Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कराडमधून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची विरोधकांवर टीका; म्हणाले, “कॉँग्रेसने केवळ सर्वांना हात…”

, २०१९ मध्ये महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेने हिंदुत्व आणि विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली, यश मिळवले. परंतु, त्यानंतर उद्धव ठाकरेंचे पुत्रप्रेम आडवे आले, असे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 14, 2024 | 07:29 PM
कराडमधून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची विरोधकांवर टीका; म्हणाले, “कॉँग्रेसने केवळ सर्वांना हात…”
Follow Us
Close
Follow Us:

कराड: राज्यात विधानसभा निवडणूक अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे.दरम्यान महायुतीच्या उमेदवारासाठी आलेल्या गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या बॅगेची देखील तपासणी करण्यात आली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान आज कराड-दक्षिणचे महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्यासाठी प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीसह कॉँग्रेसवर टीका केली आहे.

देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे झाली. या ६० वर्षांच्या काळात काँग्रेसने केवळ स्वतःसाठीच राज्य केले, देशाचा काय विकास केला? असा सवाल उपस्थित करत अटल बिहारी वाजपेयी आणि त्यानंतर २०१४ ते २०२४ यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात देशाच्या खऱ्या अर्थाने विकास झाला. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपची तुलना केल्यास विकास म्हणजे काय, हे कळेल, अशी टीका गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले. कराड येथे महायुतीतर्फे भाजपचे कराड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ कराड दक्षिणमधील डॉक्टरांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, कराडच्या माजी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, डॉ. सारिका गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. सावंत म्हणाले, काँग्रेसने गरीबी हटवण्यासाठी कोणता कार्यक्रम राबवला. त्यांच्या काळात ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या १०० रुपयांसाठी त्यांना चार वेळा ग्रामपंचायत कार्यालयाच्या पायऱ्या चढाव्या लागत होत्या. मात्र, त्यांच्या हातात केवळ २० रुपयेच पडायचे. उरलेले ८० रुपये काँग्रेसचे दलाल खात होते. मोदींनी जनधन योजना, मोफत धान्य, किसान सन्मान योजना, आयुष्मान भारत, किसान डेबिट कार्ड, सॉईल हेल्थ कार्ड, उज्वल योजना, प्रधानमंत्री आवास योजना, मुद्रा लोन आदींच्या माध्यमातून गरीब कल्याण, महिला सशक्तिकरण आणि युवकांसाठी उद्योग व रोजगार निर्मिती केली.

हेही वाचा:  Maharashtra Election 2024: भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर; सातारा जिंकण्यासाठी पक्षाने खेळला ‘हा’ सेफ गेम, एकदा पहाच

काँग्रेसने आतापर्यंत सर्वांना हात दाखविण्याचेच काम केले. त्यांनी कोणाच्याही हाताला काम दिले नाही. २०१४ पूर्वीपर्यंत काँग्रेसच्या काळात आपल्याला किती आरोग्य सुविधा मिळाल्या, याचाही लोकांनी विचार करावा. डाॅ. सावंत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताची ताकद संपूर्ण जगाला दाखवली. जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम हटवून अखंड भारताचे स्वप्न पूर्ण केले. सर्जिकल स्ट्राइक केला. राम मंदिर उभारणी केली. तब्बल १८० देशात योग पोहोचवला. येत्या तीन वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था जगात दुसऱ्या नंबरवर असेल.

माजी मुख्यमंत्र्यांनी काेणती कामे केली ?
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर निशाणा साधताना डॉ. सावंत म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात कोणती शाश्वत विकासकामे केली, ती सांगावीत. २०१४  ते २०२४ पर्यंत भाजपच्या काळात कोणकोणती विकासकामे झाली, ती मी पुराव्यांनिशी दाखवतो. त्यांना कोणतेही ठोस शाश्वत काम करता आले नाही. त्यांच्या काळातील एकही प्रकल्प पूर्णत्वास केलेला नाही.

हेही वाचा:  “संधी मिळाल्यास येथील झोपडपट्टीवासीयांचे…”; महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांचे जनतेला आश्वासन

उद्धव ठाकरेंचे पुत्रप्रेम आडवे आले
उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचा विकास रोखला, असा आरोप करत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, २०१९ मध्ये महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेने हिंदुत्व आणि विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली, यश मिळवले. परंतु, त्यानंतर उद्धव ठाकरेंचे पुत्रप्रेम आडवे आले. त्यांनी पुत्रासाठी युतीधर्म तोडून महाराष्ट्राचा विश्वासघात केला. मात्र, एकनाथ शिंदे यांनी धाडसी पाऊल उचलत महाराष्ट्राचे विकासाला गती दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Goa cm dr pramod sawant criticizes to mva and congress at karad dr atul bhosale election rally 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2024 | 07:29 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: मोठी बातमी! हायकोर्टाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स; नेमके प्रकरण काय?
1

Devendra Fadnavis: मोठी बातमी! हायकोर्टाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स; नेमके प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.