Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संघर्षांपासून प्रसिद्धीपर्यंत… कौन बनेगा करोडपतीमध्ये अमिताभ बच्चन यांनी शेअर केल्या ‘जंजीर’च्या आठवणी

कौन बनेगा करोडपती हा लोकप्रिय शो दैदीप्यमान २५ वर्षे- ज्ञानाची, स्वप्ने खरी करण्याची आणि जीवन पालटून टाकणाऱ्या क्षणांची साजरा करणार आहे. हा भव्य आनंद सोहळा ‘ज्ञान का रजत महोत्सव’ 20 जानेवारीपासून सुरू होणार आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Jan 19, 2025 | 01:45 PM
संघर्षांपासून प्रसिद्धीपर्यंत... कौन बनेगा करोडपतीमध्ये अमिताभ बच्चन यांनी शेअर केल्या ‘जंजीर’च्या आठवणी

संघर्षांपासून प्रसिद्धीपर्यंत... कौन बनेगा करोडपतीमध्ये अमिताभ बच्चन यांनी शेअर केल्या ‘जंजीर’च्या आठवणी

Follow Us
Close
Follow Us:

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कौन बनेगा करोडपती हा लोकप्रिय शो एक लक्षणीय माइलस्टोन साजरा करत आहे- दैदीप्यमान 25 वर्षे- ज्ञानाची, स्वप्ने खरी करण्याची आणि जीवन पालटून टाकणाऱ्या क्षणांची! हा भव्य आनंद सोहळा ‘ज्ञान का रजत महोत्सव’ 20 जानेवारीपासून सुरू होत आहे, जो सुखद आठवणी, उत्साह आणि अविस्मरणीय क्षणांनी भरलेला असेल.

शिवानी-अंबरच्या लग्नपत्रिकेची पहिली झलक, लग्नाच्या आधीच्या विधींना सुरुवात; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात

हा प्रसंग आणखी विशेष केला, तो कठुआहून आलेल्या विनय गुप्ता या स्पर्धकाने. आपल्या गावाचे अभिमानाने प्रतिनिधित्व करणाऱ्या विनय गुप्ताने सांगितले की, त्याच्या गावातून KBC मध्ये आलेला तो पहिला स्पर्धक आहे. अभिमानाने आणि दृढतेने KBC च्या हॉटसीटवर विराजमान झालेला विनय KBC मध्ये त्याचे येणे ही केवळ त्याची स्वतःची स्वप्ने साकार करण्याची नाही, तर आपल्या गावकऱ्यांना मोठी स्वप्ने पाहून त्यासाठी परिश्रम करण्याची प्रेरणा देण्याची एक संधी म्हणून बघत होता. या खेळादरम्यान अमिताभ बच्चनचा फॅन असणाऱ्या विनयने त्यांना ‘जंजीर’ चित्रपटातील प्रसिद्ध संवाद म्हणण्याचा आग्रह केला. त्याला प्रतिसाद देताना एक हृदयस्पर्शी आठवण शेअर करत श्री. बच्चन म्हणाले, “मी दोन तीन चित्रपटांत काम केले होते, पण त्यात मला यश आले नव्हते. त्यामुळे मी हताश झालो होतो. मुंबईला येण्याअगोदर मी कोलकाता येथे नोकरी करत होतो, जिकडे मी फक्त 400-500 रु. महिना कमवत होतो. पण जेव्हा मी मुंबईत आलो, तेव्हा इकडे जम बसवण्याचा निर्धार करून मी आलो होतो. मी विचार केला की, जर मला चित्रपट मिळाला नाही, तर मी टॅक्सी चालवीन. मी माझा ड्रायव्हिंग लायसन्स देखील तयार ठेवला होता. पण, मला काम मिळाले. अब्बास साब यांनी मला पहिला ब्रेक दिला. जंजीर चित्रपट सलीम-जावेद यांनी लिहिला होता, जो माझ्या कारकिर्दीतला टर्निंग पॉइंट ठरला. त्यावेळी राजेश खन्ना हा भारतातील सर्वात मोठा सुपरस्टार होता. काय त्याचा ऑरा होता, काय फॉलोइंग होते.. त्याला लोकांनी इतके डोक्यावर घेतले होते की, तो आपल्या गाडीतून आला की महिला त्याच्या कारच्या टायरला लागलेली धूळ आशीर्वाद म्हणून मस्तकी लावत असत. मी तर तेव्हा कोणीच नव्हतो. पण तरीही सलीम जावेद माझ्याकडे आले आणि त्यांनी मला ही कथा देऊ केली. ही भूमिका मला मिळेल अशी मला अपेक्षा नव्हती पण ती मिळाली. अशा प्रकारे ‘जंजीर’ चित्रपट मला मिळाला.”

एकाच दिवशी रिलीज झालेल्या ‘इमर्जन्सी’ आणि ‘आझाद’ची बॉक्स ऑफिसवर परिस्थिती काय ? वाचा सविस्तर…

जेव्हा बिग बींनी जावेद साब यांना विचारले की, त्यांनी त्याचे आधीचे काम पाहिले आहे का? तेव्हा ते म्हणाले होते, “होय, मी पाहिले आहेत.” बिग बी पुढे सांगतात, “जावेद साबनी मला सांगितले की, माझ्या बॉम्बे टू गोवा चित्रपटात एक असे दृश्य आहे की मी एका हॉटेलात बसलो आहे आणि त्यावेळी शत्रुघ्न सिन्हा येऊन मला थप्पड मारतो. त्या दृश्यात आमच्यात लगेच मारामारी सुरू होणे अपेक्षित होते. पण तसे न करता मी नुसता उठून उभा राहतो आणि मी खात असलेला सँडविच खाणे चालू ठेवतो. ते दृश्य पाहून जावेद साब यांना विश्वास वाटला होता की मी ‘जंजीर’ची भूमिका पेलू शकेन.”

त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी ‘जंजीर’ चित्रपटातील आपला प्रसिद्ध संवाद सादर केला, “जब तक बैठने को न कहा जाए, सीधी तरह खड़े रहो. ये पुलिस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नहीं.” त्यानंतर हसत हसत बिग बी म्हणाले, “तो माझा कामाचा पहिला दिवस होता आणि हा संवाद मला प्राण सरांसमोर बोलायचा होता, जे स्वतः अत्यंत प्रतिभावान कलाकार आहेत. त्यांना या ओळी ऐकवणे मला आधी थोडे जड गेले, पण त्यांनी मला धीर दिला आणि विना-संकोच संवाद म्हणायला सांगितले.”

हे अविस्मरणीय क्षण बघायला विसरू नका, 20 जानेवारीपासून सुरू होत असलेल्या “कौन बनेगा करोडपती – ज्ञान का रजत महोत्सव”मध्ये दर सोमवार ते शुक्रवार रात्री 9:00 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर.

Bigg Boss 18 Finale : बिग बॉसच्या विजेत्याला ट्रॉफीसोबत किती बक्षीस रक्कम मिळणार?

Web Title: Kbc 16 amitabh bachchan relives zanjeer magic as he celebrates 25 years of hosting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2025 | 01:45 PM

Topics:  

  • amitabh bachchan
  • Kaun Banega Crorepati

संबंधित बातम्या

Ikkis First Review: ‘इक्कीस’ पाहून Amitabh Bachchan भावूक; नातू अगस्त्य नंदाच्या अभिनयाचं केलं भरभरून कौतुक
1

Ikkis First Review: ‘इक्कीस’ पाहून Amitabh Bachchan भावूक; नातू अगस्त्य नंदाच्या अभिनयाचं केलं भरभरून कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.