Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढत्या महागाईचा सर्वसामान्यांना फटका, डाळींसह फळांच्या दरात मोठी वाढ

देशभरात सध्या सगळीकडे निवडणुकीचे वातावरण आहे.निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांकडून निवडणुकीची जोरदार तयारी केली जात आहे. मात्र या दिवसांमध्ये महागाई वाढू नये यासाठी केंद्र सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 13, 2024 | 12:18 PM
वाढत्या महागाईचा सर्वसामान्यांना फटका, डाळींसह फळांच्या दरात मोठी वाढ
Follow Us
Close
Follow Us:

देशभरात सध्या सगळीकडे निवडणुकीचे वातावरण आहे.निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांकडून निवडणुकीची जोरदार तयारी केली जात आहे. मात्र या दिवसांमध्ये महागाई वाढू नये यासाठी केंद्र सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. वाढत्या महागाईला नियंत्रणात आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. केंद्राकडून महागाई नियंत्रणात आणण्यासाठी विशेष धोरण आखली जात आहे. पण त्याचा फारसा फायदा झालेला नाही. दिवसेंदिवस वस्तूंचे भाव वाढतच चालले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फटका बसला आहे.

मागील महिनाभरात डाळीच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे. डाळींसोबतच फळांच्या किंमती वाढल्या आहेत. द्राक्षे, केळी, पपई या फळांच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. डाळींच्या किंमतीमध्ये वाढ झाल्यानंतर सगळ्यात जास्त वाढ ही तूरडाळीच्या किंमतीमध्ये झाली आहे. तूर डाळ १७० रुपये किलो झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला डाळीच्या किंमती परवडत नसल्याचे चित्र सध्या बाजारात दिसून आले आहे. तसेच मागील दोन तीन दिवसांमध्ये डाळीच्या किमतीमध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. तर महिनाभरात डाळीच्या किंमतीमध्ये २० रुपयांनी वाढ झाली आहे. हरभरा आणि मसूर डाळीचे दर देखील वाढले आहेत.

फळांच्या किंमतींमध्ये वाढ

वाढत्या महागाईचा फटका येत्या निवडणुकीमध्ये दिसून येणार आहे. डाळीचे दर वाढल्यानंतर द्राक्ष, सफरचंद, पपई आणि केळीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. द्राक्षाचे दर प्रतिकिलो ८० रुपयांवरून १२० रुपयांवर गेले आहेत. तर किलो मागे ४० रुपये वाढ झाल्याने अनेकांनी द्राक्ष खरेदीकडे पाठ फिरवली आहे. तर काही दिवसांपूर्वी पपईचे दर ५० रुपये किलो होते. मात्र आता हेच दर ९० रुपये प्रतिकिलोवर जाऊन पोहचले आहेत. तर ५० रुपये डझनने मिळणारी केळी ७० ते ८० रुपये डझन एवढी किंमत झाली आहे. फळांच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे.

Web Title: Rising inflation hits the common man a big increase in the price of pulses and fruits nrsk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2024 | 12:18 PM

Topics:  

  • election 2024
  • Price Hike

संबंधित बातम्या

जास्त पैसे खर्च करण्याची तयारी ठेवा! KTM च्या ”या’ बाईक्स झाल्या 27,000 रुपयांनी महाग
1

जास्त पैसे खर्च करण्याची तयारी ठेवा! KTM च्या ”या’ बाईक्स झाल्या 27,000 रुपयांनी महाग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.