराभव केला आणि धरतीवर पुन्हा धर्माची स्थापना केली. या संघर्षात नऊ दिवस आणि रात्री देवीने युद्ध केले, प्रत्येक दिवशी महिषासुराच्या विविध रूपांशी सामना करीत तिने त्याची शक्ती कमी केली. या युद्धादरम्यान देवीने आपले विविध अस्त्र आणि शस्त्र वापरले, जे देवतांनी तिला दिले होते, ज्यामुळे ती अत्यंत समर्थ बनली.

असुर, दैत्य आणि दानवांमध्ये फरक काय? राक्षस कोण? बहुतांशी त्यांचा संबंध काय? जाणून घ्या

रामायणातही नवरात्रीचा उल्लेख आहे. असे म्हंटले जाते की रामाने युद्धाआधी दसऱ्याच्या दिवशी चंडीपूजा केली होती आणि नवरात्रीचा उपवासही धरला होता. तेव्हा त्याला विजय प्राप्त झाले. म्हणून या दिवसाला “विजयादशमी” असे म्हणतात.

Web Title: The battle between goddess durga and mahishasur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2025 | 04:15 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.