Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

निसर्गोपचार हा निसर्ग-मानव समतोल साधणारा मार्ग! राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे प्रतिपादन 

'निसर्गोपचार ही केवळ उपचारपद्धती नसून निसर्ग आणि माणूस यांच्या समतोलातून घडणारी जीवनशैली असल्याचे मत महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी नैसर्गिक खाद्य महोत्सवाचा समारोपात व्यक्त केले.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Nov 19, 2025 | 08:07 PM
Naturopathy is the way to achieve balance between nature and man! Governor Acharya Devvrat asserts

Naturopathy is the way to achieve balance between nature and man! Governor Acharya Devvrat asserts

Follow Us
Close
Follow Us:
  • निसर्गोपचार उपचारपद्धती निसर्ग आणि माणूस यांच्या समतोलातून घडणारी जीवनशैली
  • राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेच्या तीन दिवसीय नैसर्गिक खाद्य महोत्सवाचा समारोप
  • नैसर्गिक खाद्य महोत्सवाचा समारोपात राज्यपाल आचार्य देवव्रत यांची उपस्थिती 
पुणे : ‘निसर्गोपचार ही केवळ उपचारपद्धती नसून निसर्ग आणि माणूस यांच्या समतोलातून घडणारी जीवनशैली आहे. महात्मा गांधी यांनी दिलेला आत्मनिर्भरतेचा व नैसर्गिक जीवनाचा विचार निरोगी समाजनिर्मितीसाठी आजही मार्गदर्शक आहे,’ असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा : इतिहासाचे पाने चाळताना! वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या मृत्युलेखाने Ashes series ची सुरुवात; वाचा रोचक गोष्ट

राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेने (एनआयएन) आयोजित केलेल्या तीन दिवसीय नैसर्गिक खाद्य महोत्सवाचा समारोप येवलेवाडी येथील निसर्ग ग्राम येथे झाला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय आयुषमंत्री (स्वतंत्र प्रभार) तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव उपस्थित होते. प्रसंगी केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या सहसचिव डॉ. कविता जैन, पुणे विभागाच्या पोस्टमास्तर जनरल सुचिता जोशी, एनआयएनचे प्रभारी संचालक अमरेंद्र सिंह आणि आंतरराष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेचे अध्यक्ष अनंत बिरादार उपस्थित होते.

या वेळी संस्थेच्या वतीने प्रकाशित पुस्तकाचे तसेच एनआयएनवरील विशेष टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले. गांधी जयंतीनिमित्त आयोजित विविध स्पर्धांमधील विजेते जाहीर करण्यात आले. दादाजी डॉ. दिनशा के. मेहता पुरस्कार व डॉ. एस. एन. मूर्ती पुरस्कार प्रदान करण्यात आले.

राज्यपाल देवव्रत म्हणाले, ‘संतुलित आहार, योग्य व्यायाम, सकारात्मक चिंतन आणि निसर्गाशी एकरूप होणारी जीवनशैली अंगीकारली तर रोगांविरुद्ध लढण्याची शक्ती शरीरातच निर्माण होते. वाढत्या जीवनशैलीजन्य आजारांना रोखण्यासाठी निसर्गोपचार हा सोपा आणि प्रभावी मार्ग आहे.’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लठ्ठपणा कमी करण्याच्या अभियानातही निसर्गोपचार महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे त्यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितले की, ‘आरोग्य विकत घेता येत नाही, ते कमवावे लागते. निसर्गाशी प्रामाणिक राहिल्यास पृथ्वी आणि मानवाचे आरोग्य टिकून राहते. योग, निसर्गोपचार आणि रसायनमुक्त आहार हे आजच्या तणावपूर्ण जीवनात अधिक आवश्यक झाले आहेत.’

हेही वाचा : 19 वर्षांखालील विश्वचषक 2026 चे वेळापत्रक जाहीर! भारत असणार ‘अ’ गटात; 6 फेब्रुवारीला रंगणार अंतिम सामना

कार्यक्रमाचे स्वागत-अभिभाषण अमरेंद्र सिंह यांनी केले. प्रास्ताविक सुचिता जोशी आणि डॉ. कविता जैन यांनी मांडले. आभार प्राध्यापक डॉ. डी. सत्यनाथ यांनी मानले. ‘निसर्गोपचाराच्या माध्यमातून नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करणे’ या संकल्पनेवर आधारित महोत्सवाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती प्रकाशन अधिकारी सौरभ साकल्ले यांनी दिली.

Web Title: According to governor acharya devvrat naturopathy is the way to achieve balance between nature and man

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 08:07 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.