Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Balipratipada: बदलापूर गावातील अनोखी प्रथा! बैलांना आगीवरून उडी मारण्यास लावले जाते

ठाणे जिल्ह्यातील बदलापूरसह आसपासच्या ग्रामीण भागात बलिप्रतिपदेच्या दिवशी गुरांना आगीवरून उडवण्याची पारंपरिक प्रथा आजही उत्साहात चालू आहे. सकाळी लवकर शेतकरी गुरांना स्वच्छ आंघोळ करून सजवतात.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 23, 2025 | 07:31 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

ठाणे जिल्ह्यातील बदलापूरसह आसपासच्या ग्रामीण भागात बलिप्रतिपदेच्या दिवशी गुरांना आगीवरून उडवण्याची पारंपरिक प्रथा आजही उत्साहात चालू आहे. सकाळी लवकर शेतकरी गुरांना स्वच्छ आंघोळ करून सजवतात. त्यांचे शिंग रंगवले जातात, तेल लावले जाते, फुगे बांधले जातात. अंगावर गेरू व पांढऱ्या रंगाचे ठसे उमटवले जातात. गळ्यात घुंगरू व हार घालून गुलाल उधळला जातो. या पारंपरिक विधीत शेतकरी प्रार्थना करतात “ईडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो”.

IAS आणि IPS अधिकारी किती कमावतात? पगारापासून विशेष सुविधांपर्यंत, सरकार काय-काय देते जाणून घ्या

हा उत्सव केवळ धार्मिक नाही तर शेतकऱ्यांच्या कृतज्ञतेचे प्रतीक देखील आहे. पावसाळ्यानंतर भातशेती संपल्यावर गुरांना काम नसल्यामुळे ते सुस्तावलेले असतात. बलीप्रतीपदेच्या दिवशी गुरांना आगीवरून उडवल्याने त्यांच्या पायांवरील रोग, अंगावर चिकटलेला पिसवा, गोचिड व इतर जीवजंतू नष्ट होतात, असे स्थानिक शेतकरी मानतात. तसेच असेही मानले जाते की, गुरांना भविष्यात कुठे वणवा पेटल्यास ते सैरभैर होणार नाहीत.

मात्र, मागील काही वर्षांत प्राणी मित्रांनी या प्रथेवर टीका केली आहे. त्यांचा असा दावा आहे की गुरांना आगीपासून इजा होऊ शकते. त्यावर स्थानिक शेतकरी सांगतात की, ही आगी सौम्य असते आणि गुरांसाठी धोका निर्माण करत नाही.

Ratnagiri News : वाशिष्ठी नदीपात्रात मृत माशांचा खच; औद्योगिक क्षेत्रातील जलवाहिनी फुटल्याने प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

यावर्षी बुधवारी (दि. 22) नवीन वडवली गावात हा उत्सव पारंपरिक पद्धतीने मोठ्या भक्तिभावाने आणि आनंदात साजरा झाला. गावकरी गुरांच्या पूजनासह त्यांना आगीवरून उडवताना उपस्थित होते. उत्सवात गुरांना सजवण्याची प्रक्रिया, आगीवरून उडवणे, प्रार्थना व गुढीपाडव्याप्रमाणे उत्साह दिसून आला. शेतकरी आणि स्थानिक लोकांसाठी हा दिवस केवळ धार्मिक विधी नव्हे तर सांस्कृतिक वारसा आणि गुरांप्रती कृतज्ञतेचा दिवस मानला जातो. अशा पारंपरिक उत्सवांमुळे स्थानिक समाजात एकत्रित आनंद, भक्तिभाव आणि संस्कृती जपण्याची भावना कायम राहते.

Web Title: A unique custom in badlapur village in balipratipada

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2025 | 07:31 PM

Topics:  

  • Diwali 2025

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.