Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

टाकीत तर आले पण.. नळात कधी येणार…? कोशीमशेत ग्रामस्थांचा तृषार्त सवाल

मोखाडा तालुक्यात टाक्यांपर्यंत पाणी पोहोचूनही नळजोडणीचे काम सुरू न झाल्याने १२ गावपाड्यांतील महिलांची पाण्यासाठीची पायपीट कायम आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 20, 2025 | 08:22 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

दीपक गायकवाड, मोखाडा: मोखाडा तालुक्यातील धामणशेत कोशीमशेत ग्रुप ग्रामपंचायत मधील १२गावपाड्याना नळजोडणीचे काम झाले नसल्याने जलजीवन मिशनचे पाणी घरापर्यत पोहचले नाही टाकी पर्यत पाणी पोहचले मात्र नळाद्वारे घरापर्यत कधी पोहचणार? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात असून हंडाभर पाण्यासाठी महिलांची कोसोदूर पायपीट सुरुच असल्याने संताप व्यक्त केला जातो आहे.

नवी मुंबईत मासेमारी संकटात! गारठा वाढल्याने मासळीचे दर कडाडले; सुरमई, पापलेट ₹ १,००० पार

जलजीवन मिशन अंतर्गत सोनारवाडी, सडकवाडी, धामणशेत, येथे पाण्याच्या टाक्या बांधल्या आहेत त्यांचे कामही पूर्ण झाले असून टाकी पर्यत पाणी देखील पोहचलेले आहे मात्र टाकीपासून घरापर्यत नळाद्वारे पाणी पोहचवण्याचे काम जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभाग करते आहे
जलकुंभाचे काम पूर्ण होऊन अनेक महिन्याचा कालावधी उलटूनही पाणी पुरवठा विभागाने नळजोडणीच्या कामाला सुरवात केलेली नाही यामुळे कामाला सुरवात होणार कधी ? घरापर्यत पाणी पोचणार कधी ? आणि महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरणार कधी ? हा प्रश्नच असून निधी नसल्याचे भिजत घोंगडे न ठेवता लवकरात लवकर कामाला सुरवात करून महिलांच्या डोक्यारील हंडा उतरवून काम मार्गी लावण्यात यावे अशी मागणी उपसरपंच वैशाली साळवे यांनी केली आहे

सदरचे काम हे सिद्धिविनायक इन्टरप्रायजेस या एजन्सी द्वारे केले जाणार आहे कोशीमशेत, सोनारवाडी , सडकवाडी बेडूकपाडा, फणसपाडा, पायरवाडी, गावठा या गावपाड्यांसाठी १कोटी १७लाख निधी खर्च केला जाणार आहे तर धामणशेत, ठाकूरवाडी ,पाटीलपाडा, बेहटवाडी, पेंडक्याचीवाडी ,या गावपाड्यांसाठी १कोटी ४९लाख खर्च होणार आहे परंतु या कामाला ठेकेदाराने सुरवातच केली नसल्याने ग्रामस्थांकडून रोष व्यक्त होतो.

Nashik Kumbh Mela : नाशिक विमानतळाचा विस्तार! नवीन टर्मिनल इमारतीसाठी ५५६ कोटींचा खर्च

निधी नसल्याने काम सुरु करण्यास विलंब झाला असून लवकरच काम सुरु करून मार्गी लावू, ललित बोर्डे (पाणी पुरवठा अधिकारी मोखाडा) यांचे म्हणणे आहे. तालुक्यातील अनेक गावपाड्यात पाणी पुरवठा विभागाने नळयोजनेची कामे पूर्ण केली असताना आमच्याच ग्रामपंचायत मध्ये विलंब का ? यामुळे तात्काळ काम सुरु करा अन्यथा ठेकेदारावर कार्यवाही करा, सुरेश धिंडे (सरपंच) यांचे म्हणणे आहे.

Web Title: A thirsty question from the villagers of koshimshet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2025 | 08:22 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.