Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ujjani Dam News: पावसाळ्यापर्यंत उजनीचे पाणी आरक्षित करावे; कर्मयोग साखर कारखान्याचे भरत शाहांची मागणी

उजनी धरणातील पाण्यावर इंदापूर तालुक्यातील गावांसह सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांच्या पिण्याच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. पावसाळ्यापर्यंत त्या योजनांना पुरेसे पाणी मिळणे गरजेचे आहे

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 04, 2025 | 02:19 PM
Ujjani Dam News: पावसाळ्यापर्यंत उजनीचे पाणी आरक्षित करावे; कर्मयोग साखर कारखान्याचे भरत शाहांची  मागणी
Follow Us
Close
Follow Us:

इंदापूर, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क: उजनी धरणातील पाण्याची पातळी वेगाने घटत असल्याने पाणलोट क्षेत्रातील पिके जगवण्यासाठी व पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होवू नये म्हणून पावसाळ्यापर्यंत उजनीचे पाणी आरक्षित करावे अशी मागणी कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांनी केली आहे.

ते म्हणाले की, रविवारी( दि.०४) उजनी धरणातील एकूण पाण्याची पातळी ४८९ .६२० मीटर होती.एकूण पाणीसाठा १५४२.२६ घन मीटर म्हणजेच ५४.४६ टीएमसी होता.उपयुक्त जलसाठा वजा २६०.५५ घनमीटर म्हणजे वजा ९.२० टीएमसी होता. टक्केवारी वजा १७.१७ अशी नोंदवली गेली. उजनी धरणातून सोलापूरसाठी पाणी सोडल्याने पाणी पातळीत झपाट्याने घट होत आहे. गेल्या २० दिवसात २४ टीएमसी पाणी घटल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.

पुण्यात खळबळ! महाविद्यालयाच्या वसतिगृहात विद्यार्थ्याचा आढळला मृतदेह
उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात भिगवण ते तरटगाव या पट्ट्यात उसाचे एकूण क्षेत्र ८ हजार ५६७ हेक्टर आहे. इंदापूर भागात आडसाली( १ हजार १२७ हेक्टर), सुरु (५३२हेक्टर),पूर्वहंगामी (१ हजार ३०२ हेक्टर), खोडवा (५६८ हेक्टर) अशी त्याची वर्गवारी आहे. तर भिगवण भागात आडसाली ८८१ हेक्टर, सुरु ६७१ हेक्टर, पूूर्व हंगामी १ हजार (११० हेक्टर), खोडवा (१हजार ३७६ हेक्टर) एवढे एकूण ऊसाचे क्षेत्र आहे. यंदाच्या उस गळीत हंगामात आठ ते नऊ लाख मेट्रिक टन ऊस गाळपासाठी गेला आहे.पुढच्या हंगामासाठी लागणाऱ्या उसाला पाणी मिळणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
या खेरीज पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात फळबागा आहेत.आंबा (१७१.५ हेक्टर), पेरु (१ हजार ९९.४ हेक्टर), डाळिंब (१ हजार ५५४.४ हेक्टर), सीताफळ (२०२.१ हेक्टर),केळी (७४९.४ हेक्टर) अशी त्यांची वर्गवारी आहे. फळबागा जिवंत ठेवण्यासाठी पावसाळ्यापर्यंत त्यांना पुरेसे पाणी मिळण्यासाठी धरण क्षेत्रात पाणी असणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
भारतातील 74 टक्के Gen Z यूजर्स मोबाईलवर गेम खेळण्यासाठी घालवतात तब्बल इतके तास, Free Fire-
उजनी धरणातील पाण्यावर इंदापूर तालुक्यातील गावांसह सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांच्या पिण्याच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. पावसाळ्यापर्यंत त्या योजनांना पुरेसे पाणी मिळणे गरजेचे आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व चाऱ्याची सोय होणे महत्वाचे आहे. त्यासाठी पावसाळ्यापर्यंत उजनी धरणाचे पाणी आरक्षित करावे अशी आपली मागणी आहे.त्याच बरोबर पाणलोट क्षेत्रातील शेतीच्या वीजपंपांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येऊ नये,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Ujani dam news ujani water should be reserved till the monsoon demand of bharat shah of karmayogi sugar factory

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2025 | 02:17 PM

Topics:  

संबंधित बातम्या

उजनी धरणातून भीमा नदीत 76 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
1

उजनी धरणातून भीमा नदीत 76 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पूर नियंत्रणासाठी उजनी धरणातून ११६०० क्युसेसचा विसर्ग; उजनीने जून महिन्यात गाठली ऐतिहासिक ७० टक्क्यांची पाणीपातळी.. 
2

पूर नियंत्रणासाठी उजनी धरणातून ११६०० क्युसेसचा विसर्ग; उजनीने जून महिन्यात गाठली ऐतिहासिक ७० टक्क्यांची पाणीपातळी.. 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.