Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जाताना मोठी पण येताना छोटी; रस्त्याचा प्रवास असा का भासतो? कारण जाणून घ्या!

‘रिटर्न ट्रिप इफेक्ट’ (Return Trip Effect) ची दोन प्रमुख कारणे कोणती आहेत? पहिले कारण म्हणजे नवीन माहितीची प्रक्रिया

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 27, 2025 | 04:15 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

असं अनेकदा घडतं, प्रवासाला निघाल्यावर रस्ता कधी संपतोय असं वाटतच नाही, पण परत येताना तोच रस्ता अगदी पटकन संपतो! हा रस्त्याचा खेळ नाही, तर आपल्या मेंदूचा कमाल आहे. या घटनेला शास्त्रीय भाषेत ‘रिटर्न ट्रिप इफेक्ट’ म्हटलं जातं. जेव्हा आपण एखाद्या नवीन ठिकाणी प्रथमच जातो, तेव्हा मेंदू त्या वाटेवरील प्रत्येक गोष्ट बारकाईने लक्षात ठेवतो. वळणं, दृश्यं, फलक, ट्रॅफिक सिग्नल. ही सगळी नवी माहिती प्रोसेस करताना मेंदूला अधिक मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे आपल्याला वेळ जास्त लागत असल्यासारखा वाटतो आणि प्रवास लांब भासतो.

डॉक्टरांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष दिले जाणार का? फलटण येथील डॉक्टराच्या आत्महत्येनंतर ‘थ्री एम’ उपक्रम पुन्हा चर्चेत

याउलट, परतीच्या प्रवासात तोच रस्ता आता परिचित असतो. पुढे काय येणार हे आधीच माहीत असल्याने मेंदूला कमी काम करावं लागतं. शिवाय, घरी परतण्याचा आनंद आणि विश्रांतीची भावना मनात असल्याने प्रवास अधिक सहज, हलका आणि छोटा वाटतो. प्रवास लांब वाटण्याचं आणखी एक कारण म्हणजे अपेक्षा तुटणे. आपण प्रवास सुरू करताना “लवकर पोहोचू” अशी अवचेतन आशा बाळगतो. पण ट्रॅफिक, वळणे किंवा विलंब झाल्यास ही अपेक्षा तुटते आणि निराशा निर्माण होते. त्यामुळे प्रवास आणखी लांब वाटतो.

तर परतीच्या वेळी आपण बहुतेक वेळा प्रवासाच्या आठवणींमध्ये रमलेले असतो. कुठे गेलो, काय पाहिलं, काय खाल्लं. या आठवणींमध्ये मन गुंतल्याने मेंदूला वेळेची जाणीव कमी होते आणि प्रवास पटकन संपल्यासारखा वाटतो.

Horror Story: वरच्या माळ्यावर आत्महत्या, इथे आलात तर…’ते’ जीवघेणे गर्ल्स हॉस्टेल!

याशिवाय, जाताना आपण नवी ठिकाणं पाहण्यासाठी, फोटो काढण्यासाठी किंवा खाण्यासाठी वारंवार ब्रेक घेतो. या छोट्या थांब्यांमुळे प्रवास तुकड्यांत विभागला जातो आणि त्यामुळे तो अधिक लांब भासतो. पण परतताना, आपला एकच उद्देश असतो “लवकर घरी पोहोचायचं.” त्यामुळे ब्रेक कमी घेतले जातात आणि प्रवास अखंड वाटेत पार पडतो, ज्यामुळे तो जलद आणि लहान वाटतो. थोडक्यात सांगायचं झालं, तर जाताना उत्सुकतेचा आणि नव्या अनुभवांचा ओघ मेंदूला धीमं करतो, तर परतताना ओळखीच्या वाटा आणि घराचं आकर्षण प्रवासाला वेग देतं.

Web Title: Why does a road trip feel like its long on the way out but short on the way in

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2025 | 04:15 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.