Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

B Pharmacy Paper Leak: बी. फार्मसीचा पेपर फुटला? विद्यापीठाचा भोंगळ कारभारामुळे संध्याकाळी ७ पर्यंत परीक्षा

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेदरम्यान बी. फार्मसी तृतीय व अंतिम वर्षाच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचा संशय व्यक्त झाला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 21, 2025 | 06:34 PM
Due to B Pharmacy paper leak in Nanded, students have to wait till 7 pm for the exam

Due to B Pharmacy paper leak in Nanded, students have to wait till 7 pm for the exam

Follow Us
Close
Follow Us:

B Pharmacy Paper Leak : नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेदरम्यान बी. फार्मसी तृतीय व अंतिम वर्षाच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचा संशय व्यक्त झाल्यानंतर विद्यापीठाने दुपारच्या सत्रातील चालू परीक्षा तातडीने थांबवून नवीन प्रश्नपत्रिका देण्याचा निर्णय घेतला. परिणामी विद्यार्थ्यांची परीक्षा संध्याकाळी साडेसहा ते सात वाजेपर्यंत सुरू राहिली. लोहा येथील श्री संत गाडगे महाराज महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर दुपारी दोन ते पाच या वेळेत परीक्षा सुरू असताना विद्यापीठाकडून अचानक पावणेचारच्या सुमारास नवीन प्रश्नपत्रिका ई-मेलद्वारे पाठविण्यात आल्या. त्यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी सुमारे ७५ टक्के उत्तरे लिहून पूर्ण केली होती.

अचानक पेपर बदलल्याने विद्यार्थ्यांना अपुऱ्या प्रकाशात आणि मानसिक तणावाखाली साडेपाच तास परीक्षा द्यावी लागली. यामुळे काही विद्यार्थिनींची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली आहे. पालकांमध्येही चिंता निर्माण झाली, कारण पाच वाजता परीक्षा संपावी अशी अपेक्षा असतानाही मुली घरी न परतल्याने पालकांनी फोन लावले.

विद्यापीठाचा निर्णय ‘पेपर फुटल्याची शंका’
विद्यार्थ्यांकडून पेपर फुटल्याचे काही पुरावे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे पाठविण्यात आल्यानंतर परीक्षा विभागाने त्वरित निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

परीक्षा व मूल्यमापन विभाग प्रमुख डॉ. हुशारसिंग साबळे यांनी ‘नवराष्ट्र’शी केलेली बातचित

प्रश्न: दोन प्रश्नपत्रिका देण्यात आल्या का?

उत्तर : परीक्षा सुरू होऊन दहा मिनिटांतच पहिली प्रश्नपत्रिका परत घेऊन नवीन प्रश्नपत्रिका दिल्या.

प्रश्नः लोह्यात मात्र पावणेचारला ई-मेल आला असे सांगितले जाते?
उत्तर : पेपर फुटल्याचा संशय येताच आम्ही तत्काळ निर्णय घेतला. परंतु नवीन प्रश्नपत्रिकांच्या कॉपीज काढून सीलबंद करण्यास अर्धा तास लागतो. त्यामुळे काही केंद्रांवर उशीर झाला.

प्रश्न: पेपर खरोखर फुटला का?
उत्तर : हो, शंका नव्हे तर पेपर फुटल्याची खात्री पटल्यामुळेच आम्ही नवीन प्रश्नपत्रिका दिल्या.”

प्रश्न : परीक्षा पुढे ढकलता आली असती का?
उत्तर : पेपर फुटताना आम्ही परीक्षा कशी चालू देणार? दिवस वाया जाऊ नये म्हणून त्याच दिवशी नवीन पेपर घेणे आवश्यक होते.”

प्रश्नः विद्यार्थ्यांनी ७५% लिहिले होते, है काय?
उत्तर : हे चुकीचे आहे. आम्ही दहा मिनिटांतच प्रश्नपत्रिका परत घेतल्या. एखाद्या महाविद्यालयात १०-१५ मिनिटांचा फरक झाला असेल.”

साबळे यांच्या संवादावरुन पेपर फुटल्याचा संशय मात्र बळावला आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पेपरमध्ये गोंधळ वाढवणारेच प्रश्न
नेमका पेपर कोठून व कसा फुटला? विद्यापीठाच्या अत्यंत गोपनीय प्रश्नपत्रिका प्रक्रियेत अशी त्रुटी कशी घडली? परीक्षा केंद्रांमध्ये वेळेतील एवढा मोठा फरक का पडला? विद्यापीठाचा परीक्षा विभाग सध्या प्रभारी नियंत्रक चालवत असल्याने शिस्त व समन्वयाचा अभाव असल्याच्या चर्चा विद्यार्थ्यांत व शिक्षकांमध्ये होत आहेत.

Web Title: Due to b pharmacy paper leak in nanded students have to wait till 7 pm for the exam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2025 | 06:34 PM

Topics:  

  • nanded news

संबंधित बातम्या

निसर्गाचा लहरीपणा, नापिकी, कर्जबाजारीने शेतकरी मेटाकुटीला; नांदेड जिल्ह्यात १४५ बळीराजांनी संपवले जीवन
1

निसर्गाचा लहरीपणा, नापिकी, कर्जबाजारीने शेतकरी मेटाकुटीला; नांदेड जिल्ह्यात १४५ बळीराजांनी संपवले जीवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.