Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Prakash Ambedkar: भारताने सिंधू नदीचं पाणी बंद केलंच नाही..; प्रकाश आंबेडकरांनी ते पत्रच दाखवलं

पहलगाम हल्ल्यापूर्वी पाकिस्तान लष्कराच्या चीफने केलेलं भाषणात त्याने टू नेशन थेअरी मांडली होती. ज्यावेळी गुप्तचर यंत्रणांनी याबाबत सरकारला माहिती दिली त्यावेळी सरकार मात्र झोपलं होत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 27, 2025 | 06:01 PM
Prakash Ambedkar: भारताने सिंधू नदीचं पाणी बंद केलंच नाही..; प्रकाश आंबेडकरांनी ते पत्रच दाखवलं
Follow Us
Close
Follow Us:

 शिर्डी : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यानंतर, भारताने पाकिस्तानची कोंडी करणारे ५ महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामध्ये पाकिस्तानच्या पाण्याची कोंडी करत सिंधू जल वाटप कराराला (Indus Water Treaty) स्थगिती दिल्याचे घोषित केले. मात्र, २४ एप्रिल रोजी केंद्रीय सचिवांनी पाकिस्तानला लिहिलेल्या पत्राचा संदर्भ देत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. भारताने पाकिस्तानचं पाणी बंद केलेलं नाही आणि सरकार खोटं बोलतंय, दिशाभूल करत असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांना भारत देश सोडण्याचे आदेश दिले असून, अटारी वाघा बॉर्डर १ मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच, सिंधू जल वाटप कराराला स्थगिती दिल्याचे सांगण्यात आले. परंतु, हा करार रद्द केल्याचं खोटा असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यानी केला आहे. पाकिस्तानला पाणी बंद करण्यासंदर्भातील दिलेल्या पत्राचा उल्लेख करत या पत्रात कुठेही पाणी बंद करण्याचा उल्लेख नाही. याचाच अर्थ, इंडस करार भारत सरकारने रद्द केलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Indian Navy Video: ‘कधीही, कुठेही, केव्हाही…’; भारतीय नौदलाचे शक्तीपरिक्षण अन् पाकिस्तानी नौदलाची पळताभुई

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, माझ्या भाषेत नरोबा कुंजोबा आणि कायद्याच्या भाषेत स्टेटस्को अस हे पत्र आहे. जर हे पत्र जनतेसमोर आले तर सरकार कुठल्या प्रकारची कारवाई करत आहे, हे सत्य बाहेर येयईल. पण हा गंभीर मुद्दा असून शासनाने याकडे डोळे झाक करू नये. यामाध्यमातून फक्त देशभरातील पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करून त्यांना बाहेर काढले जात आहे. एवढीच वस्तूस्थिती असल्याचेही आंबेडकर यांनी म्हटले.

सिंधू जल कराराबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले की, कोणताही करार थेट रद्द करणे सोपे नसते., त्यासाठी विशिष्ट प्रक्रिया करावी लागते. पण जर केंद्र सरकारने सिंधू पाणी करार रद्द करण्याचा निर्णय घेतला असेल, तर त्यावर संबंधित अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. पाकिस्तानला माहिती आहे की, भारत पाणी थांबवू शकत नाही. त्यामुळेच, पाकिस्तानचे नेते भारताला चिथावणी देत आहेत. असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील सर्व पाकिस्तानी त्यांच्या मायदेशी पाठणार! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

पहलगाम हल्ल्यापूर्वी पाकिस्तान लष्कराच्या चीफने केलेलं भाषणात त्याने टू नेशन थेअरी मांडली होती. ज्यावेळी गुप्तचर यंत्रणांनी याबाबत सरकारला माहिती दिली त्यावेळी सरकार मात्र झोपलं होत. त्यावेळी सरकारने सैन्याला कोणत्याही सूचना दिल्या नाही. आता इस पार.. या उस पार, असं सांगत आज आपलं सैन्य पूर्णपणे तयार आहे. पण देशातील केंद्र सरकारलाच ती इच्छा दिसत नाही. त्यामुळे, सरकारमध्ये इच्छाशक्ती यावी यासाठी आम्ही 2 मे ला हुतात्मा स्मारकासमोर आपण निदर्शने करणार असल्याचेही आंबेडकर यांनी यावेळी सांगितले.

Web Title: India did not stop the water of the indus river prakash ambedkar showed that letter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2025 | 05:59 PM

Topics:  

  • Indus Water Treaty:
  • Prakash Ambedkar

संबंधित बातम्या

Nepal Crisis : नेपाळमधील अराजकतेच्या मागे अमेरिकेचा हात? राजकीय नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ
1

Nepal Crisis : नेपाळमधील अराजकतेच्या मागे अमेरिकेचा हात? राजकीय नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ

Maratha Reservation : “ओबीसी समाजाचे खरे विरोधक हे आता भाजपा आहेत…; वंचित नेते प्रकाश आंबेडकर स्पष्टच म्हणाले
2

Maratha Reservation : “ओबीसी समाजाचे खरे विरोधक हे आता भाजपा आहेत…; वंचित नेते प्रकाश आंबेडकर स्पष्टच म्हणाले

‘तोंड सांभाळा, अन्यथा परिणाम वेदनादायक असतील; पाकिस्तानच्या भडकाऊ वक्तव्याला भारताचे सडेतोड उत्तर
3

‘तोंड सांभाळा, अन्यथा परिणाम वेदनादायक असतील; पाकिस्तानच्या भडकाऊ वक्तव्याला भारताचे सडेतोड उत्तर

एकीकडे अणुहल्ल्याची धमकी तर दुसरीकडे पाण्याची भीक; पाकिस्तानने पसरले भारतापुढे हात
4

एकीकडे अणुहल्ल्याची धमकी तर दुसरीकडे पाण्याची भीक; पाकिस्तानने पसरले भारतापुढे हात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.