Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crops Insurance Scheme: दुष्काळात तेरावा महिना! पीकविम्यातील नियम बदलल्याने अतिवृष्टीच्या नुकसानीचे पैसे मिळणार नाहीत

जुन्या योजनेत शेतकऱ्यांना पाच घटकांवर नुकसानभरपाई मिळत असे. यामध्ये उगवण न होणे, स्थानिक आपत्ती, मिड अॅडव्हर्सिटी, पोस्ट हार्व्हेस्टिंग आणि उत्पादन आधारित नुकसान यांचा समावेश होता. या योजनेत पूर्वी नुकसानभरपाईची मर्यादा

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 24, 2025 | 04:20 PM
पीकविमा योजनेतील नियमात बदल

पीकविमा योजनेतील नियमात बदल

Follow Us
Close
Follow Us:
  • अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका
  • पीकविमा योजनेतील नियमात बदल, नुकसानीचा फटका
  • शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी आता  NDRF अंतर्गत मदत मिळणार

मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अतिवृष्टी, पूरसदृश परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांची गुरे-जनावरे वाहून गेली आहेत. घर-दार गमावलेल्या शेतकऱ्यांनी सर्वस्व गमावले आहे. अनेक शेतकऱ्यांची आयुष्यभराची कमाई या अतिवृष्टीमुळे वाहून गेली आहे. अशातच शेतकऱ्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Railway Employees Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस; सरकारची मोठी घोषणा

छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी सांगितले की, पीक विम्याच्या (Crops Insurance Scheme) नव्या नियमानुसार या अतिवृष्टीतून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विमा रकमेचा लाभ मिळणार नाही. या नव्या नियमांनुसार पीक विम्याचे पैसे फक्त कापणीअंतीच मिळू शकतात. दुर्दैवाने, त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी आता राष्ट्रीय आपत्ती निधी (NDRF) अंतर्गत मदत मिळणार आहे.

नुकसानीच्या पंचनाम्यांबाबत माहिती देताना पापळकर यांनी सांगितले की, जुलै आणि ऑगस्ट महिन्यांपर्यंतचे पंचनामे पूर्ण झाले असून त्याचे अंतिम अहवाल सरकारकडे सादर केले गेले आहेत. याप्रमाणे नुकसानभरपाईसाठी आतापर्यंत 697 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. तर उर्वरित 721 कोटी रुपये येत्या एक-दोन दिवसांत मिळणार आहेत. ऑगस्ट महिन्याचे पंचनामे पाऊस ओसरल्यावर पुढील आठ दिवसांत पूर्ण केले जातील. जुलै महिन्याचा निधी मिळालेला असून, ऑगस्टचा काही निधी अद्याप बाकी आहे, असेही पापळकर यांनी स्पष्ट केले.

‘माझ्या रूमवर ये, मी तुला परदेशात घेऊन जाईन, तुला एक पैसाही खर्च येणार नाही…’ स्वामी चैतन्यनंद यांचे व्हॉट्सअ‍ॅप 

जुन्या योजनेत शेतकऱ्यांना पाच घटकांवर नुकसानभरपाई मिळत असे. यामध्ये उगवण न होणे, स्थानिक आपत्ती, मिड अॅडव्हर्सिटी, पोस्ट हार्व्हेस्टिंग आणि उत्पादन आधारित नुकसान यांचा समावेश होता. या योजनेत पूर्वी नुकसानभरपाईची मर्यादा ३० टक्के होती.

सध्याच्या योजनेत केवळ उत्पादनावर आधारित नुकसानभरपाई दिली जाईल आणि मर्यादा ५० टक्के ठेवण्यात आली आहे (तंत्रज्ञान व पीक कापणी विचारात घेतली जाईल). त्यामुळे, पूर्वीच्या योजनेत आजच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानभरपाई मिळाली असती, पण जुना नियम रद्द झाल्यामुळे आता ती मिळणार नाही.

त्याचवेळी जितेंद्र पापळकर यांनी शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम तातडीने मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांनी आपली नोंदणी प्रमाणे ई-केवायसी पूर्ण करावी, जेणेकरून नुकसानभरपाई थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होईल. सरकारकडून आलेली नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी तालुका पातळीवर टीम कार्यरत आहे. ई-केवायसी केलेल्या शेतकऱ्यांना पैसे थेट बँक खात्यात मिळतील, असे पापळकर यांनी स्पष्ट केले.

 

Web Title: Changes in crop insurance rules will mean that there will be no money for heavy rain losses in marathwada and western maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2025 | 04:20 PM

Topics:  

  • Heavy Rainfall

संबंधित बातम्या

Wet Drought Farmers: हातातोंडाशी आलेला घास हिरावला! राज्यात ओला दुष्काळ जाहीर होणार?
1

Wet Drought Farmers: हातातोंडाशी आलेला घास हिरावला! राज्यात ओला दुष्काळ जाहीर होणार?

राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसामुळे नुकसान; सोलापुरात पालकमंत्री गोरेंनी दिले महत्त्वपूर्ण निर्देश
2

राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसामुळे नुकसान; सोलापुरात पालकमंत्री गोरेंनी दिले महत्त्वपूर्ण निर्देश

राज्यातील अनेक भागांत परतीच्या पावसाचा मोठा फटका; छत्रपती संभाजीनगरसह विभागात 10 मंडळात अतिवृष्टी
3

राज्यातील अनेक भागांत परतीच्या पावसाचा मोठा फटका; छत्रपती संभाजीनगरसह विभागात 10 मंडळात अतिवृष्टी

India Heavy Rain Alert: आज सूर्य दिसणारच नाही! ‘या’ राज्यांमध्ये पाऊस घालणार धुमाकूळ; IMD चा अलर्ट काय?
4

India Heavy Rain Alert: आज सूर्य दिसणारच नाही! ‘या’ राज्यांमध्ये पाऊस घालणार धुमाकूळ; IMD चा अलर्ट काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.