Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ambernath MIDC : “महाराष्ट्रातील उद्योग दुसऱ्या राज्यात का जातात?”, उद्योजकांच्या संघटनेचा मोठा गौप्यस्फोट

हे जर असंच सुरु राहिलं तर महाराष्ट्रातील उद्योग दुसऱ्या जाण्यास वेळ लागणार नाही असा मोठा गौैप्यस्फोट व्यापार संघटनेच्या सदस्यांनी केला आहे. नेमंक प्रकरण काय, सविस्तर जाणून घ्या...

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Aug 11, 2025 | 01:42 PM
Ambernath MIDC : “महाराष्ट्रातील उद्योग दुसऱ्या राज्यात का जातात?”, उद्योजकांच्या संघटनेचा मोठा गौप्यस्फोट
Follow Us
Close
Follow Us:

एकीकडे हिंदी मराठी भाषेचा वाद काही मिटना मिटेना त दुसरीकडे मराठी माणसाचे आणि महाराष्ट्रातले उद्योग परप्रांतीय त्यांच्या राज्यात घेऊन जात असल्याचा गौप्यस्फोट अंबरनाथमधील उद्योग संघटेने केला आहे. मराठी माणसाला व्यापार करायला संधीच मिळत नाही किंवा मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला जात असल्याची ओरड कायम होत असते. मराठी हिंदीचा हा वाद फक्त शैक्षणिक अभ्यासक्रमातील भाषेचाच नव्हे तर उद्योग जगतातही होत असल्याचा वादाला आता पुन्हा नव्याने तोंड फुटलं आहे.

अंबरनाथ येथे उद्योग संघटनेची पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत एमआयडीसीमध्ये दलालांचा सुळसुळाट होत असल्याचा आमा संघटनेने आरोप केला आहे. या आरोपांनंतर आता राज्यभरातील व्यापार क्षेत्रात खळबळ माजली आहे.

नेमकं प्रकरण काय ?

अंबरनाथ एमआयडीसीमध्ये मोठ्या प्रमाणात दलालांचा सुळसुळाट झाला आहे, असा गौप्यस्फोट अतिरिक्त अंबरनाथ मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे उमेश तायडे यांनी केला आहे. जमिनीचे प्लॉट 4ते 5 पट दराने विकले जात असून उद्योजकांना स्थानिकांकडून देखील मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. असा धक्कादायक आरोप अतिरिक्त अंबरनाथ मॅन्युफॅक्चर असोसिएशनच्या पदाधिकऱ्यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर एमआयडीसी प्रशासन जमीन अधिग्रहण करण्यापूर्वीच थेट उद्योजकांना त्या जमीनींची विक्री करते. त्यामुळे ज्यावेळेस उद्योजक कंपनी उभारण्यासाठी येतात त्यावेळी मात्र जमीन मालक आणि उद्योजकांमध्ये मोठा वाद निर्माण होतो. परिणामी कंपनी उभारण्यात तीन ते चार वर्षे उलटतात.

या सर्व प्रकाराला एमआयडीसी प्रशासन जबाबदार असल्याचा धक्कादायक आरोप आमा संघटनेचे अध्यक्ष उमेश तायडे यांनी केलाय. हे जर असंच सुरू राहिलं तर अंबरनाथ एमआयडीसीतील जवळपास 1400 कंपन्या परराज्यात स्थलांतरित होण्यास वेळ लागणार नाही. अशी संतप्त प्रतिक्रिया उमेश तायडे यांनी व्यक्त केली.यावेळी पत्रकार परिषदेत आमा संघटनेचे अध्यक्ष उमेश तायडे, सचिव परेश शहा, खजिनदार लिकार सिंग, जनसंपर्क अधिकारी विजय नायर, सदस्य, राजेश मिर्घ, संदीप तोंडपूरकर, मंगेश सावंत उपस्थित होते.

स्थानिकांच्या जमिनी आणि अद्योजकांच्या कंपन्या यांच्यात योग्यरित्या व्यवहार होत नसल्याने अनेक उद्योजक भूखंड खरेदीतील दलालांच्या कटकारस्थानाला बळी पडले. .याचा झालेला परिणाम म्हणजे उद्योजकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुसकान सहनं करावं लागल्याने अनेक चांगल्या गुंतवणूकीसाठी आलेल्या कंपन्या या परराज्यात जात आहेत. या सगळ्या दलालांचं कटकारस्थान असंच सुरु राहिलं तर महाराष्ट्रातून चांगला उद्योगाला स्त्रोत निघून जाईल अशी खंत देखील या पत्रकार परिषदेत आमा संघटनेने केली आहे.

Web Title: Ambernath midc why do industries in maharashtra move to other states big revelation from the industrialists association

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2025 | 01:42 PM

Topics:  

  • Ambernath
  • Business
  • MIDC

संबंधित बातम्या

Dombivali MIDC : नाल्यात सोडलेल्या गुलाबी पाण्याचं प्रकरण काय ? व्हायरल व्हिडिओचं सत्य उघड
1

Dombivali MIDC : नाल्यात सोडलेल्या गुलाबी पाण्याचं प्रकरण काय ? व्हायरल व्हिडिओचं सत्य उघड

आघाडीचा फॅशन ब्रॅंड Libas चे मुंबईत नवे स्टोअर सुरु, वर्षाअखेरपर्यंत 50 पेक्षा जास्त शाखा उघडण्याचे लक्ष
2

आघाडीचा फॅशन ब्रॅंड Libas चे मुंबईत नवे स्टोअर सुरु, वर्षाअखेरपर्यंत 50 पेक्षा जास्त शाखा उघडण्याचे लक्ष

Dombivali : 2 महिन्यांपासून पाणीटंचाई, डोंबिवलीकरांचा MIDC ला जाब
3

Dombivali : 2 महिन्यांपासून पाणीटंचाई, डोंबिवलीकरांचा MIDC ला जाब

Navi Mumbai : MIDC परिसरात रस्त्यावर कोळसळा विजेचा खांब; नागरिकांच्या जीवाला धोका, पालिकेचा हलगर्जीपणा
4

Navi Mumbai : MIDC परिसरात रस्त्यावर कोळसळा विजेचा खांब; नागरिकांच्या जीवाला धोका, पालिकेचा हलगर्जीपणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.