Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यात पावसाचा जोर कायम; ‘या’ पाच जिल्ह्यांना सलग चार दिवस ‘यलो अलर्ट’, पुण्यासह कोल्हापुरात…

बुधवारपासून पुढील चार दिवस कोल्हापूर, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे जिल्ह्यात बुधवार तसेच शुक्रवार, शनिवार यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच नाशिकमध्येही बुधवारी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 16, 2024 | 07:13 AM
राज्यात पावसाचा जोर कायम; 'या' पाच जिल्ह्यांना सलग चार दिवस 'यलो अलर्ट'

राज्यात पावसाचा जोर कायम; 'या' पाच जिल्ह्यांना सलग चार दिवस 'यलो अलर्ट'

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. दिवसा कडक उन्ह तर नंतर पावसाची सुरुवात होत आहे. असे असताना आता राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहिती दिली जात आहे. कोकण किनारपट्टीसह पश्चिम महाराष्ट्र ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. ठाणे आणि मुंबईत बुधवारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला.

मुंबईसह राज्यात गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने चांगलीच तारांबळ उडत आहे. त्यातच आता पुढील चार दिवस हा पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्याने मंगळवारी दिली. बुधवारपासून पुढील चार दिवस कोल्हापूर, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे जिल्ह्यात बुधवार तसेच शुक्रवार, शनिवार यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तसेच नाशिकमध्येही बुधवारी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. अहमदनगरमध्ये बुधवार, शुक्रवार, शनिवार तीन दिवस मुसळधार पाऊस पडू शकतो. तसेच सांगली व सोलापूरमध्येही विजेच्या कडकडाटासह परतीचा पाऊस धडकणार असल्याचे हवामान खात्याने मंगळवारी सांगितले.

वर्ध्यात सोयाबीनी 40 पोती गेली वाहून

वर्ध्यात सोयाबीनचे पीक घरी घेऊन जात असताना शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर सोयाबीनसह पुरात वाहून गेला. वर्ध्यातील आष्टी तालुक्याच्या शिरकूटणी येथे घटना घडलीये. वर्ध्याच्या आष्टी तालुक्यातील शिरकुटणी या गावातील शेतकरी पुरुषोत्तम नागदेवते याने आपल्या सोयाबीनचे पीक काढले.

अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये मुसळधार

मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असतानाच, रायगड जिल्ह्यासह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये मुसळधार पाऊस कोसळला. अंबरनाथमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस पडला. जवळपास अर्धा ते पाऊण तास ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती.

मुंबईसह उपनगरांतही पावसाची हजेरी

मुंबईसह उपनगरांतही पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी तर संध्याकाळी सहा वाजताच अंधार पडला होता. नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहनही हवामान खात्याने केले आहे.

Web Title: Yellow alert of rain in many district of maharashtra nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2024 | 07:13 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.