Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सत्तेत आल्यानंतही त्यांनी कधी सुडाचं राजकारण केलं नाही’; अटलबिहारी वाजपेयींसंदर्भातील राज ठाकरेंच्या ट्विटची चर्चा

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती त्यानिमित्त राजकीय पक्षाच्या नेत्यासह सर्वस्तरातील मान्यवरांनी त्यांना अभिवादन केलं. राज ठाकरे यांनीही त्यांच्या संदर्भात ट्वीट केलं आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Dec 25, 2024 | 10:00 PM
'सत्तेत आल्यानंतही त्यांनी कधी सुडाचं राजकारण केलं नाही'; अटलबिहारी वाजपेयींसंदर्भातील राज ठाकरेंच्या ट्विटची चर्चा

'सत्तेत आल्यानंतही त्यांनी कधी सुडाचं राजकारण केलं नाही'; अटलबिहारी वाजपेयींसंदर्भातील राज ठाकरेंच्या ट्विटची चर्चा

Follow Us
Close
Follow Us:

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती त्यानिमित्त राजकीय पक्षाच्या नेत्यासह सर्वस्तरातील मान्यवरांनी त्यांना अभिवादन केलं. त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही त्यांच्या संदर्भात एक ट्वीट केलं असून चांगलंच चर्चेत आहे. सत्तेत आल्यावर कधी सुडाचे राजकारण केले नाही, की दीर्घकाळ विरोधी पक्षांत बसलो म्हणून जबर राजकीय महत्वाकांक्षा जागृत होऊन त्यांनी सत्तेत आल्यावर राजकीय शालीनता सोडली नाही. म्हणूनच काँग्रेसकट इतर सर्व पक्षातील लोकांच्या मनात अटलबिहारी वाजपेयींबद्दल कमालीचा आदर होता आणि आजदेखील आहे, असे ट्वीट राज ठाकरे यांनी केलं आहे.

नक्की काय म्हणाले राज ठाकरे, त्याचं पत्र जसंच्या जसं…

आज अटलजींची १०० वी जयंती. भारतीय जनता पक्षाच्या ज्या ज्येष्ठ नेत्यांबद्दल आदर, कुतूहल होतं आणि ज्या नेत्यांनी देखील माझ्याबद्दलच्या स्नेहात कधीही हात आखडता घेतला नाही, त्यात अटलजी हे अग्रणी. स्व. बाळासाहेबांवरच्या फोटोबायोग्राफ़ीच्या अनावरण सोहळ्याला अटलजींनी यावं यासाठी मी त्यांना विनंती केली आणि त्यांनी देखील तात्काळ मान्यता देत, ते या सोहळ्याला आले.

भारतीय राजकारणात काँग्रेसला पर्याय नाहीच असं वाटत असताना, अनेक घटकपक्षांची मोट बांधून, त्यांचे सर्व रागरंग सांभाळून अटलजींनी सरकार चालवलं आणि ते देखील मागच्या शतकाच्या अखेरीस, जेंव्हा भारतात राजकीय, आर्थिक, सामाजिक घुसळण सुरु होती. अशा कठीण परिस्थितीत सरकार चालवत त्यांनी भारतीयांना एक खात्री दिली की काँग्रेसच्या पलीकडे देखील एक राजकीय व्यवस्था या देशाचा कारभार चालवू शकते. आज भारतीय जनता पक्ष जो सत्तेत दिसतोय त्याचा भक्कम पाया अटलजींनी घातला.

आज अटलजींची १०० वी जयंती. भारतीय जनता पक्षाच्या ज्या ज्येष्ठ नेत्यांबद्दल आदर, कुतूहल होतं आणि ज्या नेत्यांनी देखील माझ्याबद्दलच्या स्नेहात कधीही हात आखडता घेतला नाही, त्यात अटलजी हे अग्रणी.
स्व. बाळासाहेबांवरच्या फोटोबायोग्राफ़ीच्या अनावरण सोहळ्याला अटलजींनी यावं यासाठी मी… pic.twitter.com/4lIVlHznLN

— Raj Thackeray (@RajThackeray) December 25, 2024

साहित्य, संस्कृती, प्राचीन इतिहास अशा विविध विषयांच्या वाचनाने स्फुरलेली अटलजींची वाणी ही जशी मला आकर्षित करते तसंच त्यांच्यातील दुर्दम्य आशावाद देखील मला कायम आकर्षित करत आला आहे. जनसंघ ते भारतीय जनता पक्ष असा प्रवास करत असताना, आणि एकदा तर भारतीय जनता पक्ष २ खासदारांवर येऊन थांबलेला असताना आणि जनता पक्षाच्या सरकारमधला सहभाग सोडला तर जवळपास ४५ वर्ष विरोधी बाकांवर बसून देखील त्यांच्यातील राजकीय आशावाद तसूभर पण कमी झाला नाही…

तत्कालीन सत्ताधाऱ्यांकडून झालेली अहवेलना, आणीबाणीच्या काळात सहन केलेले अत्याचार, हे अटलजींनी सोशिकपणे सोसले, पण सत्तेत आल्यावर त्यांनी कधी सुडाचं राजकारण केलं नाही, की दीर्घकाळ विरोधी पक्षांत बसलो म्हणून जबर राजकीय महत्वकांक्षा जागृत होऊन त्यांनी सत्तेत आल्यावर राजकीय शालीनता सोडली नाही. म्हणूनच काँग्रेसकट इतर सर्व पक्षातील लोकांच्या मनात अटलजींबद्दल कमालीचा आदर होता आणि आजदेखील आहे.

सत्तेत नसताना आणि सत्तेत असताना त्यांच्यातील कलासक्त मन त्यांनी कोमेजू दिलं नाही. राजकरण्याच्या मनात फक्त राजकारणाचा विचार असून उपयोग नाही, तर त्यात कलासक्तता देखील हवी. जी अटलजींच्यात होती. अटलजींचे असे अनेक पैलू मला कायम आकर्षित करत आलेत.

Web Title: Mns leader raj thackeray tweet on former pm atal bihari vajpayee on india positive politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2024 | 10:00 PM

Topics:  

  • Atal Bihari Vajpayee
  • indian politics
  • MNS Leader Raj Thackeray

संबंधित बातम्या

मतचोरीने लोकशाहीची लावली वाट…आण्णा हजारेंना कशी आली नाही जाग?
1

मतचोरीने लोकशाहीची लावली वाट…आण्णा हजारेंना कशी आली नाही जाग?

Raksha Bandhan:शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या बहिणींची वर्णी, भावा-बहिणीच्या नात्याचा गोडवा पाहून तुम्हीही भारावाल
2

Raksha Bandhan:शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या बहिणींची वर्णी, भावा-बहिणीच्या नात्याचा गोडवा पाहून तुम्हीही भारावाल

Vice President Election : उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपकडून आता ‘या’ नावाची जोरदार चर्चा; संघाचाही दबाव?
3

Vice President Election : उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपकडून आता ‘या’ नावाची जोरदार चर्चा; संघाचाही दबाव?

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का! ६ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
4

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का! ६ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.